! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Friday, 30 June 2017

कृषी दिना’च्या हार्दिक शुभेच्छा

शेतकरी बांधवांना ‘कृषी दिना’च्या हार्दिक शुभेच्छा!…
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र सरकार १ जुलै रोजी कृषी दिन साजरा करते. वसंतराव नाईक यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात राज्यात हरितक्रांती घडवून आणली. या कृषी दिनानिमित्त शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छूक :- बीजे

जीवधन किल्ला

घाटघरच्या परिसरात असलेला हा पूर्वमुखी जीवधन किल्ला प्राचीननाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. शिवजन्माच्या वेळी अस्ताला जाणाऱ्या निजामशाहीच्या देणारा किल्ला म्हणजे जीवधन. १७ जून १६६३ रोजी निजामशाही बुडाली. शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मुर्तिजा निजाम याला जीवधनच्या कैदेतून सोडवून संगमनेरजवळील पेमगिरीकिल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून घोषित केले व स्वतः वजीर बनले.
गडाचा दरवाजा हा कातळकड्यामध्ये कोरलेला आहे.

Tuesday, 27 June 2017

कार्ला-भाजे लेण्या,

लोणावळ्याजवळील कार्ला-भाजे लेण्या, लोहगड,विसापूर, राजमाची, तुंग,तिकोन्याच्या वाटेने पुढे पौडमार्गे मुळशी धरणाला रस्ता जातो, तोच रस्ता खाली कोंकणात माणगाव-कोलाडला उतरतो. हाच तो ताम्हिणी घाट. मुळशी धरणाच्या काठाकाठाने जाणारा हा गाडी रस्ता अतिशय सुंदर असून एकीकडे धरणाचा पाणवठा आणि त्याचबरोबर उंच डोंगर आणि खोल दर्याचा देखावा एक अविस्मरणीय आनंद देतो.
#TamhaniGhat #FaktaMarathi

राजमाची किल्ला

राजमाची किल्ला Rajmachi Fort – हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

खंडाळ्याच्या घाटात घाट सुरु होताना राजमाची पॉईंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच राजमाची किल्ला. येथे जाण्यासाठी लोणावळ्याहून तुंगार्ली गावात जावे नंतर थोड्या चढणीनंतर तुंगार्ली धरणाच्या समोरुन ठाकर वस्तीवरून खाली उतरल्यावर सुमारे १८ किलोमीटर चालल्यावर राजमाचीच्या पायथ्याजवळ जाता येते. पायथ्याला उधेवाडी गांव असून गावातील घरांमध्ये रहाण्याची सोय होते. गडावर थोडीशी तटबंदी बुरुज व इमारतींचे जमीनदोस्त अवशेष दिसतात. किल्ल्याच्या वाटेवरुन जाताना एका बाजुला पावसाळ्यात उल्हास नदीच्या खोऱ्यात घनदाट झाडी प्रचंड धबधबे, उसळणारे ढग, अनेक वैविध्यपूर्ण वनस्पती हे दृश्य अतिशय सुंदर, रमणीय आनंददायी आहे.

सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणाऱ्या डोंगररांगमुळे निर्माण झालेला परिसर ‘उल्हास नदीचे खोरे’ म्हणून ओळखला जातो. याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते. याच ‘उल्हास नदीच्या खोऱ्यांच्या प्रदेशात मुंबईपुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस १५ कि.मी. अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे. कल्याणा नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे. या बंदरापासून बोरघाटामार्गे पुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग. जसा नाणेघाट तसा बोरघाट, त्यामुळे या मार्गावरूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसूलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे. यापैकी सर्वात प्रमुख किल्ले राजमाची. किल्ल्याचा भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिद्धगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामुळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्ट्या एक प्रमुख ठाणं असले पाहिजे. किल्ल्याचा दोन बालेकिल्ले आहेत. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय.

