कलाल बांगडी या तोफेचा पल्ला १२किमी पर्यंत आहे असे म्हणतात आणि कितीही उन असले तरी तोफ अजिबात तापत नाही. एक आख्याईका अशी की, पेशव्यांनी किल्ला जिंकण्यासाठी ही तोफ आणवली होती पण किल्ला जिंकता न आल्याने निराश होऊन त्यांनी ती तशीच सोडून दिली. तिच पुढे सिद्दीने किल्ल्यात आणवली. तर काहींच्या मते ती इतकी जड होती ही ती बोटीने आणणे अशक्यप्राय होते. त्यामुळे ती तुकड्या तुक़ड्यात आणून इथे जोडण्यात आली.[ वादळ ]
! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Wednesday, 27 December 2017
Wednesday, 20 December 2017
राजधानी रायगडचे वर्णन
राजधानी रायगडचे वर्णन - थाँमस निकोल्स
23 मे 1673 रोजी थाँमस निकोल्स रायगड वर आला होता. हिंदु-दुर्ग रायगड विषयी तो लिहीतो-
"सकाऴी त्या उंच टेकडीवर आम्ही गेलो. वाटेत अनेक ठिकाणी पायरया तयार केल्या होत्या आणि पुढे दरवाज्या जवळ गेलो असता तेथील पायरी पक्क्या खडकात खोदलेल्या आहेत. जेथे टेकडीला निसर्गत: अभेदता नाही तेथे 24 फुट उंचीची भिंत किंवा तट बांधला आहे आणि भिंती पासुन 40 फुटांवर लगेच दुसरी भिंत बांधली आहे.
जर शत्रुने पहिली भिंत पार केली तर तर त्यांना हकलुन लावान्यासाठी दुसरी भिंत तयारच होती. अशा प्रकारे हा किल्ला ईतका दुर्गम बनवला आहे कि जर रसदेचा पुरवठा झाल्यास हा किल्ला अगदी अल्प शिबंदीच्या सहाय्याने सर्व जगाविरुद्ध लढु शकेल.”
—थाँमस निकोल्स, इंग्रज वकिल
सौजन्य : शिवरायांचा शिलेदार
फुलात न्हाली पहाट ओली,
फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भुकल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले
रंग फुलांवर ओघळतांना असे जुईला लदबदले
गालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले
निळ्या तिच्या डोळ्यांत कथाई, कुणाकुणाच्या आठवणी
एक झोपडी साक्षीमधली करीत बसली साठवणी
अशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे
दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे
आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातुन बोलविले
भरात येउनी नग्न शरीरी उघड्यावरती भोग दिले
काचोळीची गाठ सावरित हळू तयाला सांगितले
तिचियापोटी पाचघडीचे लख्ख चांदणे अवघडले
फुलात न्हाली पहाट ओली, कळीत केशर साकळते
गंधवतीच्या मनात राजस एक पाखरु भिरभिरते!
Monday, 4 December 2017
श्री शिवरायांची पूजा.
सांगलीकरांकडून दररोज होते किल्ले श्री रायगडावर छत्रपती श्री शिवरायांची पूजा.
लेख आवर्जुन वाचा
रायगडावरील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा सांगलीकरांकडून ऊन-पाऊस -वारा यांची पर्वा न करता गेली २४ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे.
दर दोन दिवसांनी शहरातील दोन शिवभक्त स्वखर्चाने सांगली ते रायगड असा सुमारे ३५० किलोमीटरचा प्रवास करून ‘रोप वे’चा उपयोग न करता पायी चालत गडावर जातात.
या उपक्रमास शिवभक्त ॥ श्री रायगड व्रत ॥ असे म्हणतात.
यामध्ये एकादिवसाचाही खंड पडलेला नाही. कोणताही उपक्रम अव्याहत चालविणे ही अशक्य गोष्ट असल्याचा सर्वसाधारण समज आहे, परंतु सांगलीतील शिवभक्तांनी रायगड व्रताच्या माध्यमातून या संकल्पनेलाछेद दिला आहे.
