! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Friday, 30 September 2016

मैत्री

मैञी हा असा हा शब्द आहे ज्य़ाचा अर्थ प्रेमा 
पेक्षा सुंदर अाहे ।।
मैञी हे अस नात आहे अाहे ज्याची जागा 
माझ्या हृद्याच्या अात अाहे ।।
मैञी ही जगन्याची वाट अाहे ज्यात तुझी
साथ अाहे ।।
मैञी ही मनाची भावना आहे जक्षी दिव्या मध्ये प्रकाश
देणारी वात  आहे ।।

Thursday, 22 September 2016

महाराज....

परवा एका IT क्षेत्रातली व्यक्ति मला म्हणाली तुला "अरे तुला शिवाजीत एवढा इंटरेस्ट का आहे ? जगात इतके पराक्रमी राजे आहेत ? सारख शिवाजी शिवाजी तो थोडीच जगातला सगळ्यात पराक्रमी राजा होता 😏😏"
तिला मी म्हणालो नीट ऐक
"मी जाणिवपूर्वक विधान करतो की शिवाजी महाराज हे सतराव्या शतकातले आंतरराष्ट्रीय किर्तीचे सेनानी होते जगात तुलना नाही असे राजे होते..."
माझं बोलणं मध्येच तोडत ती व्यक्ती  म्हणाली "सिध्द करून दाखव" ठीक आहे म्हणलं
तसंही लायब्ररीतील बरीचशी जनता डोकावून पाहत होती...म्हटलं यापेक्षा चांगली संधी नाही
मी म्हटलं महाराजांनी त्यांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत जेवढे सेनानी पराभूत केले त्यातले फक्त दोघेच भारतीय होते.बाकी सगळे परकीय होते त्यांच्या त्यांच्या देशाचे मानांकित सेनानी होते.....शिवरायांनी पराभूत केलेले सेनानी पाहु

ज्याची लाल महालात बोटं छाटली
तो  शाहिस्तेखान तो अबु-तालिबान चा नबाब, तुर्कस्तान चा नबाब आहे. तो प्रतिऔरंगजेब या नावाने ओळखला जायचा, औरंगजेबाचा सक्खा मामा आहे तो.  बंगाल प्रांत जिंकुन दिलाय त्याने..असा बलाढ्य  सेनानी महाराजांनी एका रात्रीत तीन बोट छाटली.... पहाट व्हायच्या आत गायब झाला पुन्हा नाही आला...

तो बहलोलखान पठाण सिकंदर चीड़रखान पठाण हे सगळे पठाण अफगानी आहेत अफ़गानिस्तान चे आहेत हे

तो दिलेरखान.. मंगोलियन आहे तो बाबा... मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योद्धा...महराजांनी त्याचा पराभव केला

सिद्धि जौहर सिद्धी सलाबत खान हे सगळे इराणी आहेत इराण चे आहेत सर्वोत्तम योद्धे आहेत महाराजांनी त्यांचा पराभव केला

आणि इथं लोणावळ्याच्या उंबरखिंडीत ज्याचा कोंडून पराभव केला...असा की गिनिज बुकला सुद्धा त्याची नोंद घ्यावी लागली की जागातल्या सगळ्यात कमी सैन्याने जास्तित जास्त सैन्याचा पराभव केला ( एक हजार विरुद्ध 30 हजार आणि 30 हजारंचा संपूर्ण पराभव 1000 मधला एकही मावला न गमावता ) तो कहार्तलब खान तो उझबेकिस्तान म्हण्जे आताच्या ताश्कंद रशियाचा आहे त्याचा पराभव केला महाराजांनी परत नाई आला

इंग्रज-गवर्नर लिहितो की शिवाजी माहाराज जर अजून 10 वर्षे जगले असते तर इंग्रजांना पूर्ण हिंदुस्तान नीट चेहरा  पाहता सुध्दा आला नसता...

