! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Sunday, 25 February 2018

शिवाजी महाराज व त्यांच्या आई..

शिवाजी महाराज व त्यांच्या आई....
वाचा.....डोळ्यात पाणी येईल..लाईक नाही केले तरी चालेल पण मित्रांनो एकदा वाचा

राज्याभिषेकाच्या प्रचंड गडबडीतही महाराजांचे लक्ष आईसाहेबांकडे पूर्ण होते. आईसाहेब म्हणजे तर महाराजांचे सर्वस्व. महाराजांचे दैवत. गडावरची हवा फार थंड. वारा फार. आईसाहेबांची प्रकृति अतिशय नाजूक झालेली. गड त्यांना मानवेना. म्हणून महाराजांनी खास त्यांच्यासाठी, गडाच्या निम्म्या डोंगरात असलेल्या, पाचाड नावाच्या गावी एक उत्तम वाडा बांधला.

तेथे त्यांची राहण्याची सर्व व्यवस्था केली. राज्याभिषेकासाठी महाराजांनी आपले हे थोर दैवत अलगद गडावर नेले. लटलटत्या मानेने आणि क्षीण झालेल्या डोळ्यांनी त्यांनी आपल्या बाळाचे सारे कोडकौतुक न्याहाळले. राजा म्हणजे विष्णूचा अवतार. शिवबाला विष्णुरूप प्राप्त झालेले त्यांनी पाहिले. आता आणखी काय हवे होते त्यांना? त्यांना काहीही नको होते, पण महाराजांना त्या हव्या होत्या. राज्याभिषेक उरकल्यावर महाराजांनी (बहुधा मेण्यातून ) आईसाहेबांना गडावरून खाली पाचाडच्या वाड्यात आणले. आईसाहेबांनी राजधानीच्या महाद्वाराचा उंबरठा ओलांडला. रायगडाकडे त्यांची पाठ झाली. आईसाहेबांना ते महाद्वाराचे बुरुज जणू काही विचारीत होते, 'आईसाहेब, आता पुन्हा येणे कधी व्हायचे ?'

आता कैचें येणें जाणे ? आता खुंटले बोलणे ! हेचि तुमची अमुची भेटी, येथूनिया जन्मतुटी ! पान पिकले होते, वाराहि भिऊन जपून वागत होता.
आणि पाचाडच्या वाड्यात आईसाहेबांनी अंथरूण धरले. महाराजांच्या हृदयात केवढी कालवाकालव झाली असेल? अखेरचेच हे अंथरूण ! आईसाहेब निघाल्या ! महाराजांची आई चालली ! सती निघालेल्या आईसाहेबांना पूर्वी महाराजांनी महत्प्रयासाने मागे फिरविले. त्यावर दहा वर्षे आईसाहेब थांबल्या. पण आता त्यांना कोण थांबविणार ? … आई ! कसले हें विचित्र नाते परमेश्वराने निर्माण केले आहे ! जिच्या प्रेमाला किनारे नाहीत. जिच्या प्रेमाचा ठाव लागत नाही. जगाला आई देणारा परमेश्वर किती किती चांगला असला पाहिजे ! पण तीच आई हिरावून घेऊन जाणारा तो परमेश्वर केवढा निर्दय असला पाहिजे !

ज्येष्ठ वद्य नवमीचा दिवस उजाडला. बुधवार होता या दिवशी. आईसाहेबांची प्रकृती अत्यंत बिघडली. आयुष्याचा हिशेब संपत आला. वर्षे, महिने, आठवडे, दिवस संपले. आता अवघ्या काही तासांची थकबाकी राहिली. दिवस मावळला. रात्र झाली. मायेच्या माणसांचा गराडा भवती असतांना, सूर्यपराक्रमी पुत्र जवळ असतांनाही मृत्यूचे पाश पडू लागले. सर्व हतबल झाले होते. कोणाचेही काही चालत नाही इथे.