१४ जानेवारी १९९१ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर या उपक्रमास श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान चे संस्थापक श्री संभाजीराव भिडे (गुरूजी) यांनी प्रारंभ केला.
प्रारंभापासूनच प्रत्येकाने स्वखर्चाने गडावर जायचे आणि पूजा करायची, हा दंडक शिवभक्तांनी जपला आहे.
बहुतांशजण एसटी बसनेच प्रवास करतात. शिवभक्त सांगलीहून कऱ्हाड, तेथून महाडमार्गे रायगडावर पोहोचतात. तेथे गेल्यावर रात्री गडावरील धर्मशाळेत मुक्काम करतात.
पहाटे उठून गडावरील छत्रपती श्री शिवरायांची समाधी, महाराजांचे सिंहासन, होळीच्या माळावरील महाराजांची मूर्ती, श्री जगदीश्वराचे मंदिर, श्री शिरकाई देवीची मूर्ती आणि गडाच्या पायथ्याशी पाचड येथील राजमाता जिजाऊसाहेबांची समाधी या सहा ठिकाणी पूजा करण्यात येते.
दुपारी श्री शिवचरित्राचे वाचन करण्यात येते. रात्री पुन्हा गडावरच मुक्काम करून पहाटे पुन्हा सहा ठिकाणी पूजा करून दोघे शिवभक्त सांगलीकडे रवाना होतात.
त्याच दिवशी दुपारी सांगलीहून दुसरे दोघेजण रायगडाकडे जाण्यासाठी निघतात.
रायगडला जाऊन पुन्हा सांगलीत येईपर्यंत कोणीही हॉटेलमध्ये जेवण करीत नाही. जातानाच दोन दिवसांची शिदोरी बांधून नेण्यात येते.
या उपक्रमात खंड पडू नये यासाठी वर्षाच्या प्रारंभीच १८३ दिवसांकरिता शहरातील ३६६ शिवभक्तांचे वेळापत्रक शिवप्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात येते.
त्यामध्ये बदल होत नाही. काही अडचण निर्माण झाली, तर संबंधित शिवभक्तच दुसऱ्या दोघांची सोय करून देतात.
प्रत्येक शिवभक्ताला सरासरी ८०० रुपये प्रवास खर्च येतो.
सांगलीहून रायगडावर जाऊन पूजा करण्यापेक्षा तेथे रोजच्याकरिता पगारी माणूस नेमण्याचा सल्ला काहींनी दिला होता, परंतु तो सल्ला सर्वच शिवभक्तांनी नाकारला.
तेथे जाऊन पूजा केल्यानंतर वेगळीच अनुभूती येत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी या गोष्टीस नकार दिला. भारतीय परंपरा, रुढी, सण यांचे रक्षण छत्रपती श्री शिवरायांनी केले. त्यामुळे देवांचाही देव असलेल्या शिवरायांच्या समाधीची पूजाकरणे हे कर्तव्यच असल्याची शिवभक्तांची भावना आहे.
पावसाळ्यात दरडी कोसळणे, वेळेत बस न मिळणे अशा अडचणी येतात. असे असले तरीही रायगड व्रतामध्ये खंड पडत नाही.
तीस रुपयांत बारा हार
ज्यावेळी रायगड व्रतास प्रारंभ झाला,त्यावेळी सांगलीतील श्री शिवाजी महाराजांच्या मुर्तीसमोरच्या जाधव बंधूंनी गडावरील दोन दिवसांच्या पूजेसाठी बारा हार तीस रुपयांना दिलेहोते.
त्यावेळेपासून आजअखेर त्यांनी हारांची रक्कम वाढविलेली नाही ! आजही शहरातून जाणाऱ्या शिवभक्तांना जाधव बंधू तीस रुपयांमध्येच बारा हार देतात.