सतराव्या शतकात लंडन मध्ये 3 वृत्तपत्रे प्राकाशित होत होती त्यामध्ये लंडन गॅझेट नावाचं वृत्तपत्र होत शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याहून निसटले त्यावेळी या लंडन गॅझेट मध्ये पहिल्या पानावर ती बातमी छापून आलेली त्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख किंग ऑफ स्वराज्या असा नवता, किंग ऑफ मराठा असाही नव्हता तर त्यात माझ्या राजांचा उल्लेख Shivaaji the king of india असा होता

व्हियेतनाम नावाचे छोटसं राष्ट्र आहे हो राष्ट्रचं आपल्या पुणे जिल्ह्याएवढ पण नसेल या व्हियेतनाम चं आत्ताची महासत्ता अमेरिकेसोबत गेली 35 वर्षे युद्ध सुरू आहे पण या युध्दात अजुन अमेरिकेला विजय मिळाला नाहीये का माहितीये कारण त्या व्हियेतनाम च्या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा आहे....त्या व्हियेतनाम चा स्वातंत्र्यसेनानी "हू जी मीन" नांव त्याच  त्याच्या समाधीवर लिहून ठेवलंय शिवाजी महाराजांचा एक मावळ येथे चीरविश्रांती घेतोय

अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात "शिवाजी द मॅनेजमेंट गुरू" या विषयावर 100 मार्काँचा पेपर घेतला जातो

जगातली 112 राष्ट्र शिवरायांच्या गोरील्ला warfair(युधतंत्र) चा वापर आपल्या अभ्यासक्रमात करतात

पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात शिवरायांचा अभ्यासक्रम शिकवला जातो

मी म्हाणालो आता तूच सांग सगळ जग शिवरायांचा अभ्यास करतंय तिथं माझ्या देशातल्या अभ्यासक्रमात  किती शिवरायांचा उल्लेख आहे ?

तुम्ही इतिहास shikalaat त्या
CBSC मध्ये  1700 पानांचे पुस्तक काढलंय त्यात फक्त 4 ओळी आहेत
म्हणुन तुला ही माहिती नव्हती...म्हणुन तुम्ही असं म्हणालात चला येतो 👏

Friday, 16 September 2016

तेजस्वी राजा

संपूर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य स्थापन झाल्यावर इंग्लंड वरून लॉर्ड एलफिस्टन याला अनेक अभिनंदन पर पत्रे येउ लागली.. त्यावेळी त्याने आपल्या डायरीत लिहिले कि
"मी हा सारा मुलुख फिरलोय ,एवढा दुर्गम प्रदेश , एवढी लढवय्यी माणसे आमच्याकडून जिंकली गेलीच कशी ? आमची ती योग्यता कधीच नव्हती… कदाचित हा ईश्वर खरोखर पक्षपाती असावा .. कारण ज्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नाही असे साम्राज्य निर्माण करायला १८ वे शतक लागले…!
छत्रपति शिवराय सारखा राजा जर आमच्या भूमीत जन्माला आला असता तर हे आम्ही तेराव्या शतकातच पूर्ण केले असते..!
हि पृथ्वीच काय तर परग्रहावरही आमचे साम्राज्य निर्माण झाले असते..!!"
☀ ☀ ☀
असा आपला राजा …पसरु दे सर्वदूर ‘ शिव ‘नावाचा जयजयकार..!
ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका..
☀ ☀ ☀
"जय शिवराय"

Thursday, 15 September 2016

आज इंजिनिअर दिवस..

इंजिनिअर दिवसा निमीत्त सर्व इंजिनिअर्सना व इंजिनिअर्सच्या संशोधनांमुळे व परिश्रमांनी म्हणजे थोडक्यात कृपेमुळेच आरामात जगत असलेल्या जगातील सर्वांनाच खुप खुप शुभेच्छा..

आजच्या दिवशी आठवण येतेय ती स्वराज्यातील बांधकाम इंजिनिअर मा.श्री. हिरोजी इंदळकर यांची. मा.श्री. हिरोजी इंदळकर हे छत्रपती शिवरायांनी शोधुन काढलेल्या अनेक हि-यांपैकी एक महत्वाचा व स्वराज्यनिष्ठ हिरा..

