! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Sunday, 21 September 2014

! " शिवरायांचे पराक्रमी मावळ॓ जिवा महाले " !

जिवा महाला

 "होता जिवा म्हणून वाचला शिवा"    प्रतापगडाच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजाँनी अफझलखानाचा कोथळा बाहेरकाढला. त्या वेळी सय्यद बंडा या अफझलखानाच्या रक्षकाने छत्रपती शिवाजीमहाराजांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला; परंतु छत्रपती शिवाजीमहाराजांच्या सैन्यातील शूर सरदार जिवा महाला यांनी मध्ये पडुन तो वारपरतवून लावत सय्यद बंडाचा हातच छाटला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राणवाचवले. जिवा महालाच्या या शौयाने इतिहासात अजरामर ठरलेला "होता जिवाम्हणून वाचला शिवा" हा वाकृप्रचार रूढ झाला.

1 ) जिवा महाले यांची रोहिडा किल्लेयांवरिल समाधी

! " शिवरायांचे पराक्रमी मावळे शिवा काशिद " !

शिवा काशिद

        शिवा काशिद हा एक शिवरायाचा सरदार होता.त्याने शिवरायाच्यावर व आपल्या स्वराज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले म्हणुन शिवाजीराजे सुखरुप् सिददी जोह‍रच्या वेढयातुन सुटुन आले व विशाळगडावरति पोहचले .शिवा काशीद हा हुबेहुब शिवरायासारखा दिसत होता. त्यामुळे सिद्दि जोहरला वाटले कि हाच शिवाजी ! म्हणुन त्याने व त्याच्या सरदारांनी शिवा काशीदला पकडले व हा शिवाजी नाही असे कळताच जोहर म्हणतो कसा 'शिवा काशीद आता तु मरणाला तयार हो'.ते ऐकुन शिवा काशीद म्हणाला 'शिवाजीराजे आता सुखरुप् वेढयातुन सुटले असतील आता मी सुखाने मरण्यास तयार आहे'.तसेच शिवरायासाठी हजारदा मरण्यास मी सुखाने तयार आहे'. हे ऐकुन जोहरने त्याचे शिर कापुन टाकले.अशा प्रकारे शिवा काशिदला वीर मरण आले.अशा या वीर मावळ्याचा पराक्रम अजुनही जनतेस माहीत नाही.इतिहास:(म‍राठयाचा)इतिहास हि त्याच्या पराक्रम विसरु शकणार नाही,कारण शिवा काशिद सारख्या मावळ्याच्यामुळेच व त्याच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवाजीराजे साकार करु शकले. म्हणुनच रयत सुखाने व स्वाभिमानाने जगु लागली.शिवा काशिद या मर्द मावळ्याची समाधि अजून हि पन्हाळगडाच्या पायथ्याशी विशाळगडाकडे जाणार्‍या वाटेतिल गावापाशी दुरावस्थेत आहे. शिवा काशिद हा महाराजांचा न्हावी होता. त्याची अंगकाठी रुपरेषा ह...ीशिवाजी महराजांसारखिच होती. जर शिवा काशिदास महाराजांचे कपडे घातले तरनवीन माणुस नक्की फ़सेल. त्या रात्री पन्हाळगडावरुन दोन पालख्या निघाल्या.एक महाराजांची आणी दुसरी शिवा काशिद. एक विशाळगडाकडे व दुसरी सिद्धीजोहरकडे.हे तर आपण जाणलच असेल की सिद्धी जोहरकडे गेलेला शिवाकाशिद वीर मरणास प्राप्त झाला. पण मरण्या आधी प्रहर दोन प्रहर का होइना एकसामान्य मावळा राजा झाला. स्वत: मृत्युच्या मुखात गेला जेणे करुन त्याचाराजा काही अंतर का होइना शत्रु पासुन दुर जाइल.धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळेसुड घेण्या अफ़जल वधाचा पेटुन उठली होती अदिलशाहीपुणे प्रांतात धुमाकुळ घालत होती शास्ता रुपी मोगलाईनिघाली एक फ़ोज मोठी विजापुरीमहराज होते त्यावेळी कोल्हापुरीवेढा घातला होता पन्हाळ्यास सिद्दीने४० हजारी फ़ोज लढत होती जिद्दीनेउन पावसाची न करता तमा फौज लढली महिने चारवेढा असाकी अवघड होते लहान ही मुंगीस करणे पारकरुन संपले प्रयत्न मरठ्याचे पन्हाळगडाबाहेरील सारेफ़िरले होते महाराजांचे नशिब, उलटे वाहत होते वारेरात्री एक शोधुनि बिकट वाट गडावर आला हेर महादेवगडावरी पाहुन त्यास भरीला सर्वामध्ये नवा चेवपाहत होते वाट राजगडी सर्वासह मॉ साहेब जीजाईगाजवण्या शोर्य आले पुढे बाजी प्रभु आणी शिवा नाई.राजे निसटले पोहचली सिद्दीच्या गोटात बातजणु काही अदिलशाहीवर झाला प्रचंड वज्रघातअंगकाठी रुपरचना होती शिवा न्हाव्याची महारांजा सारखीकरुनी राजांचा पोषाख भुलवण्यास गनीम तयार दुसरी पालखीशिवा काशिदास दिसत होते समोर आहे मरणपण गेला तो शिवाजीराजे बनुन सिद्दीस शरणप्रगटता रुप खरे शिवा काशिदचे, किंचाळुन तलवार फ़ाजिलखान खुपसवितोमरताना शिवा काशिद बोलतो "सोंगाचा मी शिवाजी म्हणुन काय पालथा पडतो?"समोर दिसत होते सिद्दीरुपी शिवा काशिदास अंतस्वराज्यासाठी केली नाही स्वामीनिष्ठानी जिवाची खंतगजापुरच्या घोड खिंडीत बाजी प्रभुनी घडवला एक इतिहासपण विसरु नका तुम्हीही शिवा काशिदचा स्वराज्याचा ध्यास


1) शिवा काशिद यांचे स्मारक
2 ) शिवाकाशिद समाधी स्थळ

! " शिवरायांचे पराक्रमी मावळ॓ बाजी पासलकर " !