श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान
कोंडाजी फर्जंद
कोंडाजी फर्जंद
अवघ्या साठ मावळ्यानिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा पराक्रमी वीर हा कोंडाजी होय.तुंगभद्रेपासून उत्तरेस अहिवंतापर्यंत अनेक गड राजांनी कब्जात घेतले होते.पण दख्खनचा दरवाजा असलेला पन्हाळगड त्यांना ताब्यात मिळाला नव्हता.राजेंनी दि.६ जून १६७२ रोजी रायगडावर आपल्या सहकाऱ्यांना ही सल बोलून दाखविली.
यावेळी कोंडाजी फर्जंद,राजेंना बोलिला की गड म्या घेतो.त्याने अवघे तीनशे हशम(मावळे)राजेंकडे मागितले.अवघ्या तीनशे मावळ्यानिशी पन्हाळगड जिंकावयास निघालेल्या कोंडाजीचे राजेंनी कौतुक करून त्यास सोन्याचे कडे दिधले.कोंडाजीने कोकणातून महाडमार्गे येऊन राजापुरास आपला तळ टाकला.राजापुर व पन्हाळा किल्ला हे अंतर आडवाटेने(जंगली रस्त्याने)अंदाजे ८०-९० कि.मी होते.हेरगिरीने वेष पालटून गडावर जाऊन त्यांनी गडाची पूर्ण माहिती काढली.गडावर अंदाजे दोन हजार गनिम होते.बाबूखान हा अदिलशाही किल्लेदार होता.
फाल्गुन वद्य त्रयोदशी(दि.६ मार्च १६७३)रोजी मध्यरात्री राजापुरातून येऊन फिरंगोजी गडाच्या जवळ पोहोचला.तीनशे मावळ्यापैकी त्यांनी निवडक साठ मावळे घेऊन गडावर हल्ला केला.तीन दरवाज्याजवळ असलेल्या कड्यावरून चढून त्यांनी गडावर प्रवेश केला.मध्यरात्री मराठे गडावर आल्यावर त्यांनी कापाकापीला सुरूवात केली.गडाचा किल्लेदार बाबूखान व कोंडाजी यांच्यात महाभयंकर युध्द जाहाले.अखेर कोंडाजीच्या तलवारीच्या वारात बाबूखानाचे मस्तक धडावेगळे झाले.किल्लेदार पडल्यामुळे खानाच्या सैन्यात गोंधळ उडाला.ते पळून जाऊ लागले.पण गडावरील साठ मावळ्यांनी त्यांची दाणादाण उडवून गड ताब्यात घेतला.अवघ्या साठ मावळ्यांनिशी गड ताब्यात घेणारा कोंडाजी खरोखरच वीर होता.
Saturday, 2 December 2017
शिवरायांची धोरणी नजर
शिवरायांची धोरणी नजर मावळातील एका कोणे एके काळापासुन उभ्या असलेल्या डोंगरावर पडली अन त्या पुराणपुरुषाच रुपांतर दुर्गपुरुषात झाल. तोच तो इतिहासाच्या पानापानांनी गौरवलेला गडांचा राजा आणि राजांचा गड-किल्ले राजगड!
गुंजवणी,कानद आणि नीरा नदीच्या बेचक्यातील गुंजण मावळातील हा डोंगर तापसांना फार आधीपासुन माहित असावा.ब्रम्हर्षी ऋषींच्या वास्तव्याच्या खुणा मिरवणारा हा डोंगर "बिरमदेवाचा डोंगर" ह्या नावाने मावळाला माहीत होता.यादव आणि बहमनी पुढे आदिलशाही-निजामशाही कालखंडामधे एक दुर्लक्षित ठाण एवढेच ’बिरमदेवगडाला’ मह्त्व होत. शिवरायांनी त्याचे तीन नद्यांनी वेढलेले लष्करीद्रुष्ट्या असलेल मह्त्वपुर्ण स्थान,तीन दिशांना असलेला विस्तार अचूक जाणून घेत त्याला तटबंदीचा साज चढवून डोंगरावर उभारलेल्या जगातील एका सर्वोत्क्रुष्ट राजधानीत रुपांतर केलं. राजगड हा एक आदर्श डोंगरी किल्ला आहे.घेरा-मेट-माची-बालेकिल्ला ही आदर्श डोंगरी किल्ल्याबाबतीत आढळणारी सर्व वैशिष्ट्ये राजगडासंदर्भात आढळतात.