घोर रात्र दाटली. मध्यरात्र झाली. आईसाहेबांनी डोळे मिटले ! श्वासोच्छ्वास संपला ! चैतन्य निघून गेले ! आईसाहेब गेल्या ! छत्रपतींचे छत्र मिटले गेले ! मराठ्यांचा राजा पोरका झाला ! स्वराज्यावरचा आपला पहारा संपवून आईसाहेब निघून गेल्या. महाराज दु:खात बुडाले. आईवेड्या शिवबाची आई गेली. शिवनेरीवर अंगाई गाणारी, लाल महालात लाड करणारी, राजगडावर स्फूर्ती देणारी आणि रायगडावर आशीर्वाद देणारी आई कायमची निघून गेली. आता या क्षणापासून आईची हाक ऐकू येणार नाही ! कोणत्या शब्दात सांगू आईच्या हाकेचे सुख ? ज्यांना आई आहे ना, त्यांनाच, -- नाही, नाही, -- ज्यांना आई नाही ना, त्यांनाच फक्त ते समजू शकेल !
ज्येष्ठ वद्य नवमी, बुधवारी, मध्यरात्री (दि. 1 7 जून 1 6 7 4 ) जिजाबाईसाहेब मृत्यू पावल्या.

Saturday, 24 February 2018

गोंधळ

लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा !
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा !!!
. .
माळ कवड्यांची घातली गं..
आग डोळ्यात दाटली गं..
कुंकवाचा भरून मळवट
या कपाळीला… आई राजा उधं उधं उधं..
उधं..उधं..
उधं..उधं.. तुळजापूर तुळजाभवानी आईचा
उधं..उधं..
माहुरी गडी रेणुका देवीचा
उधं..उधं..
आई अंबाबाईचा
उधं..उधं..
देवी सप्तशृंगीचा
उधं..उधं..
बा सकलकला अधिपती गणपती धाव
गोंधळाला याव
पंढरपूर वासिनी विठाई धाव
गोंधळाला यावं
गाज भजनाची येऊ दे गं
झांज सुजनाची वाजु दे
पत्थरातून फुटलं टाहो
या प्रपाताचा
चित्रकार - मोहन जाधव

Thursday, 8 February 2018

श्री.भवानी तलवार

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचेकडे असलेली श्री.भवानी तलवार

Tuesday, 6 February 2018

सह्याद्री .

भटके आणि सह्यगिरीच्या कडे-कपार्यामध्ये राहणार्या सह्याद्रीपुत्रांचं फार सुंदर नातं आहे,
ह्या नात्याला निश्चित असं काही नाव नाही पण भटके आणि सह्याद्रीपुत्रांमधला "शिव-सह्याद्री" बंध गेली कित्त्येक वर्ष अतूट-अभंग असाच……… !!

ह्या सह्याद्रीपुत्रांचा डोंगरदर्यातला कौलारू संसार म्हणजे तुम्हा-आम्हा भटक्यांची हक्काची वस्ती,
मागची कसलीच ओळख नसता अगदी मन मानेल तेंव्हा यांच्या घरांची पडवी आपल्यासाठी मोकळी असतेच,
सगळं लटांबर आणि कुडी पडवीत निवांत पहुडल्यावर कोण गावचे? नावं काय? वगेरे विचारण्याचे सोपस्कार………!!!

कधी सह्याद्रीच्या वाटांवरचे वाटाडे होऊन, कधी कसलीही ओळख नसता भरपेट जेवायला घालून, कधी संकटात सापडलेले असता रात्री अपरात्री अवघड डोंगरदर्यात मदतीचा बळकट हात देऊन या सह्याद्रीपुत्रांनी आपल्या भटक्यांसोबतचे अनुबंध नेहमी बळकटचं केले आहेत अगदी सहज वृत्तीने……… !!