सह्याद्रीला, या स्वराज्याला, या शिवराज्याला आपल्या रक्ताने अभिषेक घालणाऱ्या मावळ्यांना मानाचा मुजरा...

बाजी पासलकर

बाजी पासलकर हे मोस मावळखोर्यातचे वतनदार.निगडे मोसे गावापासून ते सांगरून-डावजेपासून,धामन-ओव्होळपर्यंतची ८४ खेडी त्यांच्या वतनदारीत होती.अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते.तंटे सोडविण्यात ते हुशार होते.इतिहासात बाजी पासलकर नावाच्या दोन व्यक्ती होत्या.पहिले बाजी बेलसरच्या युध्दात मरण पावले तर दुसरे सवाई बाजी काय सावंताबरोबरच्या युध्दात मारले गेले.छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती.शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती.जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली.तोरणा, सुभानमंगळ,रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले.विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या.शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता.खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला.मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता.छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले.त्यांनी एका रात्रीत गड सर केला.तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर,कान्होजी जेधे,बाजी जेधे,गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले,अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला,पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला.गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले.बाजी पासलकर,कान्होजी जेधे,गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली.फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले.दोघात तुंबळ युध्द झाले.अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला.मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला. त्याशी खासाखाशी गांठ पडली.एकास एकांनी पंचवीस जखमा करून ठार पडले.मग उभयतांकडील दळ आपले जागियास गेले.        बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला.पुण्याजवळील वरसगाव धरणातील जलाशयाला बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे.पण दुर्दैव असे की याच धरणाच्या जलाशयात त्यांचा चिरेबंदी वाडा तसेच त्यांच्या वंशजांची शेकडो एकर जमीन बुडाली आहे,याचा मोबदला त्यांना शासनाकडून अजूनही मिळाला नाही.त्यांचे वंशज आजही त्यांच्या स्मृती जतन करण्याचे काम करत आहेत.

! " शिवरायांचे पराक्रमी मावळ॓ मूरारबाजी प्रभू " !

 मुरारबाजी देशपांडे

   १६६५च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी घाईघाईने राजगड गाठला. औरंगाबादहून निघालेल्या शाही फौजा सासवडला पोचल्या होत्या. २९ मार्च रोजी पुरंदरला वेढा पडला. १५ दिवस घमासान लढाई झाली. १४ एप्रिल रोजी पुरंदरचा जोडकिल्ला वज्रगड मुघलांनी काबीज केला. आता अंतिम लढाई सुरु झाली होती. किल्लेदार मुरारबाजी यांनी जीवाची बाजी लावली. मराठा इतिहासामध्ये ते अमर झाले. आजही तुम्ही कधी पुरंदरला गेलात तर मुरारबाजींचा पुतळा बघून त्यांच्या शौर्याची गाथा कळते. किल्लेदाराबरोबर किल्लाही पडला.तह व्हायच्या आधी शिवाजीराजांनी मिर्झाराजाला एक पत्र पाठवले होते. या पत्रामधून तत्कालीन परिस्थितीचे आणि शिवरायांच्या मन:स्थितीचे यथार्थ चित्रण झाले आहे. हे पूर्ण पत्र वाचावे असेच आहे. पत्रामध्ये राजे म्हणतात,"तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे."
    सर्वत्र सुरु असलेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन राजांनी मुघलांशी तह करायचे ठरवले. पुरंदरचा तह घडला. १६ वर्षात जे कमावले ते सर्व या तहात राजांनी गमावले. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती. सोबत होती ती फक्त प्रचंड आत्मविश्वासाची, निर्धाराची, जिजाउंच्या आशीर्वादाची आणि स्वराज्यस्वप्न साकार करायचेच ह्या ध्येयाने झपाटलेल्या सोबतींची. तहानंतर शिवाजीराजे कुतुबशहा आणि आदिलशहाच्यासाथीने मुघलांविरुद्ध संयुक्त आघाडी उभी करतील अशी भिती मिर्झाराजाला होती म्हणून त्याने बादशहाला कळवले की 'कुठल्याही परिस्थितीत शिवाजीला आपल्याकडे वळवून घ्यायला हवे. त्यासाठी मी शिवाजीला आपल्या दरबारी पाठवत आहे.' मिर्झाराजाने राजांना आग्रा येथे जाण्यास तय�
[



यार केले आणि त्याप्रमाणे ५ मार्च १६६६ रोजी राजे आग्रा येथे जाण्यास निघाले. स्वतःच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त खुद्द औरंगजेबाने त्यांना पत्र पाठवून आमंत्रित केले होते. 'मनात कुठलीही चिंता किंवा शंका न ठेवता मला भेटायला या. आपला येथे सत्कार केला जाईल आणि तुम्हाला पुन्हा दख्खनेत जाण्याची मुभा असेल.' मजल-दरमजल करत शिवाजीराजे १२ मे रोजी तेथे पोचले.

! " शिवरायांचे पराक्रमी मावळे विर तानाजी मालूसरे " !