Thursday, 23 November 2017
राजा शिवछत्रपती मानाचा मुजरा
इतिहासाच्या पानावर
रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती
मानाचा मुजरा maja raja
प्रतापगड ते #पोलादपूर
#प्रतापगड ते #पोलादपूर दरम्यान घाटातील निसर्गाचा अप्रतिम नजराणा...
कुठे हिरवे, कुठे पिवळे-तांबूस तर कुठे वाहती दुधगंगा...
PC : BJ
Sunday, 19 November 2017
अर्नाळा
अर्नाळा किल्ल्यापासून सुमारे ७०० मीटर अंतरावर असणारा एकाकी बुरुज / मनोरा (टेहळणीसाठी). हा मनोरा पोर्तुगीजांनी बांधला. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार पुर्वी या बुरुजामधून एक गुहा (चोरवाट) थेट वसई किल्ल्यावर जात होती, परंतु काळाच्या ओघात ती बुजून गेली.
गुलाबी थंडी हवीहवीशी,
गुलाबी थंडी हवीहवीशी,
जुळती नाती नवी-नवीशी.
'गारवा' गाणे कुडकुडत गुणगुणणे,
फुटल्या ओठांचे हलकेच हसणे.
हात चोळणे खांदे उंचावून,
स्वेटर न घालणे थंडी लागून.
एकच कप चहा दोघांनी पिणे,
खूप थंडी आहे....पुन्हा पुन्हा सांगणे.
पतंग उडवण्यासाठी धडपडने,
पतंगासोबतची उंचच स्वप्ने.
कधी रुसणे ......कधी रागवणे,
बोलण्यासाठी पुन्हा कारण शोधणे.
गोड बोलूया ... एकमेकांना सांगायचे,
तिळगुळ वाटत - घेत फिरायचे,
या वर्षीच्या गारव्यात एकदा
देईन वचन अन करेन वादा.,
स्वप्नासाठी तुझ्या प्रार्थना करीन
हवे तुला ते सारे मागेन.
शिवतीर्थ
मित्रांनो आपण इचलकरंजीत शिवतीर्थ पाहतोय. इथे असणारी शिवरायांची भव्य व सुंदर मुर्ती अख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील पूजा हि सुद्धा नित्यनियमाने केली जाते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ह्यांचेमार्फत शिवरायांची नित्यपूजा तसेच प्रत्येक पोर्णिमेला शिवमुर्तीस अभिषेक घातला जातो. आपणही ह्या पूजेत सहभागी होऊ.
।।पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय।।
Wednesday, 15 November 2017
*छत्रपति शिवरायांची एवढ़ी माहिती
*छत्रपति शिवरायांची एवढ़ी माहिती पाठवत आहे की आजच्या काहींना माहिती नाही..*
निदान ही पोस्ट वाचून तरी त्याना माहित होईल.
*☆★स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे☆*
_______________________________
*१) लखुजी जाधवराव* (जिजाबार्इंचे वडील)-
सिंदखेड राजा
*२) मालोजीराजे* (शिवरायांचे आजोबा)- इंदापूर, जि. पुणे
*३) विठोजीराजे* (शिवरायांचे चुलते)- भातवडी
*४) शहाजीराजे*- होदिगेरे, ता. कनकगिरी, जि.
दावनगेरे (कर्नाटक)
*५) जिजाबाई -* पाचाड (रायगडाच्या पायथ्याला)
*६) छत्रपती शिवाजी महाराज*- रायगडावर
*७) सईबाई* (शिवरायांच्या पत्नी) - राजगड
*८) पुतळाबाई व सोयराबाई* (शिवरायांच्या पत्नी) - रायगड
*९) संभाजीराजे* (शिवरायांचे थोरले बंधू)
कनकगिरी, ता. गंगावटी, जि. कोप्पल
*१०) छत्रपती संभाजी* (शिवरायांचे थोरले
पुत्र)- वडू कोरेगाव
*११) सखुबाई* (शिवरायांच्या कन्या) माळशिरस, जि. सोलापूर
*१२) सूर्यराव काकडे* (शिवरायांचे जवळचे मित्र)-
साल्हेरच्या किल्ल्याजवळ.
