किल्ले
शतकानुशतके आपल्या जबरदस्त पाषाणी सामर्थ्याने जमीन आणि समुद्रावर दरारा निर्माण करणारे किल्ले हे मराठी साम्राज्याचे फार मोठे आधारस्तंभ होते. महाराष्ट्राची ही भूमी जवळजवळ ३५० हून अधिक किल्ल्यांनी समृद्ध आहे.
भारताच्या कोणत्याही प्रांताला हे एवढे दुर्गवैभव लाभलेले नाही. याच भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची तेजाने तळपणारी तलवार अत्यंत दिमाखात अधिराज्य गाजवत होती. एकेकाळचे मराठी सैन्याचे संरक्षक असलेले हे किल्ले आज आपल्या उज्ज्वल इतिहासाची मूक साक्ष देत अभिमानाने उभे आहेत. पंचमहाभुतांच्या सततच्या माऱ्यामुळे पडझड, फूट झालेले किल्ले. आज जरी त्यांच्या भिंती ढासळू लागल्या असल्या आणि छप्पर उडून गेले असले तरी हे किल्ले, सामर्थ्यशाली मराठी साम्राज्याचा दरारा आणि रुबाब या बद्दल सतत प्रेरणा देतात. हे किल्ले दूरदृष्टी आणि सामर्थ्य यावर नक्कीच भाष्य करतात. सागरी असोत किंवा एखाद्या डोंगरावर वसलेले असोत, महाराष्ट्रातले हे किल्ले कोणत्याही ऋतूमध्ये तुम्हाला साद घालत असतात.
No comments:
Post a Comment