या सह्याद्रीपुत्रांनी आपल्या भटक्यांना वेळोवेळी केलेल्या मदतीची किमान जमेल तेवढी उतराई करावी या भावनेतून एका कल्पनेचा उदय झाला,

उदय झाला "शिव-सह्याद्री ग्रंथदिंडीचा………"

सह्याद्रीच्या दुर्गम भागात वसलेल्या शाळांची-तिथे शिकणाऱ्या मुलांची अवस्था खरंच बिकट,
शाळेच्या दसकोसातून अवघड डोंगर-दर्या, उफानणारे ओढे-नद्या पार करत पाच-दहा मैल पायपीट करत पोरांना शाळा गाठावी लागते,
ना कळकळ उन्हाची तमा बाळगायची सोय ना मी म्हणणाऱ्या पावसाची,

ये-जा करायला रस्ते नाहीत वाहतूक नाही तेंव्हा टीव्ही-इंटरनेट सारख्या ज्ञानगंगा म्हणजे दिवास्वप्नचं,
तेंव्हा या पोरांना सर्वांगीण जगाची माहिती व्हावी या हेतूने अश्या शाळांमधून किमान २००-३०० सर्वसमावेशक पुस्तकांचं ग्रंथालय सुरु करण्याचं स्वप्न पाहिलं,
योग्य वयात हातात पडलेलं योग्य पुस्तकं एखाद्याच्या आयुष्याची दिशाच बदलू शकतं याचा अनुभव आपल्या सर्वांना आहेच.

थोडे-थोडके पैसे जमा करून सह्याद्रीत किमान एक तरी ग्रंथालय सुरु करावं एवढं छोटं स्वप्न काही जगावेगळ्या अवलीयांच्या मदतीने तगलं,
फक्त तगलं नाही तर प्रचंड विस्तारलं……

अगदी कसलीही पूर्वीची भेट-गाठ नसलेल्यांनी सुद्धा फार मोठी आर्थिक मदत-भरपूर पुस्तकं पाठवली,
कलाकार मित्रांनी कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता अतिशय रेखीव "सुलेखन" करून पाठवलं,
छायाचित्रकार मित्रांनी छायाचित्रणाची जबाबदारी न सांगता उचलली,
शिक्षक मित्रांनी शाळकरी मुलांची मानसिकता, विषय-पुस्तकांची निवड ह्याकामी मदत केली,
ह्या सर्वांचे आभार कसे आणि किती मानू हेच समजेनासं झालंय………… !!!

पहिल्या ग्रंथदिंडीला दिवसही अगदीच चांगला सापडला "गुरुपौर्णिमेचा",
आणि शाळा तर त्याहून चांगली, "शिवतीर्थ राजगडाच्या कुशीत वसलेली, वाजेघर गावची"
पहिलं ग्रंथालय शिवतीर्थ राजगडाच्या पायथ्याला होतंय यापेक्षा मोठं भाग्य ते कोणतं.

आम्ही पुस्तकं द्यायला येतोय म्हणून मुलांनी सजवलेला वर्ग, दाराबाहेर घातलेली रेखीव रांगोळी, शाळेच्या बागेत फुललेल्या फुला-पानांचा बनवलेला पुष्पगुच्छ, लयबद्ध स्वागतगीत, पुस्तकं पाहून हरखलेली पोरं, प्रत्येक पुस्तकाचं पान अन पान निरखून सुखावणारे बालगोपाल पाहून मन केंव्हाच सातव्या आभाळात पोहोंचलेलं………!!!

मित्रहो,
तुम्हा सर्वांच्या मदतीने ग्रंथदिंडीचा श्रीगणेशा तर अतिशय उत्तम झालाय,
येत्या महिन्या-दोन महिन्यात साल्हेरपासून पारगडपर्यंतच्या सह्याद्री पट्ट्यात किमान १० ग्रंथदिड्या पोहोंचवायच्या आहेत तर येत्या वर्ष भरात किमान १००,
या कामी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांच्या मदतीचं खंबीर पाठबळ हवं आहे.