*१३) रामचंद्रपंत अमात्य* (अष्टप्रधान मंडळातील
मंत्री)- पन्हाळगडाच्या पायथ्याशी
*१४) मकूबाई* (शिवरायांच्या भावजयी) - जिती,
ता.
करमाळा, जि. सोलापूर
*१५) शिवरायांचे सेनापती नेताजी पालकर-* तामसा, ता. हदगाव, जि. नांदेड
प्रतापराव गुजर - नेसरी, ता. गडहिंग्लज,
जि. कोल्हापूर हंबिरराव मोहिते- तळबीड, ता. कराड
*१६) धनाजी जाधव -* वडगाव (कोल्हापूरजवळ)
*१७) रामाजी पांगेरा -* कन्हेरगड, ता. दिंडोरी,
जि. नाशिक
*१८) बाजी पासळकर आणि गोदाजी जगताप*
(गाधवड, जि. पुणे)
*१९) तानाजी मालुसरे आणि शेलारमामा -*उमरळ
*२०‹) रायबा* (तानाजीचा मुलगा)- पारगड
*२१) बहिर्जी नाईक -* भूपाळगड मौजे बाणूर, ता.
आटपाटी, जि. सांगली
*२२) हिरोजी फर्जंद*आणि शिवरायांचे सावत्र भाऊ -
परळी (रायगडाजवळ)
*२३) शिवा काशिद -* पन्हाळगड
*२४) कान्होजी जेधे आणि जिवा महाल-*
कारी अंकवडे, ता. भोर, जि. पुणे
*२५) मुरारबाजी देशपांडे -*पुरंदर
*२६) संभाजी कावजी -* कोंडावळे, ता.
मुळशी, जि. पुणे
*२७) फिरंगोजी नरसाळा-* संग्रामदुर्ग (चाकण) पुणे
*२८) सिदोजी निंबाळकर -* पट्टागड (संगमनेर)
*२९) बाजी प्रभू व फुलाजी प्रभू*- विशाळगड
*३०) दत्ताजी जाधव* (शिवरायांचे मामा बहादुरजीचे नातू)
निलंगा येथे १६६५ साली. समाधीस्थळ सापडत नाही.
*३१) जानोजी भोसले* नागपूरकर - मु.पो. येडोळा, ता. तुळजापूर
*३२) जानोजी निंबाळकर* (तुळजाभवानी देवीचा दरवाजा यांच्याच
नावाने आहे) - बीड
*३३) जगदेवराव जाधवराव* (जिजाबार्इंचा भाऊ बहादुरजीचा नातू व
देऊळगावराजाचा कर्ता)- ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा, जि.
सोलापूर ३४) नागोजी माने (म्हसवडकर)- सिंदखेडराजा
*३५)हिंमतबहाद्दर उदाजी चव्हाण-* अणदूर, ता. तुळजापूर जि.
उस्मानाबाद ३६) अन्नूबाई
(पहिल्या बाजीरावांच्या बहीण )- मु.पो. तुळजापूर, जि.
उस्मानाबाद
*आज महाराष्ट्रातील ब-याच समाध्या जीर्ण अवस्थेत आहेत.*
काही ठिकाणी समाधी अस्तित्वातच नाहीत आणि ज्या आहेत..
*त्याच्याकडे समाजाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.*
अशी थोरामोठ्यांची समाधीस्थळे पुढील
पिढीला प्रेरणा असतात. *सर्वांत सुंदर समाधीस्थळ शहाजीराजांचे आहे. आपल्यापेक्षा कर्नाटकातील लोकांना हे लवकर समजावे हे विशेष आहे.*
*⛳स्वराज्य⛳*
*छत्रपती शिवाजी राजे भोसले.*
कालखंड :- 1642–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.