इतिहास : राजमाची किल्ल्याच्या पोटात एक लेणं आहे. यालाच ‘कोडांणे लेणी’ असे म्हणतात. ही लेणी कोंडाणा गावापासून आग्नेयेस २ कि.मी. अंतरावर आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवाटीला खोदलेली आहेत.अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे. या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मीती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. यावरुनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण २५०० वर्षांपूर्वीचा असावा. राजमाची किल्ल्यास पूर्वी ‘कोंकणाचा दरवाजा’ संबोधण्यात येत असे. कल्याणच्या १६५७ च्या स्वारी नंतर त्याचवर्षी शिवजाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटवरील राजमाची, लोहगड, तुंग,तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाकल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीने वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे संभाजी महाराज जिवंत असे पर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते. यानंतर १७१३ मध्ये शाहुमहाराजांनी कान्होनी आंग्रे यांना हा किल्ला दिला. सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. १७७६ मध्ये सदाशिवराव तोतयाने संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटा पर्यंत पोहचला त्याने राजमाची किल्ला घेतला. यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि बाजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला. पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला. उल्हास नदीच्या या पात्रात कोंदीवडे आणि कोंढाणा जवळएका मोठ्या दगडात २१ हंडे पाणी मावेल एवढा पाळणा कोरला असून त्यामध्ये एका बालकाची मूर्ती कोरली आहे. पूर्वी स्थानिक लोक मुलं होण्यासाठी येथे नवस करत असा संदर्भा महाराष्ट्र गॅझेटिअर रायगड जिल्हा सन १९९३ पृष्ठ क्रं ७२१ वर दिला आहे. या परिसरात याला ‘जिजाऊ कुंड’ म्हणतात या कुंडात लोक मोठ्य श्रद्धेने सूर्यस्नान करतात.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : लोणवळ्याहून तुंगार्लीमार्गे राजमाचीला येतांना वाटेतच गावाच्या वेशीजवळ एक योद्ध्याचे स्मारक, अर्धवट तुटलेली तटबंदी, दरवाजाचे अवशेष, गणपति आणि मारुतिरायाची मूर्ती आहे. किल्लावरून, आजुबाजुचा दिसणारा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. किल्ल्याच्या माचीवर वस्ती आहे तिला ‘उधेवाडी’ असे म्हणतात.

उदयसागर तलाव : पावसाळ्यात हा किल्ला मात्र ओसंडून वाहतो. तलावाच्या समोरील टेकाडं खाली उतरून गेल्यावर समोरच एक मोठे पठार लागते. पावसाळ्यात दरीतून पडणाऱ्या धबधब्याचे सुंद्र दृष्य दिसते. हिरवीगार वनश्री अगणित धबधबे आणि सतत कोळसाणारा पाऊस या अल्हाददायक वातावरणामुळे मनोन्मनी कुसुमाग्रजांच्या ओळी गुणगुणायला लागतात. ‘पलिकडे खळाळे इर्मळ निळसर पाणि उतुंग तरुंची उभी सभोती श्रेणी एकाकी धूसर पाऊलवाट मधे ही तिजवरून विहारे मनामध्ये वनराणी.

मनरंजन : उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणाऱ्या या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट सोपी आहे. साधारण अर्ध्या तासात आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारात पोहचतो. मनरंजनवर जाणारी वाट सोपी आहे. या किल्ल्याचा दरवाजा हा गोमुखी आहे. किल्ल्यावर उजवीकडच्या वाटेवर जुन्या काळातीलकिल्लेदारांच्या वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यासमोरच छप्पर उडालेले उत्तम दगडीबांधकामाचे मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाज्यावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. दोन चार पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे. येथून कर्नाळा, प्रबळगड, ईर्शाळगड, ढाकबहिरी, नागफणीचे टोक हा सर्व परिसर दिसतो.

श्रीवर्धन : राजमाचीच्या असणाऱ्या दोन बालेकिल्ल्यापैकी सर्वात उंच असा हा बालेकिल्ला. श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. किल्ल्याला अनेक ठिकाणी दुहेरी तटबंदी असावी असे अवशेषांवरून दिसते. दरवाजाची कमान बऱ्यापैंकी शाबूत आहे. दरवाजाच्याच बाजुला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत. या गुहा म्हणजे दारुगोळ्याचे कोठार आहे. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर एक ध्वजस्तंभ आहे. समोरच ढाकबहिरीचा चित्तथरारक सुळका तर त्याच्या उजव्या हातास असणारा शिरोट्याचा नयनरम्य तलाव हा सर्व परिसर दिसतो.

शंकराचे मंदिर : तलावाच्या पश्चिमेला एक सुंदर कळशीदार शंकराचे मंदिर आहे. या मंदिरासमोरच गोमुख असून त्यातले पाणी समोरच्या टाक्यांमध्ये पडते. सध्या या मंदिराच्या उत्खननाचे काम गावकऱ्यांनी हाती घेतलेले आहे. राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती ‘कातळदरा’ या नावाने ओळखली जाते. या दरीतूनच उल्हास नदी उगम पावते. या नदीच्या पश्चिमेकडील डोंगराला ‘भैरव डोंगर’ म्हणतात. अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या राजमाची किल्ल्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याचे दोन बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्याकडे जातांना वाटेत खडकात खोदलेल्या गुहा लागतात. श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्यांच्या मध्ये एक सखलपट्टी आहे. यावरच भैरवनाथाचे एक मंदिर आहे. मंदिरासमोरच ३ दिपमाळा आणि लक्ष्मीची मूर्ती आहे. येथून डावीकडे जाणारी वाट मनरंजन आणि उजवीकडची वाट श्रीवर्धन किल्ल्यावर जाणारी आहे.