ही सह्याद्रीपुत्र मुलं आर्थिक बाजूने गरीब नक्कीच आहेत पण मानी आहेत-स्वत्व जपणारी आहेत,
आपण त्यांना मदत करतोय ही जरी त्यांची भावना असली तरी आपल्या दृष्टीने ते आपलं कर्तव्यचं आहे………. !!!

तेंव्हा मित्रहो मदतीच्या नाही तर कर्तव्याच्या भावनेतून "शिव-सह्याद्री ग्रंथदिंडी" सह्याद्रीभर पोहोंचवायचा निर्धार करूया………. !!!!!

कलावंतीण दुर्ग किल्ला

जय महाराष्ट्र मित्रांनो, आता आम्ही आपणास महाराष्ट्रातील किल्ले व त्यांची माहिती सांगणार आहोत. महाराष्ट्रात एकूण ३५० च्या वर गडद किल्ले आहेत. हे गडकिल्ले आपल्या कायम स्मरणात असावेत तसेच आपणाला कायम आपल्या इतिहासाची आठवण असावी म्हणून किल्ल्यांची माहिती सांगितली आहे. आता आपण कलावंतीण दुर्ग विषयी जाणून घेणार आहोत.

दुर्ग कलावंतीण हा मुंबई-पुणे गतिमार्गावरून पुण्याकडे जाताना पनवेलच्या पूर्वेला माथेरानच्यारांगेत असलेला एक डोंगरवजा किल्ला आहे.

 

कलावंतीण दुर्ग

 कलावंतीण दुर्ग

 गडावर पोहचायचे कसे :

हा गड मुंबई-पुणे हायवेवरून दिसतो. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (NH4) शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास जेथे मुंबई-पुणे महामार्ग जोडला जातो. तेथे शेडुंग फाटा लागतो. पनवेलमधील वरुण गांधी हॉस्पिटलजवळ सहा आसनी रिक्षाने ठाकुरवाडी गावामध्ये उतरता येते. १० लोकांचे साधारणतः २००-२५० रुपये द्यावे लागतात. आणि दुसरा उपाय म्हणजे पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा आहे. माणशी १२ रुपये बसचे टिकीट आहे. ठाकुरवाडीला आल्यावर प्रबल गडाच्या दिशेने पायी पायी जावे लागते.

‘कलावंतीण दुर्गाचा इतिहास :

कोण्या राज्याचे कलावंती राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून न जावी म्हणून त्या राज्यांनी कलावंती राणीला त्या किल्ल्यावर महाल बांधून दिला. हा दुर्ग प्रबल गडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्ये करतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग, इर्शल गड, कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते.

 

कलावंतीण दुर्ग

कलावंतीण दुर्ग

निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि सह्याद्रीच्या पर्वतराईमध्ये ताठ मानेने कटाक्ष टाकत उभा असलेला कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड एकाच दिवसात पाहणे तसे मोठ्या धाडसाचे आहे. मी आजवर पाहिलेल्या सर्व किल्ल्यांमध्ये चढाई करण्यास अवघड सुळका, असे कलावंतीण दुर्ग बाबत म्हणता येईल. प्रबळगडाच्या शेजारी उभा असलेला कलावंतीण दुर्ग म्हणजे केवळ उंचच उंच एक सुळका आहे. जास्त उंची आणि दगडामधील कोरलेल्या पायऱ्या यामुळे दुर्गाच्या सर्वात वर जाण्यासाठी खूप हिम्मत लागते.

पनवेल आणि कर्जत दरम्यान जून्या मुंबई –

पुणे महामार्गावरून जात असताना प्रबळगड दिसतो. प्रबळगडाच्या परिसरात उल्हास नदी, पाताळगंगा नदी, माणिकगड, कर्नाळा, इर्शाळगड आणि जवळच माथेरानचा डोंगर आहे. मुंबई पुणे महामार्गावरून कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगडकडे पाहिल्यास प्रबळगड म्हणजे महादेवाची पिंड आणि कलावंतीण दुर्ग म्हणजे समोर बसलेला नंदी असे दृश्य दिसते. माथेरानच्या सनसेट पाँईंटवरून दिसणारा सूर्यास्त प्रबळगड आणि कलावंतीण दुर्गच्या मध्ये होतो.

जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून प्रबळगडाच्या पायथ्याशी असलेल्या माची प्रबळ या गावी पोहचण्यासाठी ठाकूरवाडी या गावातून जावे लागते.

शेडुंग मार्गे :

मुंबई किंवा पुण्याहून पनवेल अथवा कर्जतला आल्यानंतर जून्या पनवेल – पुणे मार्गावर शेडुंगकडे जाणारा मार्ग आहे. शेडुंग गावापासून ठाकूरवाडी गावापर्यंत जाण्यासाठी रिक्षा असतात. तेथून पुढे पाय वाटेने माची प्रबळला पोहचता येते.

माथेरान – प्रबळगड मार्गे :

माथेरानजवळ असलेल्या पिसरनाथ मंदिराजवळून आकसरवाडी गावामधून प्रबळगडचा डोंगर चढता येतो. प्रबळगडावर गिर्यारोहणासाठी माथेरान मार्गे येणारे पर्यटक याच वाटेने येतात. शेंदुंग मार्गे आल्यानंतर माची प्रबळ गावामध्ये प्रबळ गडाच्या पायथ्याशी हॉटेल आहेत. तेथे जेवणाची सोय होऊ शकते. परंतु प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग पाहण्यासाठी मुक्कामी जाणाऱ्या गिरी प्रेमींना माची प्रबळ गावाच्या बाजूस असलेल्या डोंगराच्या पठारावरच तंबू ठोकून रहावे लागते. माची प्रबळ गावामध्ये जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शाळेच्या परिसरात देखील गिरीप्रेमी तंबू ठोकून राहतात.

कलावंतीण दुर्ग

प्रबळगडचा इतिहास :

प्रबळगड केंव्हा बांधला याची इतिहासात नोंद नाही. परंतु प्रबळगडावर असलेल्या गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड ठरवता येऊ शकतो. बुद्ध कालीन अथवा त्यानंतरच्या कालखंडात या गडाचे बांधकाम झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रबळगडाची मोक्याची जागा पाहता परिसरातील पनवेल आणि कल्याणच्या समुद्रातील प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी हा गड बांधण्यात आला असावा, असे म्हणतात. प्रबळगड हा व्यापारी मार्गावर तसेच समुद्र किनार्यापासून जवळच असलेला गड आहे. त्यामुळे शिलाहार आणि यादवांनी येथे लष्करी तळ उभारला होता. यादवांनी त्यावेळी गडास मुरंजन असे नाव दिले होते.

काही काळानंतर मुरंजन अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात आला. त्यावेळी निजामशाहीत असलेल्या शहाजी महाराजांनी मुघलशाही, निजामशाही आणि आदिलशाही असा संघर्ष सुरु असताना मुरंजनावर आश्रय घेतला होता. मुरंजनवर त्यावेळी शहाजी राज्यांच्या सोबत त्यांच्या धर्मपत्नी जिजाबाई साहेब आणि बाळ शिवाजी देखील होते. त्यानंतर इ.स. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला, या तहानुसार मुरंजनवर मोघलांची सत्ता स्थापन झाली.

