! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Thursday, 4 June 2015

!!! " शिवरायांचा पायांचा आणि हाताचे ठसे यांचा ठसा " !!!




नक्की वाचा खास तुमच्यासाठी 

छायाचित्रे : - शिव भक्त बीजे 
: महाराष्ट्राच्या मराठी तनामनात स्फूर्ती आणणा-या राजाला सारेच मानवंदना देत आहेत. महाराजांचे कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व आज जगाला दीपस्तंभाप्रमाणे आहे. महाराजांनी निर्माण केलेले गडकिल्ले आज हिंदवी स्वराजाचा इतिहास सांगत आहेत. छत्रपतींचा इतिहास आपण ऐकतो. त्यांचे दर्शन घेतो, त्यांचे पोवाडे गातो. छत्रपतींना अनुभवण्याचा प्रयत्न करतो. यात सिंधुदुर्ग भाग्यवान आहे. या किल्ल्यावर इतिहासाचे सोनेरी पान न्याहाळायला मिळते. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचा डाव्या पायाचा अन् उजव्या हाताचा ठसा येथे पाहता येतो. खरं तर भक्कम उभा असलेला सिंधुदुर्ग हा अरबी समुद्रातला हिंदवी स्वराज्याचा शिलेदार. याच सिंधुदुर्गवर शिवस्मारक उभे केल्यास प्रत्यक्ष छत्रपतींचा हा लाडका किल्ला अधिकच प्रेरणा देईल!
गडावर प्रचंड धावपळ सुरू होती. राजे कोणत्याही क्षणी दाखल होणार होते. ते मालवणमध्ये पोहोचल्याची वर्दी गडावर मिळाली होती. अरबी समुद्रही त्यांच्या स्वागतासाठी आतुर झाला होता. भरतीच्या लाटा किना-यावर आदळत होत्या. सा-यांचीच लगबग सुरू होती. नावाडी महाराजांच्या प्रतीक्षेत होते. नगारा वाजू लागला.. तोफांना बत्ती द्यायची बाकी होती आणि समुद्र उभा राहिला. भरतीच्या अत्युच्च टोकाला समुद्र स्थिर होतो. याच क्षणी महाराजांची पावले सिंधुदुर्गावर पोहोचली. तो दिवस होता श्रीनृप शालिवाहन शके १५८९ पल्वंग नामसंवत्सर, चैत्रशुद्ध पौर्णिमा, म्हणजेच शुक्रवार, २६ मार्च १६६७!
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या वास्तुशांतीचा मुहूर्त साधला गेला होता. यासाठी किल्ला सर्व तयारीनिशी सज्ज झाला होता. तीन वर्षे सुरू असलेले काम शिवरायांनी पाहिल्यानंतर सिंधुदुर्ग कृतकृत्य झाला होता. एक नवा इतिहास अरबी समुद्रात घडला होता. जणू काही अरबी समुद्र शिवरायांच्या या धाडसाला कुर्निसात करत होता.
सिंधुदुर्ग! मुद
 यावे हिरोजी, आपणास काय हवे ते मागावे, हा सिंधुदुर्ग बनवून आपण स्वराज्यासाठी अजोड कामगिरी केला आहात. आता रायगडाचेही काम आपणच करायला हवे. चंद्र, सूर्य असेपर्यंत काहीही भंग पावू नये असे काम करा.’
राजांच्या या आदेशाने हिरोजींना आकाशाला हात पोहोचल्याचा आनंद झाला. हिरोजी म्हणाले, ‘महाराज’ तुम्ही स्वराज्यासाठी एवढे करत आहात. दिवस-रात्र मेहनत घेत आहात. आम्ही आणखी काय मागायला हवे. या स्वराज्यासाठी आम्हाला संधी देत आहात हाच आपला मोठेपणा आहे.
दरबार शांत होता. हिरोजींचे शब्द आणि महाराजांचा संवाद प्रत्येक जण कान टवकारून ऐकत होता. या शांततेचा हिरोजींनी भंग केला. ‘‘महाराज एक विनंती आहे. तुमचा चरणस्पर्श करण्याची संधी मिळावी, आम्हावर आपले आशीर्वाद कायम असावेत!’’
‘‘हिरोजी आपल्यात अंतर आहेच कुठे?’’ छत्रपती वदले. सारेच भारावले. हिरोजींनी प्रसंगावधान जपत महाराजांना मुजरा केला आणि म्हणाले, ‘‘महाराज या किल्ल्यावर तुम्ही सदैव असावे असे आम्हाला वाटते. आमची एक इच्छा आहे. तुमचे चरणकमल आमच्या नेहमी दृष्टीस पडावेत.’’
छत्रपती हिरोजींकडे बघतच राहिले. महाराजांनी होकार देताच चुनखडी आणि जस्ताचे मिश्रण असलेले तबक हिरोजींनी मागविले. दोन तबके पुढे आणण्यात आली आणि हिरोजींनी महाराजांना आपले एक पाऊल या तबकात ठेवण्यास सांगितले.
महाराजांनी आपला डावा पाय तबकात ठेवला. तर दुस-या तबकात आपला उजवा हात. स्वत: राजांनी.. दुस-या कुणीही नव्हे, चुन्यामध्ये उठविले आपल्या हाताच्या पंज्याचे आणि पावलांचे ठसे! हिरोजींचा चेहरा प्रचंड उजळला. त्यांना कधी नव्हे तो आनंद झाला होता. तुतारी निनादली. तोफांचे बार उडाले. पुन्हा चौघडा वाजू लागला.
हिरोजींनी या रयतेच्या राजाचे चरणकमल चुनखडीवर मुद्रित करून सिंधुदुर्ग किल्ल्यावर इतिहासाचे एक सोनेरी पान साकारले होते. असंख्य लाटांना झेलत या किल्ल्या�
किल्ल्यावर महाराजांचे चरणकमल आणि हस्तमुद्रेचा दस्तावेज जपत महाराष्ट्रालाच नव्हे तर हिंदवी स्वराज्याला एक नवी ऊर्जा बहाल केली आहे.

No comments:

Post a Comment