पातशहाच्या फौजेसोबत असणारा इतिहासकार भीमसेन सक्सेना लिहितो :
"कुठे हे मराठे, जे तळहातावर कांदा-भाकरी घेऊन घोड्यावरून चाळीस चाळीस मैल दौड करतात; ज्यांना दिवसाची विश्रांती माहीत नाही, जे जाता जाता वाटेतल्या माळावर चार भाले रोवतात, त्यावर घोंगडी टाकून तात्पुरता आडोसा करतात अन् लगेच घोड्यावरून वाऱ्यासारखी झेप घेत मोहिमेवर आगेकूच करतात अन् तेच दुसरीकडे कंदाहारी नायकिणीच्या आगेमागे लाळ घोटणारे आमचे पातशाही फौजेतील उल्लूचे पठ्ठे !''
No comments:
Post a Comment