तानाजी मालुसरे

  छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्र्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते.
मृत्यू:     फेब्रुवारी ४ , १६७०,
सिंहगड, पुणे, महाराष्ट्र, भारत
चळवळ:   हिंदवी स्वराज्य
धर्म:      हिंदू
अपत्ये:   रायबा

बालपण
    सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे.
कामगिरी
     छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले.स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले.
कोंढाणा किल्ला
          स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या(जिजाबाई) इच्छेखातर; कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेला दिली होती. जेंव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेंव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्नात होते. त्यानी ते लग्न �
[
लग्न अर्धे सोडले आणि जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. निघण्यापूर्वी त्यानी जे शब्द बोलले ते मराठ्यांसाठी बोधवाक्य आहे, "आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे."
  गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती होते. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य नवमी) रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता चढणे दिवसासुध्दा अशक्य होते. तानजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करुन त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वत:चे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७०रोजी घडली.
तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसऱ्या दिवशी राजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना ही बातमी समजल्यावर महाराजांना खूप दुःख झाले. महाराज म्हणाले "गड आला पण सिह गेला".अत्यंत दुःखी अश्या राजांनी आपल्या तानाजीचे शव त्यांच्या 'उमरठ' (पोलादपुरजवळ) या गावी पाठवले. ज्यामार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'विरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारक सुद्धा उभे केले गेले आह
तानाजी मालुसरेंच्या स्मृतीप्रित्यर्थ गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले.

किल्ले सिंहगढ येथील तानाजी मालूसरे यांची समाधी

! " शिवरायांचे पराक्रमी मावळे " ! ( बाजीप्रभू देशपांडे )

स्वामीनिष्ठ शूरवीर मावळे- बाजीप्रभू देशपांडे
आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरूपौर्णिमेच्या दिवशी  आपल्या पराक्रमाने... रक्ताने घोड़खिंडला पावनखिंडीत बदलणारे...आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूंशी झुंजणारे स्वामिनिष्ठ  शिवरायांचे शूरवीर मावळे बाजीप्रभू देशपांडे...

बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. बाजीप्रभू हे शिवाजीराजांना विरोध करणाऱ्या बांदलांचे दिवाण होते, परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते.

इ.स.२ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते. मुसळधार पावसात सुध्दा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता. या कठीण प्रसंगी महाराजांनी सिध्दीस तहाचा निरोप धाडला त्यामुळे सिध्दी गाफील राहिला. शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिध्दी जोहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला. प्रचंड पावसाचा फायदा घेत शिवराय पन्हाळ्यावरुन निसटले. सिद्दीजोहरला शिवा काशीद चे खरे रूप आणि राजे आपल्या हातून निसटल्याचे कळले तसेच त्यांनी त्यांचा सिद्दी मसूद आणि फाझलखानाला शिवरायांच्या मागावर पाठवले.
शिवरायांचे ६००मावळे पालखी घेऊन वारा - पावसाची तमा न बाळगता, काटेरी रान आणि दगड - चिखल - माती तुडवत विजेच्या वेगाने विशाळगडाकडे  पळत सुटले होते. बाजी - फुलाजी पालखीच्या बाजूने हातात नंग्या त�
[21:27, 21/09/2014] Fakt BJ: नंग्या तलवारी घेउन धावत होते. प्रचंड वेगाने पालखी घोड़खिंडीकड़े पळवली जात होती. सिद्दीमसूदचे सैन्य घोड्यावरुन राजांचा पाठलाग करत होते. पन्हाळगड सोडल्यापासून १२ तासात कोणी थोडया विश्रांतीसाठी सुद्धा थांबले नव्हते. एका ध्येयाने भारावल्यागत ते ६०० वीर विशाळगडाकड़े पळत सुटले होते. महाराज पांढरपाणीला येउन पोचले त्यावेळेला घोड्यावरुन राजांचा पाठलाग करणारे सिद्दीमसूदचे सैन्य अगदी जवळ येउन ठेपले होते.

धोका वाढत जातोय आणि  कुठल्याही क्षणी शत्रूंची धाड पडेल असे वाटत असतानाच  मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले, राजांनी रायाजी बांदलाला ३०० मावळे सोबत घेऊन खिंडीमध्ये शत्रूला रोखायचे काम दिले. पण स्वामीभक्त बाजींनी आपल्या मालकाऐवजी म्हणजेच रायाजीऐवजी मी ह्या ठिकाणी थांबतो, तुम्ही रायाजीला सोबत घेऊन विशाळगड गाठा, असे बाजींनी राजांना सुचवले. जोपर्यंत तुम्ही छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असे सांगितले. राजे उरलेले मावळे सोबत घेऊन विशाळगडाकड़े निघाले आणि बाजींनी खिंडीमध्ये आपली व्युव्हरचना केली. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते.ए


