! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Wednesday, 5 November 2014

॥ लोकराजा शाहूमहाराज ॥

खुप छान कथा आहे.....
आठवडी बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून
घराकडे निघाली होती. आया-
बाया चपला फरफटत पाय उचलत होत्या.
धुरळ्याची रंगपंचमी झाली होती नुसती.
म्हातारी आजी पाटी कमरेवर घेऊन ताठ
उभी राहिली. फाटक्या चपलेला वादी बांधून
त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट
झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली.
लाडवांची पुरचुंडी प्लास्टिकच्या पिशवीत
चुंबळीच्या पदराखाली सरकवली.
आजी एस्.टी.च्या खांबाशी पोहोचते,
तो एस्.टी.निघून गेली होती. बांगडीवाल्या मुलाने
तिला हटकलंच,
म्हातारे, आज उशीरसा?'
माल संपेसंपेतो उशीर झाला होता. पण आज
बक्कळ पैसे जमले होते. त्यातूनच तिनं
खरेदी केली होती. कुणाला तरी हे उत्साहानं
सांगावं, असं तिला पण वाटत होतं. तेवढ्यात
समोरुन मोटार येताना दिसली.
आजीने चकटनं विचार केला, एस्.टी.ला दोन आणे
पडणारच होते. याला एक आणा जास्त देऊ. पण
अंधारायच्या आतं घरी तर पोहोचू!
आजीने आपला काळा फाटकोळा हात
झेंड्यासारखा हलवला. गाडी कचकन ब्रेक लावून
थांबली. ड्रॉयव्हर तसा रुबाबदार गडी वाटला.
तो आजीकडे बघून हसला.
"काय पायजे आजी?" त्यानं
विचारलं.आजीला त्यातला त्यात बर वाटलं.
म्हणाली, "माका सत्तर मैलार जांवचा आसा.
सोडशील रे? "यष्टी चुकली बग!'
ड्रॉयव्हर खाली उतरला.
म्हातारीची पाटी डिकीत
टाकली आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर
बसायला सांगितलं. आजी हरकली. चक्क पुढं
बसून जायचं? आणि गाडीत कोणी पॅसेंजर्च
नाही. पण तिला हळहळपण वाटली.
बिचाऱ्या ड्रॉयव्हरला आज मिळकतच नाही.
ती म्हणाली, "ह्यां बग, यष्टीवाले दोन आने घेता.
मियां तुका तीन आणे देतयं. चलात?''
ड्रॉयव्हर हसत म्हणाला, "आजी, तुला परवडतील
ते दे. तू मला मायसारखी ''
आजीचाजीव सुपाएवढा झाला. ती मायच्याच
हक्कानं ऐसपैस बसली. गाडी सुरु
झाली.बांगडीवालामुलगा तोंड वासून आश्चर्यानं
पाहत होता. गाडी हलली तसा तो ओरडलाच, "अगे
म्हातारे..... -पण आजीला आता त्याच्याकडे
बघायला सवड कुठं होती?
मऊ गादीवर आजीला फार सुख वाटलं,
एस्.टी.सारखी गर्दी नाही, कचकच नाही.
गाडी कशी भन्नाट निघाली होती. आजीनं
मनातल्या मनात ड्रॉयव्हरला मार्क देऊन टाकले.
दिवस भराच्या उन्हान,धुळीनं ती थकली होती.
आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी आली.
"आजी, तुझा सत्तर मैलाच्या दगड आला बघं.
इथंच उतरायच ना?"
आजी खडबडून उठली. कनवटीचे तीन आणे काढून
ड्रॉयव्हरच्याहातावर ठेवले. तेवढ्यात त्यान
डिकीतून तिची पाटी काढून दिली.
म्हाताऱ्या आजीला काय वाटलं कोण जाणे.तिनं
अलवार हातानं पुडी उलगडली.
त्यातला शेवकांडचा एक लाडू काढला.
ड्रॉयव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली,
"खा माझ्या पुता! "
ड्रॉयव्हरनं हातातल्या लाडवाकडं
आणि म्हातारीकडं डोळे भरुन पाहिलं
गाडी निघाली, तसा बाजूला उभा असलेला माणूस
म्हणाला,
"कुणाच्या गाडीतून इलंय?""
"टुरिंग गाडीतनं." आजी म्हणाली
आजीचं बोलणं ऐकून तो माणूस आणखीच
बुचकळ्यात पडला. तशी आजी खणखणीत
आवाजात म्हणाली
"तीन आणे मोजूनदिलंय त्येका",
"त्यांनी ते घेतलं?
अग म्हातारे तुझं डोकं फिरलं काय? टुरिंग कार
नव्हती ती.आपल्या राजांची गाडी.
या आपल्या  कोल्हापूरच्या शाहु महाराजांच्या शेजारी बसून आलीस
तू!'' दुसऱ्यानं माहिती पुरवली.
"अरे माझ्या सोमेश्वरा, खळनाथा'' म्हणत
म्हातारी भुईला टेकली. गाडी गेली त्या दिशेनं
तिन भक्तिभावानं हात जोडले. आपल्याला `माय'
म्हणणाऱ्या आणि गरिबांच्या टोपलीतला शेवकांडाचा लाडू
खाणाऱ्या,त्या लोकराजाच्या आठवणीनं,तिच
अंतःकरण भरुन आलं.