मा.श्री. हिरोजी इंदळकर हे छत्रपती शिवरायांचे स्थापत्त तज्ञ यांनी शेकडो गडकिल्ले, वाडे, गढ्या इ. बांधले व डागडुजी केली पण त्यांचे सर्वात मोठे व महत्वाचे काम म्हणजे स्वराज्याची राजधानी गडकिल्ल्यांचा राजा " किल्ले रायगड " ची बांधणी. या कामात एकवेळ पैसे कमी पडले तर मा.श्री. हिरोजी इंदळकर यांनी स्वत:चा राहता वाडा व शेतजमीन विकली व पैसा उभा केला व स्वत: कुटुंबासह रायगडाशेजारीच झोपडी घालुन राहिले. छत्रपती शिवरायांना हा त्याग कळाल्यास त्यांनी मा.श्री. हिरोजी इंदळकर यांना पाहिजे ते मागन्यास सांगीतले तर मा.श्री. हिरोजी इंदळकर यांनी श्री जगदीश्वराच्या एका पायरीवर नाव कोरायची परवानगी मागीतली जेनेकरुन छत्रपती शिवरायांची चरणधुळ कायम मस्तकी धरता यावी. धन्य धन्य ते मा.श्री. हिरोजी इंदळकर अन धन्य धन्य ती त्यांची स्वराज्य व स्वामी निष्ठा..

आजही किल्ले रायगड पाहताना डोके गरगरुन जाते, डोळे उघडे ते उघडेच राहतात, बुद्धी काम करत नाही. वाटते एवढा मोठा अवाका असलेला, अगदी बांधकामांचा नियमात बसवलेला, बलाढ्यपनात तसुभरही कमी नसलेला, विज्ञानाचा पुरेपुर वापर केलेला अन महत्वाच म्हणजे घनदाट अरण्यात व एवढ्या उंचीवर बांधला कसा असेल अन बांधायची कल्पना तर कशी सुचली असेल छत्रपती शिवरायांना अन मा.श्री. हिरोजी इंदळकर यांनी छत्रपती शिवरायांची हि कल्पना प्रत्यक्षात तरी कशी उतरवली असेल..

धन्य धन्य ते छत्रपती शिवराय..
धन्य धन्य ते त्यांचे रणवीर स्वामीनिष्ठ मावळे..

Wednesday, 14 September 2016

जय शिवराय...

#भवानी मातेचा लेक तो,
#मराठ्यांचा राजा होता
#झुकला नाही कोणासमोर,
#मुघलांचा तो बाप होता
#कोणी चुकत असेल तर,
#त्याला सत्याची वाट दाखवा
#आणि कोणी नडला तर,
#त्याला मराठ्याची जात दाखवा

#जय भवानी जय शिवाजी....

Tuesday, 13 September 2016

पाऊस

सरींसवे सरूनी गेले
भर्कन उडूनी गेले तास
नभी भरलेल्या काजळासवे
नव्याने दाटला मनी उल्हास

निळे, पोपटी, हिरवे, पिवळे
लख्खं मला दिसु लागले
तेच रंग त्या उन्हात
नव्याने भोवती फिरू लागले

चिंब भिजुनी चमकणारे
समोरच उभे बकुळ होते
त्याची रेखीव फुले वेचाया
नव्याने आज व्याकुळ होते

स्वतःस झोकुनी देती सरी
मातीच्या असीम प्रेमासाठी
मनात झिरपुनी अर्थ देतात
नव्याने त्याच रेशीमगाठी

झरझर सरसर कोसळणारे
क्षण कुणी मोजले का?
आज त्याच पावसामध्ये मी
नव्याने अशी भिजले का?

वादळ

Tuesday, 6 September 2016

मावळे

पातशहाच्या फौजेसोबत असणारा इतिहासकार भीमसेन सक्‍सेना लिहितो :
"कुठे हे मराठे, जे तळहातावर कांदा-भाकरी घेऊन घोड्यावरून चाळीस चाळीस मैल दौड करतात; ज्यांना दिवसाची विश्रांती माहीत नाही, जे जाता जाता वाटेतल्या माळावर चार भाले रोवतात, त्यावर घोंगडी टाकून तात्पुरता आडोसा करतात अन्‌ लगेच घोड्यावरून वाऱ्यासारखी झेप घेत मोहिमेवर आगेकूच करतात अन्‌ तेच दुसरीकडे कंदाहारी नायकिणीच्या आगेमागे लाळ घोटणारे आमचे पातशाही फौजेतील उल्लूचे पठ्ठे !''

