रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यामध्ये निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांची एक सुरेख मालिकाच पाहायला मिळते. हर्णै मुरुड ह्या गावचा समुद्रकिनारा सुंदर आहेच परंतु या गावांना ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे. सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग आणि गोवा अशा सागरी किल्ल्यांचे अस्तित्व या गावांना आहे पण त्याच बरोबर भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळवलेले दोन सुपुत्र या गावांनी देशाला दिलेले आहेत.
हर्णै हे एक अरबी समुद्रावरील प्राचीन बंदर होय. हे एक लहानसे टुमदार खेडे असून इथून सुवर्णदुर्ग या जलदुर्गाला भेट देता येते. तसेच इथून पाज गावातील पूल ओलांडून आंजर्ले या निसर्गरम्य गावाला भेट देता येते. आंजर्ले इथला कड्यावरचा गणपती प्रसिद्ध आहे. कनकदुर्ग आणि गोवा हे समुद्री किल्ले इथे किनाऱ्यावर वसलेले आहेत.
No comments:
Post a Comment