गडावर जाण्याच्या वाटा :

लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे : लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे राजमाची गावात यावे. ही वाट १९ कि.मी. ची आहे. वाटेने किल्लावर जाण्यास पाच तास लागतात.

कर्जतहून कोंदीवडे मार्गे : कर्जतहून कोंदीवडे या गावात बसने यावे. इथून गडावर जाण्यास सुमारे ३ ते ४ तास लागतात.

उधेवाडी गावात राहण्याची सोय उत्तम होते. भैरवनाथाच्या मंदिरातही आणि बालेकिल्ल्यावर जातांना लागणाया गुहेतही राहाता येते. राजमाची रुलर एड एन्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम या संस्थेने बांधलेल्या खोल्यांमध्येही रहाण्याची व्यवस्था होते. राजमाची गावात जेवणाची उत्तम सोय होते. राजमाची गावात पाण्याची सोय होते. गडावर जाण्यासाठी तुंगार्ली मार्गे ५ तास, कर्जत-कोदिंवडे मार्गे २ तास लागतात.

▪ " महाराष्ट्रा "बाबत माहिती▪

👉 स्थापना-01 मे 1960
👉 राज्यभाषा -  मराठी

👉राजधानी -  मुंबई
👉 उपराजधानी - नागपूर 
👉ऐतिहासिकराजधानी- कोल्हापूर
👉 सांस्कृतिकराजधानी- पुणे

👉 एकूण तालुके-353
👉 पंचायत समित्या 351
👉 एकूण जिल्हा परिषद-33
👉 आमदार विधानसभा 288
👉 आमदार विधानपरीषद 78
👉 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
👉 सुमद्रकिनारा-720 किमी
👉 नगरपालिका- 230
👉 महानगरपालिका-26
👉 शहरी भाग - 45%
👉 ग्रामीण भाग 55%
👉 लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
👉 क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
👉 संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
👉 सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - मुंबई उपनगर
👉 महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
👉 महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
👉 जेवण फेमस जिल्हा - कोल्हापूर
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
👉 महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ
👉 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
👉 महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
👉 महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - आष्टा  ( सांगली )🔴
👉 पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
👉 महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - मुंबई
👉 जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
👉 भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
👉 पहिला संपूर्ण संगणीकृत     जिल्हा -नांदेड

👉 चित्रपट विभाग
मराठी चित्रपट नगरी - कोल्हापूर
बॉलिवूड चित्रपट नगरी - मुंबई

!! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!

अस काहीतरी पाठवा ग्रुपमधे ज्यामुळे जनरल नॉलेज वाढेल
जास्तीत जास्त शेअर करा▪

Saturday, 24 June 2017

#शिवतिर्थ #दुर्गदुर्गेश्र्वर #रायगड

असं म्हणतात की, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही..
पण आम्ही आमचा स्वर्ग जिवंतपणीच पाहतो, जगतो अन् अनुभवतो देखील...
अरे मथुरा, काशी सारी तिर्थक्षेत्रे कोणासाठी
ज्या अभाग्याने रायगड न पाहीला त्यांसाठी
होय, आमच्या लेखी हाच आमचा स्वर्ग..
#शिवतिर्थ
#दुर्गदुर्गेश्र्वर
#रायगड

वादळ

Friday, 23 June 2017

आंबोली धबधबा

निसर्गरम्य आंबोली बेळगांव आणि गोव्याला जोडणारा रस्ता म्हणजेच आंबोलीचा घाट.पर्यटकांना सतत आव्हान देणारे असे
हे आंबोली सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. आंबोली घाटातून प्रवास करताना निसर्ग पर्यटनाचा आस्वाद पर्यटक मनमुराद घेत
असतात. आकाशाशी स्पर्धा करणार्या टेकड्या, बाराही महिने
हिरव्यागार असणार्या दर्या. पावसाळ्याच्या दिवसात तर या
दर्या अधिकच सुंदर दिसतात. सिंधुदुर्गातील आंबोली गाव समुद्र
सपाटीपासून ६९० मीटर उंचीवर
असलेले थंड हवेचे ठिकाण आहे.