क-एक मावळा त्वेषाने लढत होता. दहा-दहा जणांना पुरून उरत होता. बाजीप्रभूंनी तलवारीच्या टप्यात येणाऱ्या प्रत्येकजणाला यमसदनी पाठवले. स्वतःच्या देहाची जणू काही त्यांनी तटबंदी करून घेतली. बाजीप्रभूंचे थोरले बंधू फुलाजीप्रभू सुद्धा तितक्याच त्वेषाने लढत असतांना शत्रूने त्यांच्यावर डाव साधला आणि ते खाली कोसळले. त्यांच्या हातून खड्ग गळाले. बाजीप्रभूंनी एक नजर त्यांच्याकड़े पाहिले आणि म्हणाले, "दादा, तुम्ही थोरले. पहिला मान तुम्ही घेतला."  फुलाजीप्रभुंची तलवार दुसऱ्या हाती घेऊन बाजीप्रभू अधिक त्वेषाने लढले. रक्ताचे अर्ह्य ओसंडत असतांनाही त्यांनी शत्रूंची वाट सोडली नाही. शत्रूंच्या पायदळ सैनिकामधून एकाने ठासणीच्या बंदूकीतून बाजीप्रभूंवर गोळी झाडली. ती गोळी बाजीप्रभूंच्या खांद्यात घुसली आणि त्यांचा शस्त्राचा एक हात थांबला. लढता-लढता ते खाली कोसळले. राजे जोपर्यंत गडावर पोचून तोफांचे बार देत नाहीत तोपर्यंत त्यांनी मृत्युला ठणकावून सांगितले "तोफे आधी न मरे बाजी."

सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता.

विशाळगडाला वेढा घालून बसलेल्या सुर्वे आणि दळवी या आदिलशहाच्या वतनदारांच्या सैन्याला कापत सतत २१ तासांच्या वाटचालीनंतर राजांनी विशाळगड गाठला आणि गडाच्या किल्लेदाराला त्वरेने तोफांचे बार देण्याची आज्ञा केली. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने बाजीप्रभूंनी प्राण सोडले.  या युध्दात मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० मावळे कामी आले तर मसूदचे जवळपास ३००० सैनिक मारले गेले.
.
बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या अभूतपूर्व पराक्रमाने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.

शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही मोठा पराक्रम गाजविनाऱ्या बाजीप्रभू-फुलाजीप्रभू देशपांडे आणि शूरवीर शिवा काशीद यांना कोटी कोटी प्रणाम....!!!


! " तिसरे सरसेनापती हंबीरराव मोहिते " !


हंबीरराव मोहिते

सेनापतीपदी निवड

आदिलशाही सरदार बहलोलखान याच्याबरोबरच्या लढाईत सेनापती प्रतापराव गुजर पडले.प्रतापराव पडल्याची वार्ता कळताच,प्रतापरावांच्या फौजेत असलेल्या हंबीरराव मोहिते यांनी सर्व सैनिकांत हिंमत निर्माण करून, बहलोलखान वर आक्रमण करून त्याच्या सैन्याची दाणादाण उडवून त्यांस विजापूरपर्यंत पिटाळले.

बहलोलखानाविरूध्द पराक्रमाने महाराजांना हंबीररावामध्ये शहाणा,सबुरीचा सेनानी दिसला.चिपळून जवळच्या श्रीक्षेत्र परशूराम येथे या सेनानीस महाराजांनी आपला सेनापती म्हणून निवडले.सभासद म्हणतो,'प्रतापराव पडले ही खबर राजियांनी ऐकून बहूत कष्टी जाले,सरनोबत कोण करावा?अशी तजवीज करून,आपण स्वस्थ लष्करांत येऊन,लष्कर घेऊन कोकणांत चिपळून जागा परशूरामाचें क्षेत्र आहे,तेथें येऊन राहिले.मग लष्करची पाहाणी करून लहान थोर लष्करास व पायदळ लोकांस खजीना फोडून वाटणी केली,आणि सरनोबतीस माणूस पाहातां हंसाजी मोहिते म्हणून पागेमध्यें जुमला होता;बरा शहाणा,मर्दाना,सबुरीचा,चौकस,शिपाई मोठा धारकरी पाहून त्यास 'हंबीरराव' नाव किताबती देऊन सरनोबती सांगितली.कुल लष्कराचा गाहा करून हंबीरराव यांचे ताबीज दिधले.

बहादूरखान,दिलेरखानादींना नजरेत धरले नाही

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर हंबीररावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या फौजांनी दोन वर्ष मोघल व आदिलशाही भागातून मोठी लुट मारून आणिली.या कालातील हंबीररावांची कामगिरी वर्णन करताना सभासद म्हणतो,'राजियांनी आपले लष्करास हुकूम करून हंबीरराव सरनौबत फौज घेऊन मोंघलाईत शिरले. खानदेश, बागलाण, गुजराथ, अमदाबाद,बुर्‍हाणपूर,वर्‍हाड,माहूर मारून खंडणी करून जप्त केला.मालमत्ता अगणित जमा करून चालिले.तो बहादूरखान यांनी कुल जमाव घेऊन हंबीररायाचे पाठीवर चालून आले.राजियाची फौज तोलदार गाठली.मोंघल ब�
[0   गाठली.मोंघल बहुत धास्तीने घाबरा होऊन सात-आठ गावांचे अंतराने चालिला.दिलेरखान उतावळा होऊन फौजेशी गाठ घातली.हंबीरराव यांनी नजरेत धरला नाही.तोलदारीने मत्ता घेऊन आपले देशास आले.मालमत्ता राजियास दिली.
1) हंबीरराव मोहिते छायाचिञ
2 ) हंबीररावाचं स्मारक
3 ) हंबीररावांची तलवार




! " दूसरे सरसेनापती प्रतापराव गूजर " !


प्रतापराव गुजर
।। वेडात मराठे वीर दौडले सात ।।

वेडात मराठे वीर दौडले सात असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते ते शूर सेनानी म्हणजे,प्रतापराव गुजर,विसाजी बल्लाळ,दिपोजी राउतराव विठ्ठल,पिळाजी अत्रे,कृष्णाजी भास्कर,सिद्दी हिलाल व विठोजी होय.प्रतापराव गुजर या महान सेनापतीने मोठा पराक्रम केला होता.त्यांचे व बेलोलखान यामधील युध्द इतिहासात प्रसिध्द आहे.या सात वीरांनी सुमारे बारा हजारच्या बेलोलखानाच्या सैन्यावर चाल करून मोठा पराक्रम केला.ही लढाई कोल्हापूरजवळच्या नेसरी येथे झाली.