याला  म्हणतात " लोकराजा"...

॥ शिवबा लाखात नाही तर जगात एक ॥

अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात
"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू" हा 100
मार्काचा पेपर
घेतला जातो.
पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात
"आदर्श राजा असा असावा"
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो.
अनेक देशांमध्ये आदर्श राजे
छत्रपतींचा इतिहास
अभिमानाने शिकवतात.
पण आमचं दुर्दैव.......
आमच्याकडे शिवरायांचा इतिहास
पुसण्याचाच प्रयत्न केला जातो.
गर्व असेल
शिवाजी महाराजांच्या भूमीत
जन्म घेतल्याचा तर आदशॆ ठेऊण शेयर
करा ..
शिवाजी महाराज जर मुसलमानांचे
विरोधक असते
तर …
शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख
कोण होता ?
…. "इब्राहीम खान"...!
…. ,
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख
कोण होता ?
…"दौलत खान"....!
…,
शिवाजी महाराजांच्या
घोड-दलाचा प्रमुख कोण होता ?….
"सिद्दी हिलाल"......!
शिवाजी महाराजांचा पहिला
सर-सेनापती कोण होता ?
…. "नूर खान"…. !
शिवाजी महाराजांबरोबर
आग्र्याला गेलेला …
"मदारी मेहतर"…. …।
शिवाजी महाराजांचा एकमेव वकील
…."काझी हैदर" …।
शिवाजी महाराजांचे एकमेव
चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे
नाव
...."मीर मोहम्मद" ……
आणि शिवाजी महाराजांना
अफझलखानाचा वध
करण्यासाठी वाघनख्या पाठवून
देणारा…
"रुस्तुमे जमाल" हा हि मुसलमान…।
जर एवढे मुसलमान
अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात
असू शकतात तर शिवाजी महाराज
मुसलमानाचे विरोधक असू शकतात
काय ?…।
शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड
होते त्यापैकी 10 मुसलमान होते … ….
शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद
पाडली नाही । एकही कुराण जाळले
नाही ….
याचा गांभीर्याने विचार या देशात
झाला पाहिजे ….
रायगड
किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे
जगदीश्वराचे मंदिर बांधले …
महाराजांनी मंत्र्याला विचारले,"जगदीश्
वराचे मंदिर बांधले" पण
माझ्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद कुठे
आहे ?…
मंत्र्याने विचारले महाराज
जागा दाखवा ….??
महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील
जागा दाखवली आणि तेथे
आपल्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली
… हा इतिहास आपल्या देशात
का सांगितला जात नाही ?….
हा इतिहास जर समाजापुढे गेला तर
या देशात सामाजिक दुरी निश्चित
नाहीशी होईल ….
अफझल खानाला मारल्यानंतर
शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले
……
जिजाऊनि विचारले ,
अफझल खानाचे काय झाले ?
महाराज उत्तरले,
'मासाहेब'
अफझल खान मारला गेला ….
जिजाऊनि विचारले
त्याचं प्रेत कुठ आहे ?
….
महाराज उत्तरले,
प्रतापगडाच्या पायथ्याशी ….
काय म्हणाल्या जिजाऊ ?
…. शिवबा... अफझल खान जिवंत
असेपर्यंत त्याच्याशी वैर होते, अफझल
खान संपला(मेला ) आता वैरही संपले...
तुझ्या राज्यात
कोण्या प्रेताला कोल्हया-कुत्र्याने
तोडावे हे शोभणार नाही ….
त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर …
आणि तुझ्या विजयाचे प्रतिक म्हणून
तेथे स्मारक बांध …। .
शिवाजी महाराजांनी अफझल
खानच्या प्रेताचे
प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले
व तेथे त्याची कबर बांधली ….
"जय शिवराय "
""16 व्या शतकात शिवनेरीवर एक
तारा चमकला ...
जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला,
पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला ,
ज्याच्या हातुन महाराष्ट्र घङला .""
कृपा करुन
हा आपल्या राजाचा इतिहास
लोकांसमोर आणून
जगाला दाखवा की,
"
आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध
नसुन तो फक्त अन्यायाविरुद्ध होता"!!
सर्वाना विनंती आहे कि,
काळजीपूर्वक वाचा व विचार करा .
शक्य तेवढा फोरवर्ड करा..
लाईक आणी कमेंट करण्यापेकश्या शेयर
कले तर खुप आनंद होईल...
॥ जय जिजाऊ-जय शिवराय " ॥