सुट्टीला येथे पर्यटकांचा ओघ सुरु असतो. दाट जंगले, दर्या खोर्यांचा नयनरम्य देखावा असे अमर्याद
सृष्टीसौंदर्य येथून पाहता येते आणि घनदाट जंगलातून मनमुराद भटकंती करण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो.
आंबोली येथील महादेव गड, कावळे साद, शिरगांवकर, नट, सावित्री, सनसेट, पूर्वीचा वस असे असंख्य
पॉईन्ट अहेत. हिरण्यकेशी नदीचा उगम येथूनच होतो.

आंबोलीचे मुंबईपासूनच अंतर ५४९
कि.मी असून, पुणे- आजरा- आंबोली हे अंतर ३९० कि.मी. तर
रत्नागिरी- आंबोली २१५ कि.
मी. आहे. सावंतवाडी हे
आंबोलीच्या जवळ २६ कि.मी
अंतरावर असणारे रेल्वे स्टेशन आहे.
येथून बेळगांव ६४ कि.मी. तर दाभोली (गोवा) १४० कि.मी. आहे.
असे हे आंबोली आता उत्कृष्ट
पर्यटन स्थळ म्हणून विकसित
झालेले असून, दरवर्षी हजारो
पर्यटक येथे येत असतात.
पावसाळ्यात तर फेसाळणार्या शुभ्र अशा धबधब्याखाली स्नानाचा
मनमुराद आनंद लुटण्यासाठी
पर्यटकांची झुंबड उडालेली असते.

आकाशभेदी कलावंतीणीचा सुळका!

रायगड जिल्ह्यात विराजमान असणारे गडकिल्ले हे विविधतेने नटलेले आहेत. सागरी दुर्गापासून ते डोंगरी किल्ल्यांपर्यंत सर्वामध्येच वेगळेपण सामावलेलं आपल्याला दिसते. जी गोष्ट गडकिल्ल्यांची तीच इथल्या विविध डोंगरशिखरांची! या सर्वाचं दर्शनसुद्धा तेवढंच मोहक आणि आल्हाददायक ठरते. असाच एक विलोभनीय दुर्ग सुळका म्हणजे कलावंतीणीचा सुळका!