सभासदाच्या बखरीत प्रतापराव गुजर या महान सेनानीबद्दल पुढीलप्रमाणे लिहिले आहे.पन्हाळगडाच्या लढाईच्या समयी नेताजी पालकर समयास न आल्यामुळे मराठ्यांचे मोठे नुकसान झाले होते.यामुळे राजियांनी नेताजी पालकर यास बोलावून आणिला,आणि 'समयास कैसा पावला नाहींस?'म्हणून शब्द लावून,सरनोबती दूर करून,राजगडचा सरनौबत कडतोजी गुजर म्हणून होता,त्यांचे नाव दूर करून,प्रतापराव ठेविले,आणि सरनोबती दिधली.प्रतापरावांनी सेनापती करीत असतां शाहाण्णव कुळींचे मराठे चारी पादशाहींत जे होते व मुलखांत जे जे होते ते कुल मिळविले.पागेस घोडीं खरेदी केलीं.पागा सजीत चालिले व शिलेदार मिळवित चालिले.असा जमाव पोक्त केला.चहूं पादशाहीत दावा लाविला.

विजापूराहून आलेल्या बेलोलखान याने बारा हजार स्वारांनिशी स्वराज्यावर चाल करून मोठा धुमाकूळ घातला होता,रयतेवर अनन्वित अत्याचार केले होते.महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा हुकूम केला.प्रतापरावांनी गनीमीकाव्याने बहलोलखानास जेरीस आणून त्याचा पराभव केला.बहलोलखान आपल्या सैन्यासह शरण आला.शरण आलेल्या बहलोलखानास मोठ्या मनांनी प्रतापरावांनी त्यांस सोडून दिले.रयतेचे हाल करणार्‍या ‍बहलोलखानास सोडल्यामुळे महाराजांनी प्रतापरावांस,'बहलोलख�
[
धुळीस मिळवा असा हुकूम केला.प्रतापरावांनी गनीमीकाव्याने बहलोलखानास जेरीस आणून त्याचा पराभव केला.बहलोउलखान आपल्या सैन्यासह शरण आला.शरण आलेल्या बहलोलखानास मोठ्या मनांनी प्रतापरावांनी त्यांस सोडून दिले.रयतेचे हाल करणार्‍या ‍बहलोलखानास सोडल्यामुळे महाराजांनी प्रतापरावांस,'बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका.'असे पत्र धाडिले.राजियांचे पत्र मिळताच प्रतापराव सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले.आपल्या छावणीच्या जवळच असलेल्या नेसरी येथे बहलोलखानाचा तळ पडला आहे.असे हेरांकडून त्यांना कळाल्यावर ते तडक घोड्यावर बसून एकटेच बहलोलखानाच्या छावणीवर चालून निघाले.त्यांच्या पाठोपाठ विसाजी बल्लाळ,दिपोजी राउतराव विठ्ठल,पिळाजी अत्रे,कृष्णाजी भास्कर,सिद्दी हिलाल व विठोजी हे वीर होते.या सात वीरांनी बारा हजाराच्या सैन्यामध्ये घुसून शेकडो गनीमांना ठार मारिले.पण अखेरीस प्रतापराव आणि सोबतचे सहा वीर मरण पावले.केवढे हे शौर्य या सात वीरांचे?साक्षात समोर मृत्यु आहे हे माहीत असून,हजारों सैन्यावरी सात वीर चालून गेले.पराकोटीची स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यावरील प्रेमापोठी या सात वीरांनी स्वत:स मरणाच्या हवाली केले.ही घटना ऐकल्यावर महाराजांना अतीव दु:ख झाले.या सात वीरांचे स्मारक महाराजांनी नेसरीजवळ उभारले

! " पहिले सरसेनापती नेताजी पालकर " !

नेताजी पालकर

नेताजी पालकर यांचा इतिहासामध्ये 'प्रतिशिवाजी',दुसरा शिवाजी असा उल्लेख आहे.नेताजी स्वराज्याचे दीर्घ काळ सरसेनापती होते.आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक लढाया गाजविल्या.नेताजींचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर हे होय.अफजलखान व छत्रपतींच्या भेटीवेळी नेताजींने मोठा पराक्रम गाजविला होता.प्रतापगडाच्या लढाईच्या वेळी छत्रपतींनी नेताजीस खास कामगिरी सांगितली होती.

सभासद म्हणतो,राजे मातुश्रींचा आशीर्वाद घेऊन प्रतापगडास निघाले.नेताजी पालकर सरनोबत यास लष्कर घेऊन वर घाटावरि येणे म्हणोन सांगितले.आणि अफजलखानास जावलीस बोलावितो,सला करून भेटतों,विश्वास लावून जवळ आणितों,तें समयी तुम्ही घाटमाथा येऊन मार्ग धरणें,असे सांगितले.खानाचा वध झाल्यानंतर,राजे गडावरि जातांच एक भांड्याचा आवाज केला.तेच गडाखालील लोक व घाटावरील लोक व लष्कर व कोकणांतून मोरोपंत व मावळे असे चौतर्फी चोहोंकडून चालोन खानाचे गोटावरि आले.मोठें घोरोंदर युध्द जाहाले.रक्ताच्या नद्या चालल्या.रणकंदन जाले.प्रतापगडाच्या या युध्दात नेताजींनी मोठा पराक्रम गाजविला.

