अर्नाळा किल्ल्यापासून सुमारे ७०० मीटर अंतरावर असणारा एकाकी बुरुज / मनोरा (टेहळणीसाठी). हा मनोरा पोर्तुगीजांनी बांधला. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार पुर्वी या बुरुजामधून एक गुहा (चोरवाट) थेट वसई किल्ल्यावर जात होती, परंतु काळाच्या ओघात ती बुजून गेली.
! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Sunday, 19 November 2017
गुलाबी थंडी हवीहवीशी,
गुलाबी थंडी हवीहवीशी,
जुळती नाती नवी-नवीशी.
'गारवा' गाणे कुडकुडत गुणगुणणे,
फुटल्या ओठांचे हलकेच हसणे.
हात चोळणे खांदे उंचावून,
स्वेटर न घालणे थंडी लागून.
एकच कप चहा दोघांनी पिणे,
खूप थंडी आहे....पुन्हा पुन्हा सांगणे.
पतंग उडवण्यासाठी धडपडने,
पतंगासोबतची उंचच स्वप्ने.
कधी रुसणे ......कधी रागवणे,
बोलण्यासाठी पुन्हा कारण शोधणे.
गोड बोलूया ... एकमेकांना सांगायचे,
तिळगुळ वाटत - घेत फिरायचे,
या वर्षीच्या गारव्यात एकदा
देईन वचन अन करेन वादा.,
स्वप्नासाठी तुझ्या प्रार्थना करीन
हवे तुला ते सारे मागेन.
शिवतीर्थ
मित्रांनो आपण इचलकरंजीत शिवतीर्थ पाहतोय. इथे असणारी शिवरायांची भव्य व सुंदर मुर्ती अख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील पूजा हि सुद्धा नित्यनियमाने केली जाते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ह्यांचेमार्फत शिवरायांची नित्यपूजा तसेच प्रत्येक पोर्णिमेला शिवमुर्तीस अभिषेक घातला जातो. आपणही ह्या पूजेत सहभागी होऊ.
।।पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय।।