काही काळानंतर इ. स. १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठेशाहीचा सरदार आबाजी महादेव यास कल्याणच्या मोहिमेवर पाठवले. त्यावेळी कल्याण, भिवंडीपासून रायरीपर्यंतचा सारा मुलूख आबाजी महादेव यांनी स्वराज्यात घेतला. तेंव्हाच हा मुरंजन स्वराज्यात आला. त्यावेळी किल्ल्याचे नाव बदलून किल्ले “प्रबळगड” असे ठेवण्यात आले. ( प्रबळ गडास प्रधानगड असे देखील म्हणतात.) . इ. स. १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मिर्झा राजे जयसिंग यांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड कलावंतीण दुर्ग देखील होता. त्यावेळी मिर्झाराजे जयसिंग यांनी किल्ल्यावर राजपूत सरदार केशरसिंह यांची किल्लेदार म्हणून नेमणूक केली. त्यानंतर झालेल्या केशरसिंह राजपूत आणि मराठ्यांच्या लढाईमध्ये प्रबळगड पुन्हा स्वराज्यात आला. पुढे कंपनी सरकारने प्रबळगडला माथेरानसारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करण्याचा विचार केला होता. परंतु स्थानिक परिस्थितीमुळे ते शक्य होवू शकले नाही.

कलावंतीण दुर्गाचा इतिहास : (साभार इंटरनेट)

असे म्हणतात कि, पूर्वी कोण्या एका राजाचे कलावंती नावाच्या राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून जावू नये, म्हणून त्या राजाने कलावंती राणीला प्रबळगडाच्या शेजारी असलेल्या सुळक्यावर एक महाल बांधून दिला. आजच्या दिवशी कलावंतीण दुर्गच्या सुळक्यावर पाहण्यासारखे काहीच नाही. परंतु सुळक्यावर चढण्याकरिता दगड कापून पायऱ्या तयार केलेल्या आहेत. आणि याची उंची खूप आहे.

प्रबळगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

प्रबळगड आणि कलावंतीण दुर्गवर पाहण्यासारखे तसे काहीच नाही. प्रबळगडावर जात असताना वाटेवर पडलेल्या अवस्थेतील एक बुरुज आहे. प्रबळगडावर गेल्यानंतर आपल्याला दिसते कि समोर पठार आहे. गडावर वास्तूंचे अवशेष आहेत तसेच भरपूर झाडी देखील आहे. प्रबळगडावर एक गणेश मंदिर आहे. तसेच भग्न अवस्थेतील नंदी आहे.

प्रबळगड आणि कलावंतीण दुर्गवर गिर्यारोहण करण्यासाठी गिरीप्रेमी येत असतात. कलावंतीण दुर्गचा सुळका चढण्यास अवघड असल्यामुळे आणि गिर्यारोहणाचा थरार अनुभवता येत असल्यामुळे दुर्गप्रेमी याठिकाणी येत असतात. कलावंतीण दुर्गच्या सर्वात वरच्या टोकावर गेल्यानंतर परिसरातील माथेरान, चांदेरी, पेब दुर्ग, इर्शलगड, कर्नाळा किल्ला आणि समोर पनवेल तसेच नवी मुंबई शहर सहजपणे दिसते.

माची प्रबळ गावाच्या संरक्षकासारखा त्यांच्या मागे उभा असलेला हा मुरंजन डोंगर माची प्रबळ गावातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच कलावंतीण दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकांचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. परिसरातील लोक प्रबळगडावरील मंदिरामध्ये पूजा करतात.

गिर्यारोहणाचा थरार अनुभवण्यास उत्सुक असलेल्या गिरीप्रेमींसाठी प्रबळगड (मुरंजन / प्रधानगड) आणि कलावंतीण दुर्गचे गिर्यारोहण एक पर्वणी आहे.

Monday, 5 February 2018

ओढ शिवजयंतीची

*सह्याद्रीचा सिँह जन्मला*
_आई जिजाऊ पोटी!_
*हर हर महादेवाची घुमली गर्जना*
*गड किल्याच्या ओठी!*
_रायगडावर तुम्ही ऊभारली_
*... शिवराष्ट्राची गुढी!*
_राजे तुम्ही नसता तर_
*सडली असती हिँदुची मढी!*
_तुम्हा मुळे तर आम्ही_
*पाहतो देवळाचे कळस,*
_तुम्ही नसता तर नसती_
*दिसली अंगनात तुळस!*j

*||जय भवानी जय शिवाजी ||*

🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅शुभ रात्री 🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