! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Friday, 23 June 2017

आंबोली धबधबा

निसर्गरम्य आंबोली बेळगांव आणि गोव्याला जोडणारा रस्ता म्हणजेच आंबोलीचा घाट.पर्यटकांना सतत आव्हान देणारे असे
हे आंबोली सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. आंबोली घाटातून प्रवास करताना निसर्ग पर्यटनाचा आस्वाद पर्यटक मनमुराद घेत
असतात. आकाशाशी स्पर्धा करणार्या टेकड्या, बाराही महिने
हिरव्यागार असणार्या दर्या. पावसाळ्याच्या दिवसात तर या
दर्या अधिकच सुंदर दिसतात. सिंधुदुर्गातील आंबोली गाव समुद्र
सपाटीपासून ६९० मीटर उंचीवर
असलेले थंड हवेचे ठिकाण आहे.

सुट्टीला येथे पर्यटकांचा ओघ सुरु असतो. दाट जंगले, दर्या खोर्यांचा नयनरम्य देखावा असे अमर्याद
सृष्टीसौंदर्य येथून पाहता येते आणि घनदाट जंगलातून मनमुराद भटकंती करण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो.
आंबोली येथील महादेव गड, कावळे साद, शिरगांवकर, नट, सावित्री, सनसेट, पूर्वीचा वस असे असंख्य
पॉईन्ट अहेत. हिरण्यकेशी नदीचा उगम येथूनच होतो.

आंबोलीचे मुंबईपासूनच अंतर ५४९
कि.मी असून, पुणे- आजरा- आंबोली हे अंतर ३९० कि.मी. तर
रत्नागिरी- आंबोली २१५ कि.
मी. आहे. सावंतवाडी हे
आंबोलीच्या जवळ २६ कि.मी
अंतरावर असणारे रेल्वे स्टेशन आहे.
येथून बेळगांव ६४ कि.मी. तर दाभोली (गोवा) १४० कि.मी. आहे.
असे हे आंबोली आता उत्कृष्ट
पर्यटन स्थळ म्हणून विकसित
झालेले असून, दरवर्षी हजारो
पर्यटक येथे येत असतात.
पावसाळ्यात तर फेसाळणार्या शुभ्र अशा धबधब्याखाली स्नानाचा
मनमुराद आनंद लुटण्यासाठी
पर्यटकांची झुंबड उडालेली असते.

No comments:

Post a Comment