Monday, 5 September 2016

कोकणातील गणेशोत्सव...!!!

कोकणात घरोघरी साजरा होणाऱ्या अमाप उत्साह, आनंद भरलेल्या गणेशोत्सवामध्ये कोकणाला सांस्कृतिक पर्यटनाच्या नकाशात जागतिक पातळीवर नेऊन ठेवण्याची ताकद आहे. हा उत्सव ही सांगण्याऐकण्याची नव्हे तर अनुभवण्याची गोष्ट आहे.

इथे श्रावणसरींची
रोज होते बरसात
त्याच आणतात वार्ता
आणि येती गणगोत
भाद्रपदाची चाहूल,
गणरायाचे पूजन
सण वरसाचा करी
सुखाचीही बरसात..!

कोकणात अमाप उत्साहात साजरा करण्यात येणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी. ‘गणेश चतुर्थी’ या दोन शब्दांनीच कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह भरभरून वाहायला लागतो. इतर प्रांतात गणरायाच्या आगमनाबरोबर सुरू होणारा हा सण कोकणी माणसाच्या मनात तसा पावसाळ्याबरोबरच सुरू होतो. आपल्या घरात यंदा येणारी गणपतीची मूर्ती कशी असावी यावर खल केला जातो. कॅलेंडरवरचं उत्तम चित्रं अगदी जपून ठेवलेलं असतं आणि या वेळी गणपतीच्या शाळेत अशी हुबेहूब मूर्ती बनवायला सांगायची असा गुप्त बेत घरची वरिष्ठ मंडळी आखतात, तेव्हाच पोरासोरांना येणाऱ्या गणेशोत्सवाचे वेघ लागलेले असतात. या आराध्य दैवताचा कोकणातला रुबाबच काही और असतो. आता कोकणी माणूस पूर्वीसारखा चाकरमान्यावर अवलंबून नसला तरी फार पूर्वीपासून चाकरमानी आणि गावचा त्याचा परिवार गणपतीसाठी काय वाट्टेल ते, अशाच मन:स्थितीत असायचा. आजही हा गणपतीच सर्वाना एकमेकांजवळ आणतो. कोकणातली गणेश चतुर्थी हा आबालवृद्धांसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो.
गणपतीच्या शाळेत घराघरांतून नागपंचमीपर्यंत गणपतीची मूर्ती ठेवायचे पाट पोहोचलेले असतात आणि मग शाडूच्या मातीला आकार येऊ लागतो. कारागिराचे कसलेले हात लीलया फिरू लागतात आणि शाळेत एक एक मूर्ती अवतरायला लागते. गणपतीच्या मूर्ती बनवण्याची ही निर्मिती प्रक्रिया न्याहाळण्यात शाळकरी मुलांना खूपच आनंद मिळतो आणि त्यांच्यावर मूर्तीकलेचे संस्कार नकळत होत जातात. शाडूचा मूर्तीवर शेड आणि मग होणारं रंगकाम एवढं सफाईदारपणे केलं जातं की त्या मनोहारी मूर्तीसमोरून पायच निघत नाही. कोकणातल्या या गणपतीच्या शाळा ही खरी तर कलामंदिरं आहेत. मुंबईसारख्या शहरात चिनी गणेश मूर्तीची आवक झालेली दिसते, पण कोकणात अजूनही पारंपरिक पद्धतीने गणपतीच्या मूर्ती बनवल्या जातात.