पुढे मिर्झा राजेसोबत झालेल्या पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराज,मिर्झा राजे, नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले होते.पण आदिलशाही सेनापति सर्जाखान याच्यासमोर त्यांना अपयश आले.त्यामुळे विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी राजे विजापुरहून पन्हाळ्यास आले,राजेंनी रात्रीच गडावर छापा घातला.पण किल्लेदार सावध असल्यामुळे मराठ्यांचा पराभव झाला,सुमारे १००० मावळे मारले गेले.


! " धम॔वीर संभाजी राजे " !



: ।।सिंहाचा छावा छत्रपती संभाजीराजे।।

श्री शंभो: शिवजातस्य, मुद्रा द्यौरिव राजते |
यदंकसेविनो लेखा,वर्तते कस्य नोपरि ||

छत्रपती शिवाजी राजे यांचे पुत्र श्री.संभाजी राजे यांची मुद्रा आकाशाप्रमाणे शोभत आहे.तिचे अंकसेवन करणाऱ्यांचा(आधार घेणाऱ्यांचा) पगडा सगळ्यांवर पडेल.

छत्रपती संभाजीराजे,ज्यांचे वर्णन सिंहाचा छावा म्हणून शोभते.आठ भाषांचा जाणकार असणारा हा महाराजा, ज्यांनी 'बुधभूषणम्' हा संस्कृत तर 'नायिकाभेद', 'नखशिख', 'सातसतक' हे ब्रजभाषेतील तीन ग्रंथ लिहिले.हा थोर राजा जसा लेखणीतही श्रेष्ठ होता तसा तो रणांगणात श्रेष्ठ होता.बुध्दिमत्ता आणि शौर्य श्रीशंभूराजामध्ये भरले होते.आपल्या नऊ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी स्वराज्याचा विस्तार दुप्पट केला,स्वराज्यातील एकही किल्ला गमावला नाही.मराठ्यांचे आरमार शक्तीशाली केले.कर्नाटकातील मराठी राज्य वाढविले,पोर्तुगीजांचे तीन चतुर्थांश राज्य जिंकले,औरंगजेबच्या सैन्याची दाणादाण उडविली,असा हा छावा. छत्रपती संभाजीराजे एकाच वेळी मोघल, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दीशी लढत होते.

श्री शंभूराजांचे निष्कलंक व्यक्तित्व समजण्यासाठी,शंभूराजांनी लिहिलेला खालील श्लोक पुरेसा आहे.(बुधभूषण,अध्याय दोन,श्लोक ४२२).यात त्यांनी राजाचे सात दोष वर्णिलेले आहेत.

व्यसनादि च सर्वाणि भूपति: परिवर्जयेत् |
सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया: ||४२२||

हे सात दोष पुढीलप्रमाणे आहेत,वादण्ड,पारूष्य,दुरयातंच,पान,स्त्री,मृगया आणि द्यूत.शंभूराजेंनी राजांना या सात दोषापासून दूर राहावयास सांगितले आहे.

श्रीशंभूराजांनी बुधभूषण या आपल्या संस्कृत ग्रंथात पानापानावर असे विचार मांडलेत.त्याकाळी राजाकडे जनानखाना असणे प्रतिष्ठेचे असताना शंभूराजांनी त्याचा निषेध केला तसेच बहूपत्नीव नाकारले.महाराणी येसूबाईंना स्वतंत्र राज-
[10:17, 21/09/2014] Fakt BJ: स्वतंत्र राज-मुद्रा देऊन राज्यकारभारामध्ये सामील करून घेतले.अशा थोर सेनानीचे कर्तुत्व झाकण्याचा प्रयत्न पेशवेकालीन बखरकारांनी केला.संभाजी राजांच्या कर्तुत्वाचे विकृतीकरण करणारी मल्हार रामराव चिटणीसाची बखर,संभाजी राजांच्या मृत्युनंतर १२२ वर्षांनी,सन १८११ साली लिहिली गेली.मल्हार रामराव चिटणीसाचे खापरपणजोबा बाळाजी आवजी चिटणीस यांस संभाजीराजेंनी स्वराज्यद्रोहाच्या आरोपामुळे हत्तीच्या पायी दिले होते,त्यामुळे मनात अढी ठेवून मल्हार रामराव याने बखर लिहिली.आजच्या युगातील काही तथाकथित विद्वान लेखक,नाटककार,इतिहासकारसुध्दा संभाजी राजांच्या कर्तुत्वाचे विकृतीकरण करण्यात आघाडीवर आहेत.संभाजीराजांच्या पराक्रमाविषयी आपण सविस्तरपणे पुढे चर्चा करणार आहोत.

छत्रपती संभाजीराजेंचा जन्म इ.स.१४ मे,१६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजीराजांच्या 'मातोश्री सईबाईंचे'निधन,संभाजीराजांच्या लहान वयात झाले. त्यामुळे पुरंदर किल्ल्याच्या जवळ असलेल्या कापूरहोळ गावातील 'धाराऊ'राजेंच्या दुधाई बनल्या.लहानपणापासूनच बुध्दिमान असलेल्या संभाजीराजेंनी युध्दाचे डावपेच,राजकारण लवकर आत्मसात केले.

! " मराठयांचे कैवारी छञपती शिवाजी महाराज " !