*महाराजांच्या पत्नी-*
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)
*मुले -*संभाजी, राजाराम,
*मुली -*सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर..
*फितुर जन्मले ईथे हि जरी या मातीची खंत आहे..*
*तरी संभाजी राजे अजुन आमच्या छातीत जिवंत आहेत..*
*मुंडके उडवले तरी चालेल पण मान कुणापुढे वाकणार नाहीl*
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
*जीभ कापली तरी चालेल पण प्राणाची भिक मागणार नाही l*
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
*पाय तोडले तरी चालेल पण आधार कुणाचा घेणार नाही l*
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म सोडणार नाही."
ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*शिवाजी महाराजांचे निधन झाले..*
हि बातमी औरंगजेबाच्या खाजगी सचिवास
समजली. हि बातमी अत्यंत आनंदाची आहे, असे समजून
*सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत सांगण्यासाठी गेला.*
*ही बातमी ऐकून औरंगजेब बादशहाने हातातील कुराण बंद करून बाजूला ठेवले.*
तख्तावरून उठला.
त्याने सचिवास आनंद व्यक्त केल्याबद्दल सजा दिली.
व नमाजाची पोझिशन घेऊन *त्याने दोन्ही हात पसरून आभाळाकडे अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले औरंगाजेबाने प्रार्थना केली.*
तिचा *मराठी अनुवाद*-
*"हे देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.ते खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर.*
*आमच्या हिँदूस्थानातील महान मानवतावादी व सर्वधर्म जातीतील स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू झाला आहे.*
*कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची सताड उघडी ठेव..*
*संदर्भ-* अहेकामे आलमगिरी..
शत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असे
एकच राजे छत्रपती शिवाजी माझे
छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
प्रत्तेकाने सदरची पोस्ट वाचून शेयर करा...हवं
असल्यास " हि आपली जबाबदारी समजा...धर्म समजा...!!"
माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll👏
आपल्याला माहित असणे आवशक आहे..........की ,
आपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहेत,
महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:
अहमदनगर जिल्हा
1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला
2. पेडगावचा बहादूरगड
3. रतनगड
औरंगाबाद जिल्हा
1. देवगिरी-दौलताबाद.
कुलाबा जिल्हा (रायगड जिल्हा)
1. अवचितगड
2. उंदेरी
3. कर्नाळा
4. कुलाबा
5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
6. कोरलई
7. कौला किल्ला॑
8. खांदेरी
9. घोसाळगड
10. चंदेरी
11. तळेगड
12. तुंगी
13. धक
14. पेब
15. प्रबळगड
16. बिरवाडी
17. भिवगड
18. मंगळगड-कांगोरी
19. मलंगगड
20. माणिकगड
21. माणगाव
22. रतनगड
23. रायगड
24. लिंगाणा
25. विशाळगड
26. विश्रामगड
27. सांकशी
28. सागरगड
29. सुरगड
30. सोनगिरी