इकडे गणपतीसाठी घराघरांतही भिंती रंगवल्या जातात. मातीच्या भिंतींना कोकणच्या लाल मातीचा मुलामा चढवला जातो तर गणपतीच्या खोलीतली भिंत रंगवणं हा बालगोपालांचा आवडता कार्यक्रम असतो. देखण्या देखाव्यांनी भिंती सजतात. नक्षीदार वेलबुट्टीने त्यावर अखेरचा हात फिरवला जातो. आता चतुर्थी अगदी जवळ आलेली असते. माटवीला सजवण्यासाठी रानफुलं, वेली, नारळ, सुपारीपासून काकडी अशा अनेक गोष्टी एकत्र केल्या जातात आणि माटवी सजते. मखराच्या कलाकुसरीचं काम करण्यात येतं. गणपतीला विराजमान होण्यासाठी चौरंगाची जागा, दारातून थेट दर्शन होईल अशी निवडली जाते. आता गणपतीचं स्वागत करायला मन अगदी अधीर झालेलं असतं.
श्रावणातली सोनपिवळी उन्हं रंगांचा उत्सव साजरा करायला लागतात तेव्हा कोकणातला निसर्गही नेत्रसुखाची उधळण करायला ठेवणीतले रंग घेऊन आधीच तयार असतो. पावसाचा जोर जरा ओसरलेला असतो आणि आकाशात काळ्या ढगांची जागा इंद्रधनूने घेतलेली असते. शेतीची कामं आता थोडी कमी झालेली असतात, कापणीच्या हंगामाला अजून अवकाश असतो. रंगीबेरंगी रानफुलांनी धरणी सजलेली असते. वाऱ्याच्या झोक्यावर डुलणारी हिरवी शेतं मखमलीचा भास निर्माण करीत असतात, पण हे सर्व थोडं नजरेआड कतरच मंडळी शेतीच्या बांधावरून लगबगीने गणपतीच्या शाळेकडे निघालेली असतात. नारळ आणि बोलीचे पैसे मूíतकाराच्या हातावर ठेवून मूर्ती उचलली जाते. बाहेरच्या अंगणात अगरबत्ती लावून झपझप पावलं टाकत तरणा गडी गणपती घेऊन वाडीकडे निघतो, घराच्या अंगणात येताच त्याच्या पायावर पाणी ओतून मूर्तीला आत घेतलं जातं. सुतळी बॉम्बचा बार उडवला जातो. तुळशीजवळ उदबत्तीचा सुगंध दरवळायला लागतो. तिथेच अंगणात शेजारचा माणूस त्या मूर्ती आणणाऱ्याला आपल्या गणपतीची मूर्ती आणण्यासाठी आपल्याबरोबर न्यायला आलेला असतो. सगळ्या अवाठातल्या (वाडीतल्या) मूर्ती आणण्याचं काम करणाराही तसा कसबीच म्हणायचा, पावसाळ्यात निसरडय़ा वाटेवरून मूर्ती आणणं हे फार जोखमीचं काम असतं.
हरितालिका पूजनात गृहिणी व्यस्त असतानाच शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून शहाळं-केळं भेट म्हणून आलेलं असतं. मनातल्या मनात त्याची परतफेड ठरवत असतानाच अनेक कामांचा उरक कसा करावा असा प्रश्न तिला पडलेला असतो, पण गणपतीच सगळं यथासांग पार पाडणार हा आत्मविश्वासच तिला बळ देत असतो. त्यातच चाकरमान्यांचं आगमन होतं. सकाळपासून त्यांच्या वाटेकडे डोळे लागलेले असतात. पण ते घरी पोहोचल्याशिवाय काही खरं नसतं. गेल्या वर्षी आदल्या दिवशी पोहोचणारा तो चतुर्थी दिवशीही आला नाही हा अनुभव तिच्या गाठीशी असतो. कोकण रेल्वे आणि परिवहन महामंडळाच्या गाडय़ा अव्याहत धावत असल्या तरी काही वेळा दरडी कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो आणि मग चतुर्थीची आरती मंडळीना वाटेतच जिथे असतील तिथे करण्यावाचून गत्यंतर नसतं. असा सगळा व्याप झाला तरी त्याचा उत्साह काही कमी झालेला नसतो. उलट पुढे वर्षांनुवर्षे सांगण्यासाठीचा एक किस्सा त्याला मनोमन सुखावून टाकतो.