 मराठ्यांचे आराध्ये दैवत || छत्रपती शिवाजी महाराज ||

जन्म स्थान :  किल्ले शिवनेरी  जि. पुणे

समाधीस्थान : किल्ले रायगड जि. रायगड


कर्तबगार शहाजीराजांचे पुत्र शिवरायांचा जन्म जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ यांच्या पोटी झाला. शहाजी राजांचा निजामशाही वाचविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर ते आदिलशहाच्या पदरी राहून कर्नाटकात आदिलशाहीचा विस्तार करू लागले. दहाव्या वर्षी शिवरायांचा निंबाळकर घराण्यातील सईबाई यांच्याशी विवाह झाला. आपल्या वडिलोपार्जित जहागीरीची म्हणजे पुणे, सुपे भागाची देखभाल करण्यास शहाजी राजांनी जिजाउंसह शिवरायांना पुणे येथे ठेवले.कारभारी दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर शिवराय स्वतंत्रपणे जहागिरीचा कारभार पाहू लागले.
परकीय आणि अत्याचारी सुलतानशाह्या यांच्या विरुद्ध लढून स्वत: चे राज्य स्थापण्याचा उद्योग शिवरायांनी पुणे भागातील किल्ले ताब्यात घेऊन सुरु केला. रोहिदा, तोरणा,सिंहगड आणि पुरंदर या बळकट किल्ल्यांच्या आधाराने आणि मावळातील देशमुखांबरोबर सर्व सामान्य मावळ्यांच्या मदतीने सैन्य उभे करून शिवरायांनी आपली शक्ती वाढवायला सुरवात केली.

विजापूरच्या आदिलशहाने या उद्योगाने चिडून जाऊन शहाजी राजांना कैद केले आणि शिवराय यांच्याविरुद्ध फौज पाठविली. या सैन्याला पराभूत करून आणि मोगलांकडून दबाव आणून शहाजी राजांची सुटका करण्यास आदिलशहाला भाग पाडले आणि हि सलामीची लढाई शिवाजी महाराजांनी जिंकली.

जावळीच्या मोऱ्यांचा नायनाट करून श्री शिवरायांनी स्वराज्याच्या सीमा समुद्र पर्यंत भिडवल्या. आदिलशहाने प्रचंड फौजेसह पाठविलेल्या अफझल खानास ठार मारून विजापुरी सैन्य शिवरायांनी प्रतापगडाखाली बुडविले. या प्रचंड विजयाने शिवरायांचे नाव भारतभर प्रसिद्ध झाले.अफझल वधानंतर झपाट्याने आदिलशाही मुलखावर �
[17:14, 21/09/2014] Fakt BJ: आक्रमण करून शिवरायांनी अनेक किल्ले व बराच मुलूख ताब्यात घेतला. आदिलशहाने पुन्हा तयारी करून सिद्दी जौहर याला शिवराय यांच्या विरुद्ध पाठविले. पन्हाळा किल्ल्यावर शिवराय असताना सिद्दी जौहरने पन्हाळ्यास वेध घातला. या वेढ्यातून आपल्या जीवास जीव देणाऱ्या सहकाऱ्यांच्या मदतीने शिवराय अलगद पाने सुटले. विजापुरी फौजांविरुद्ध लढताना शिवा काशीद, बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू देशपांडे धारातीर्थी पडले.

यानंतर कोकण काबीज करून शिवरायांनी समुद्र किनाऱ्यावर आपले पाय रोवले. औरंगजेबाने शिवराय यांच्या विरुद्ध शायिस्तेखानला महाराष्ट्रात पाठविले. पुण्यात तळ ठोकून बसलेल्या शायिस्तेखानावर दोन लाख फौजेच्या गराड्यात शिरून शिवरायांनी हल्ला केला. शायिस्तेखानास परत बोलावून औरंगजेबाने पाठविलेल्या मिर्झा राजा जयसिंग याने महाराष्ट्रात जाळपोळ, लुटालूट करून प्रचंड सैन्यशक्तीच्या जोरावर शिवरायांना तह करण्यास भाग पाडले.तहाप्रमाणे आपले अनेक किल्ले मोगलांना देऊन आग्रा येथे भेटीस आलेल्या शिवरायांना औरंगजेबाने कैद केले. या कैदेतून आपल्या विलक्षण चतुराईच्या जोरावर शिवराय निसटून सुखरूप महाराष्ट्रात परत आले. तहात दिलेले किल्ले श्री शिवरायांनी तत्काळ परत घेण्यास सुरवात केली.आणि हि कामगिरी पार पाडताना तानाजी मालुसरे कामी आले.

शायीस्तेखानावरील हल्ल्यानंतर लुटलेले औरंगजेबाचे धनसंपन्न शहर सुरत शिवरायांनी पुन्हा लुटले. नाशिक जवळचा साल्हेर किल्ला ताब्यात घेऊन शिवरायांनी स्वराज्याची सीमा उत्तरेत बागलाण पर्यंत वाढविली.
[17:14, 21/09/2014] Fakt BJ: महाराष्ट्रातील शत्रूंना नेस्तनाबूत करून श्री शिवरायांनी ६ जून १६७४ रोजी रायगडावर विधीपूर्वक राज्याभिषेक करून घेऊन मराठ्यांच्या स्वतंत्र राजसत्तेची स्वतंत्र सिंहासनाची स्थापना केली. शिवराय छत्रपती झाले. या समारंभानंतर केवळ बारा दिवसांनी राजमाता जिजाऊ यांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रातील राज्य स्थिरस्थावर करून शिवरायांनी आपले लक्ष दक्षिणेकडे वळविले. गोवलकोंडा येथील कुतुबशहा याच्याशी मैत्रीचा तह करून साठ हजारांच्या सैन्यासह शिवरायांनी दक्षिणेत मुसंडी मारली. कोप्पळ, बहादूरबंडा, जिंजी, वेलोर हे महत्वाचे किल्ले जिंकून घेतले.स्थानिक राजवाटी यांच्याकडून खंडण्या घेत, विरोधकांना भुई सपाट करीत शिवराय तंजावर पर्यंत पोहोचले. तंजावरचे छत्रपती एकोजीराजे हे शिवरायांचे सावत्र बंधू होते. त्यांची भेट घेऊन शिवराय महाराष्ट्रात आले.