कोल्हापूर जिल्हा
1. पन्हाळा
2. पावनगड
3. बावडा
4. भूधरगड
5. रांगणा
6. सामानगड
गोंदिया जिल्हा
1. गोंदियाचा प्रतापगड
चंद्रपूर जिल्हा
1. किल्ले चंद्रपूर
2. बल्लारशा
जळगाव जिल्हा
1. अंमळनेरचा किल्ला
2. कन्हेरगड
3. पारोळयाचा किल्ला
4. बहादरपूर किल्ला
ठाणे जिल्हा
1. अर्नाळा
2. अशीरगड
3. असावगड
4. अलिबाग
5. इंद्रगड
6. उंबरगांव
7. कल्याणचा किल्ला
8. कामनदुर्ग
9. काळदुर्ग
10. केळवे-माहीम
11. कोंजकिल्ला
12.गंभीरगड
13. गुमतारा
14. गोरखगड
15. जीवधन
16. टकमक
17. ठाणे किल्ला
18. डहाणू
19. तांदुळवाडी किल्ला
20. तारापूर
21. धारावी
22. दातिवरे
23. दिंडू
24. नळदुर्ग
25. पारसिक
26. बल्लाळगड
27. बळवंतगड
28. बेलापूर
29. भवनगड
30. भैरवगड
31. भोपटगड
32. मानोर
33. माहुली
34. व्ररसोवा
35. वसईचा किल्ला
36. शिरगांवचा किल्ला
37. संजान
38. सिद्धगड
39. सेगवाह
नागपूर जिल्हा
1. आमनेरचा किल्ला
2. उमरेडचा किल्ला
3. गोंड राजाचा किल्ला
4. नगरधन(रामटेक)(भुईकोट
किल्ला)
5. भिवगड
6. सिताबर्डीचा किल्ला
नाशिक जिल्हा
1. अंकाई
2. अचलगड
3. अंजनेरी
4. अलंग
5. अहिवंत
6. इंद्राई
7. कंक्राळा
8. कंचना
9. कन्हेरा
10. कर्हेगड
11. कावनई
12. कुलंग
13. कोळधेर
14. गाळणा
15. घारगड
16. चांदोर
17. जवळ्या
18. टंकाई
19. त्रिंगलवाडी
20. त्रिंबक
21. धैर
22. धोडप
23. पट्टा
24. बहुळा
25. ब्रह्मगिरी
26. भास्करगड
27. मार्किंडा
28. मुल्हेर
29. रवळ्या
30. राजधेर
31. रामसेज
32. वाघेरा
33. वितानगड
34. हर्षगड
35. हातगड
पुणे जिल्हा
1. कुवारी
2. चाकण
3.चावंड
4. जीवधन
5. तिकोना
6. तुंग
7. नारायणगड
8. पुरंदर
9. प्रचंडगड (तोरणा)
10. मल्हारगड
11. राजगड
12. राजमाची
13. विचित्रगड
14. विसापूर
15. लोहगड
16. शिवनेरी
17. सिंहगड
18. हडसर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे
1. अंजनवेल
2. आंबोळगड
3. आवर किल्ला
4. कनकदुर्ग
5. कुडाळचा किल्ला
6. कोट कामते
7. खारेपाटण
8. गोवळकोट
9. गोवा
10. जयगड
11. दुर्ग रत्नागिरी
12. देवगड
13. नांदोशी
14. निवती
15.पालगड
16. पूर्णगड
17. प्रचितगड
18. फत्तेगड
19. बाणकोट
20. बांदे
21. भगवंतगड
22. भरतगड
23.भवनगड
24. भैरवगड
25. मंडणगड
26.मनसंतोषगड
27. मनोहरगड
28. महादेवगड
29. महिपतगड
30. यशवंतगड
31. रसाळगड
32. राजापूरचा किल्ला
33. रायगड
34. विजयगड
35. विजयदुर्ग-घेरिय ा
36. वेताळगड
37. सर्जेकोट
38. साठवली
39. सावंतवाडीचा किल्ला
40. सिंधुदुर्ग
41. सुमारगड
42. सुवर्णदुर्ग
सांगली जिल्हा
1. तेरदाळ
2. दोदवाड
3. मंगळवेढे
4. शिरहट्टी
5. श्रीमंतगड
6. सांगली
7. येलवट्टी
सातारा जिल्हा
1. अजिंक्यतारा
2. कमालगड
3. कल्याणगड
4. केंजळगड
5. चंदन
6. जंगली जयगड
7. गुणवंतगड
8. प्रचितगड
9. प्रतापगड
10. पांडवगड
11. बहिरवगड
12. भूषणगड
13. भोपाळगड
14. मकरंदगड
15. मच्छिंद्रगड
16. महिमंडणगड
17. महिमानगड
18. सज्जनगड
19. संतोषगड
20. सदाशिवगड
21. सुंदरगड
22. वर्धनगड
23. वंदनगड
24. वसंतगड
25.वारुगड
26. वैराटगड
🚩🚩जय शिवराय🚩🚩