घरोघरी गणपतीच्या मूर्ती आलेल्या असतात. मुलाबाळांचा जल्लोश सुरू असतो. उद्यापासून ‘भजनाक जावक व्हया’ म्हणून काही लोक पेटी, तबला, मृदुंग, टाळ, झांज यांची जुळवाजुळव करीत असतात. या वर्षी कुणाकडे किती दिवस गणपती राहाणार याचा अंदाज देवळात जमलेली मंडळी घेत असतात. त्याप्रमाणे रोज करण्याच्या भजनांचं आणि आरतीचं नियोजन त्यांना करायचं असतं. इथे पेटी वाजवणारा आणि ती उचलून घरोघरी नेणारा यांची विशेष खबर काढली जाते. तो पूर्ण दिवसांसाठी उपलब्ध आहे ना याची खातरजमा केली जाते. तबल्यावरची शाई या वर्षीही तशीच उडालेली आहे म्हणून कटाक्ष टाकले जातात. ‘जावदे पुढच्या वर्षांक काय तरी व्हयाच नाय?’ असं म्हणून तो विषय संपवण्यात येतो. शेवटी वाडीतल्या घरांचा क्रम ठरतो, वेळेवर हजर राहण्याची तंबी दिली जाते. ‘सकाळी भटजी लवकर इले पुरे’ म्हणत त्या बैठकीची सांगता होते.
भल्या पहाटे उठून आंघोळ करून फुलं, तुळशी, दुर्वा काढल्या जातात. सगळीकडे अमाप उत्साहाचं वातावरण असतं. गणपतीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठापना केली जाते. पूजा आटोपल्यावर सजावटीकडे विशेष लक्ष पुरवलं जातं. उकडीच्या मोदकांचा आणि सुग्रास भोजनाचा दरवळ सगळ्याच घराघरांतून येत असतो. अख्खं कोकण खऱ्या अर्थाने हा सण साजरा करीत असतं. महाराष्ट्रात इतरत्र दिवाळीत होणारी फटाक्यांची आतषबाजी कोकणात मात्र गणेश चतुर्थीलाच होते. त्या अर्थाने इथे चतुर्थीतच दिवाळी साजरी केली जाते. घरोघरी गणरायाला षोडशोपचारे पुजलं जातं. विजेच्या तोरणांची आरास मांडली जाते. सत्यनारायणाची महापूजा केली जाते. पाहुणे, मित्र-मंडळी यांची सतत ये-जा सुरू असते. याच दिवसांत करंज्या, मोदक, पंचखाद्य, लाडू असे फराळाचे पदार्थ घरी बनवले जातात. अगदी सगळ्या घरात हमखास गोडाधोडाचे पदार्थ बनवण्याचे वर्षांतले हेच दिवस असतात. भजनाला येणाऱ्यांत मंडळींसाठी खास उसळीचा बेत आखला जातो. जिकडे बघावं तिकडे उत्सव सुरू असतो. प्रत्येक माणूस चैतन्याने भरून गेलेला दिसतो.
अनेक रूढी आणि परंपरा यांचं पालन करण्यात कोकणातला देवभोळा माणूस चुकत नाही. चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहू नये हे माहिती असलं तरी चुकून वर नजर गेली आणि चंद्र दृष्टीस पडलाच तर मात्र तो बेचैन होतो. मग कुणाच्या तरी परडय़ातली भाजी गुपचूप तोडून तो त्या दोषाचं परिमार्जन करू पाहतो. या उत्सवात दिवस आणि रात्रही कमी पडते. बाजारपेठा उशिरापर्यंत उघडय़ा असतात. अनेकानेक वस्तूंनी दुकानं खचाखच भरलेली असतात. नव्या कपडय़ांची खरेदी केली जाते. मुलाबाळांची चंगळ होते. या दिवसात शाळेलाही सुट्टी असते.
गणेशोत्सवाच्या दिवसात कोकणात अशा प्रकारे मंगलमय वातावरण असतं. जगात अनेक उत्सव साजरे केले जातात, पण कोकणात साजरा होणारा हा उत्सव अगदी आगळावेगळा असाच आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर झाल्याला बराच काळ होऊन गेला, असं असलं तरी पर्यटनाच्या दृष्टीने या उत्सवाकडे म्हणावं तसं लक्ष पुरवलं गेलं नाही. पर्यटनाच्या दृष्टीने या सणाचा विचार केल्यास या उत्सवाला जागतिक महत्त्व प्राप्त होऊ शकतं. प्रत्येक घरात आरास केलेले देखावे, पारंपरिक भजनं, मेळे, फुगडय़ा, खेळ, संगीतबारी, कोकणी पदार्थाची रेलचेल, देखण्या मूर्ती, जुन्या पद्धतीची घरं यामुळे या दिवसात इथे येणाऱ्याला वेगळ्याच वातावरणाची अनुभूती घेता येईल.