आग्रा भेटीपूर्वीच शिवरायांनी कोकणात व समुद्रात किल्ले बांधून सागरी सत्ता आपल्या हाती ठेवण्यास सुरवात केली होती. विरोधक सिद्दी आणि इंग्रज यांना न जुमानता मुंबईपासून वेंगुर्ल्यापर्यंत किल्ल्यांची साखळी निर्माण केली.

खांदेरी उंदेरी या सागरी दुर्गांच्या लढाईत इंग्रजांचा पराभव करून शिवराय रायगडावर आले. नेसरीच्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या सेनापती प्रतापराव गुजर यांच्या कन्येशी राजाराम महाराज यांचा शिवराय यांनी करून दिला. त्यानंतर तीन आठवड्यांनी रायगडावरच त्यांचे निधन झाले.


॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

! " राजमाता जिजाऊ " !



।। राजमाता जिजाबाई ।।
जशी चंपकेशी खुले फूल जाई ।
भली शोभली ज्यास जाया जिजाई ॥
जिचे कीर्तिचा चंबू जंबू द्विपाला ।
करी साऊली माऊली मुलाला ॥
(कवीश्रेष्ठ: जयराम पिंडे,शहाजीराजेंच्या दरबारातील रत्न)
अर्थ :एखादा मोठा बगीचा फुललेल्या जाईंच्या फुलाच्या ताटव्याने खुलून जातो त्याचप्रमाणे जिजाऊंच्या रूपाने शहाजी राजांचे जीवन सुशोभित झाले होते.पण शहाजीराजेंची पत्नी हीच जिजाऊंची ओळख नव्हती.जिजाऊंच्या कार्याचा,कर्तुत्वाचा गौरव सर्वदूर देशामध्ये व दिशामध्ये पसरला होता.अशा जिजाऊंनी साऊली होऊन आपल्या सुपूत्राला सर्वच प्रकारची सोबत,शिक्षण दिले.आई होऊन शिवबावर सावलीसुध्दा धरली.

राजमाता जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी (पौष पौर्णिमा शके १५१९) रोजी सिंदखेडराजा (बुलडाणा) येथे झाला.म्हाळसाराणी हे त्यांच्या आईचे नाव तर लखुजीराव जाधव हे त्यांच्या वडिलांचे नाव होते.दत्ताजी,अचलोजी,राघोजी व बहादुरजी हे त्यांचे वडिलबंधू होते.लखुजीराव वेरूळच्या यादव घराण्याचे वंशज होते.

जिजाऊंना अनेक भाषांचे ज्ञान अवगत होते.लखुजीराव जाधव निजामशाहचे वतनदार होते.आपल्या पराक्रमाऩे त्यांनी निजामशाहच्या दरबारात मानाचे स्थान पटकावले होते.इ.स.१६१० साली वेरूळ येथे निजामशाहच्या पुढाकाराने जिजाऊंचा विवाह शहाजीराजेंशी झाला.तो काळ मोठा धामधुमीचा होता.भोसले,जाधव,निंबाळकर,महाडिक,सुर्वे,शिर्के असे अनेक मराठा सरदार वतनापायी अदिलशाह,कुतूबशाह,निजामशाह,मोघल यांच्याकडे चाकरी करीत होते

" ! शहाजीराजे भोसले " !

।।स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले।।

वेरूळच्या मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांनी पुत्र व्हावा म्हणून अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस केला होता.त्यामुळे पुत्र झाल्यावर शहाजी व शरीफजी अशी आपल्या पुत्रांची नावे त्यांनी ठेवली.शहाजीराजेंचा जन्म इ.स.१८ मार्च,१५९४ रोजी झाला.

शहाजीराजेंचे पिता मालोजीराजे भोसले निजामशाहच्या चाकरीत होते. निजामशाहच्या दरबारात सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव हे सुध्दा चाकरीत होते.जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.पुढे निजामशाहच्या पुढाकाराने शहाजीराजेंचा विवाह,लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी जिजाबाई यांच्याशी इ.स.१६०३ मध्ये झाला.शहाजीराजें व जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये झाली.त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते.त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजीराजेंचा सांभाळ जिजाबाईंनी केला.

सासरे लखुजी जाधव यांच्याशी बेबनाव

मालोजीराजेंच्या दुदैवी मृत्यूनंतर शहाजीराजेंनी आपल्या पराक्रमाने निजामशाहच्या दरबारात मानाचे स्थान पटकावले.पुढे लखुजी जाधव व शहाजी राजे यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला,कारण होते पिसाळलेल्या हत्तीस काबूत करण्याचे.निजामशाहच्या दरबारातील एक हत्ती पिसाळला होता,हत्तीस पकडण्यास दोन पथके तयार केली गेली.पहिले पथक जाधवांचे होते,त्याचे नेतॄत्व लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाईचा भाऊ दत्ताजीराव जाधव करत होता.तर दुसरे पथक भोसले यांचे होते.त्याचे नेतृत्व शहाजीराजे भोसले यांचे बंधू संभाजीराजे भोसले करत होते.यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले.हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसल्यास ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासऱ्यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दडावर वारं लागलां