हरितालिकेपासून गणपती विसर्जनापर्यंतच्या प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व असतं आणि त्या त्या दिवशी ते ते सर्व सोपस्कार अगदी मनोभावे पूर्ण केले जातात. पंचमी दिवशी दीड दिवसाचे गणपती जातात. त्याच दिवशी ऋषिपंचमी साजरी केली जाते. अळू, कंदमुळं आदी पाच भाज्यांची चविष्ट भाजी त्या दिवशी बनवली जाते. उंदरबी असल्याने उंदराला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. याच दिवसात गौरींचं आगमन होतं. गौरी पूजन आणि विसर्जनाचा सोहळा यथासांग पार पाडला जातो. काही गणपतींचं विसर्जन गौरीसोबतच केलं जातं. अकराव्या दिवशी किंवा अनंत चतुर्दशी दिवशी सर्वच गणपतींचं विसर्जन होतं. विसर्जनाच्या वेळी आरती केल्यावर गणपतीला गाऱ्हाणं घातलं जातं. नवस बोलले जातात. गाऱ्हाणं, ते घालण्याची पद्धत हा खरा तर कोकणातला सांकृतिक ठेवाच आहे. एवढं सगळं झालं की गणपतीच्या हातावर दही ठेवलं जातं. एका माणसाने गणपतीची मूर्ती डोक्यावर घेऊन जाण्याएवढं त्या मूर्तीचं वजन असतं. वाजतगाजत गणपतीची मिरवणूक काढली जाते. फटाक्यांची आतषबाजी होते. गावातल्या तलावाजवळ किंवा विहीर, ओढय़ाजवळ वाडीतले गणपती विसर्जनासाठी एकत्र आणले जातात. अनेक देखण्या गणेश मूर्ती, धूप, अगरबत्तीचा घमघमाट, संधिप्रकाशातला उजेड, निरांजनांचा मूर्ती उजळून टाकणारा प्रकाश आणि भावनांचा कल्लोळ अशा वेगळ्याच वातावरणात पुन्हा एकदा मनोभावे आरती केली जाते. पंचखाद्यं, नारळ, फळं यांनी युक्त असा प्रसाद वाटला जातो. खूप जड अंत:करणाने गणरायला निरोप दिला जातो. जिवलगाने दूरदेशी निघून जावं तशी माणसं हेलावतात. पण ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला’ म्हणणारा चाकरमानी पुन्हा एकदा गावाला राम राम करून मुंबयकडे वळतो तो वर्षभराची ऊर्जा घेऊनच. वर्षभरात गणपतीच्या दिवसात वाडीमधली, गावातली सर्व घरं सदोदीत सगळ्यांसाठी उघडीच असतात. या दिवसात कुणाच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची गरज नसते. सगळ्या गावाचं एक मोठ्ठं कुटुंबच एकत्र नांदत असतं. मंगलमय सुरांच्या साथीने, मोहक सुगंधात न्हाऊन निघालेली घरं, वाडय़ा, गावं अपार श्रद्धा आणि आनंदाने ओतप्रोत भरलेली दिसतात. घराघरांत दिमाखात साजरा होणारा हा सण प्रत्येक कोकणवासीयांचा सांकृतिक ठेवाच आहे.

Sunday, 4 September 2016

📌भारतातील महत्वाचे धबधबे

📌भारतातील महत्वाचे धबधबे

१) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.

२) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी

३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी

४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी

५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी

६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी

७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी

८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी
----------------------------

🙏सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🙏

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांना

सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”

🚩गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया🚩