पुण्या-मुंबईतून दर वीकेंडला हौशी ट्रेकर्स दाही दिशांनी सह्याद्रीला जणू वेढाच घालत असतात. अशा लोकांसाठी एका दिवसांत बघण्यासारखी अशी अनेक ठिकाणे या जिल्ह्यात कितीतरी आहेत. या कुतूहलमिश्रित यादीत कलावंतीण सुळक्याचं नाव आपल्यासमोर येतं, तेव्हा साहजिकच आपली उत्सुकता चाळवली जाऊन कधी एकदा तिथे पाऊल टाकतोय असं वाटू लागतं आणि याच उत्सुकतेत बेत ठरवला जातो.
सह्याद्रीच्या विविध आकाररूपांनी सजलेल्या डोंगररांगावर जितकं कवित्व करू तितके ते थोडेच आहे. या डोंगररांगेवर अभेद्य गिरीदुर्ग तर आहेतच तसंच भयाण द-यादेखील आहेत. या प्रत्येकाने स्वत:चे असे खास वैशिष्टय़ जपले आहे. यांचे आकार देखील भुरळ पाडणारे असतात. काही दुर्गाच्या वास्तुस्थापत्याने नटलेल्या कलाकृती भान हरपून टाकणा-या असतात. किंबहुना अशा आकाराच्या मोहापायीच आपली पावले या डोंगरवाटांवर घुटमळत असतात. या आकारांमध्ये विशेष लक्षात राहणारे काही डोंगरांचे सुळके हे मात्र भटकंतीच्या विश्वात मानाचं स्थान घेऊन उभे आहेत. काही सरळ आभाळात घुसलेले तर काही पठारावर आडव्या िभतीसारखे वर आलेले. उदाहरणच द्यायचे झालं तर मांगी-तुंगी, तैलबैला, मिच्छद्रगडाचा सुळका इ. अशी ही यादी वाढतच जाणारी आहे. या पंक्तीतच पनवेलजवळच्या कलावंतीणीच्या सुळक्याने देखील असेच आपले स्थान भटक्यांच्या मनात पटकावले आहे.
तसं पाहिलं तर कलावंतीण हा काही दुर्ग नव्हेच. एका डोंगराच्या निमुळत्या उंच होत गेलेल्या शिखराचे टोकच म्हणायला हवे. या सुळक्याला दुर्ग म्हणण्याचा मोह तुम्हा-आम्हासारख्या भटक्यांचाच. याचा इतिहासात काही संदर्भ सापडत नाही. केवळ एका काल्पनिक गोष्टीचा आधार घेतला जातो. ती म्हणजे एका कलावंतीणीचा महाल या सुळक्यावर होता म्हणूनच हे नामकरण झालं. एवढीच या सुळक्याची ओळख. बाकी भूगोलाच्या चष्म्याने या सुळक्याकडे पाहिले की मात्र याची उंची कुतूहल वाढवते. प्रसिद्ध प्रबळगडाच्या शेजारीच अगदी हातात हात घालून हा सुळका त्याचे वेगळं अस्तित्व राखत आणि वैशिष्टय़ जपत मोठय़ा दिमाखात उभा आहे. त्यामुळे प्रबळगड आणि कलावंतीण सुळक्याची सफारी अनेक दुर्गपेमी एकत्रितपणे करत असतात. यासाठी मात्र दोन दिवस हाताशी हवेत. एका दिवसासाठी कलावंतीणीचा पर्याय निवडायचा अन् याच्याकडे कुच करायचे.
कलावंतीणीच्या सुळक्याकडे येण्यासाठी पनवेल-पुणे रस्त्यावरील शेडुंग गावच्या फाटय़ावरून थेट ठाकूरवाडी हे गाव गाठायचे. येथपर्यंत प्रवास हा वाहनाने होतो. पुढचा प्रवास मात्र पायीच करावा लागतो. तासाभराचं अंतर पार करून आपण प्रबळमाची या पायथ्याच्या वाडीपाशी येतो. प्रबळमाची हे प्रबळगडाचं आणि कलावंतीण सुळक्याचं पायथ्याचं सामायिक वस्ती असलेलं गाव. या माचीवर २०-२५ घरांची वस्ती आहे. या ठिकाणी पर्यटकांची राहण्याची, जेवणाची अतिशय सुंदर सोय होऊ शकते. आदल्या रात्री अन् तेही पौर्णिमेच्या दुधाळ रात्री हा योग जर जुळवून आणलाच तर ही भटकंती वेगळाच आनंद देऊन जाईल. असो. माचीवरून प्रबळगड अन् कलावंतीण या दोघांचं दर्शन मोठं विलोभनीय दिसते. डावीकडे आकाशात घुसण्याच्या तयारीत असलेला कलावंतीणीचा दिलखेचक सुळका आणि उजव्या बाजूला अवाढव्य, आडवं पसरत गेलेलं प्रबळगडाचं पठार आणि दोघांच्या मधील इंग्रजी ‘व्ही’ आकाराची खाच. हे दृष्य बघताक्षणीच भुरळ घालणारं असतं. या खाचेतूनच वर सुळक्यासाठी वाट गेली आहे. माचीवरून या खाचेकडे प्रयाण करायचं व दाट झाडीतूनच वीस मिनिटांत या दोघांना जोडणा-या िखडीपाशी यायचं. या िखडीत उभे राहिल्यानंतर दिसणारं निसर्गाचं रूप हे केवळ आणि केवळ अनुभवावं असंच.. दोन्ही बाजूच्या कातळकडय़ांचं रौद्ररूप हे छातीची धडधड वाढवत असतानाच सुळक्यावर जाण्यासाठीच्या पाय-या आपल्याला नजरेत येतात. आणि भटकंतीचा दुसरा स्वप्नवत टप्पा सुरू होतो.
कातळात कोरलेल्या या पाय-या म्हणजे या भटकंतीची जणू गोळाबेरीजच म्हटली पाहिजे. कातळकोरीव पाय-यांचं जेवढं कौतुक करावं तितकं ते थोडंच आहे. आकर्षक व तितक्याच रेखीव पाय-यांची वर जाणारी शिडी पाहून आपण विस्मयचकितच होतो. या पाय-यांवर पाऊल ठेवायच्या अगोदर नकळतपणे हातच फिरवले जातात. यातच सर्व आले. जेव्हा या वळणावळणाच्या, नागमोडी आकाराच्या पाय-यांनी जसं जसं आपण वर जाऊ लागतो तसं तसं हा प्रवास अधिकच रोमांचित होऊ लागतो. या सुबक पाय-यांवर पडणारे प्रत्येक पाऊल हे स्थापत्याच्या या कलासौंदर्यात चिंब भिजूनच बाहेर येत असतं. खरोखरच अशा पाय-यांची अदाकारी फारच थोडय़ा ठिकाणी पाहायला मिळते. पाय-यांचा हा स्वप्नवत टप्पा पार करून आपण एका छोटय़ा रॉक-पॅचपाशी येतो. येथे सोपे प्रस्तरारोहण करूनच माथ्यावर यावे लागते.
माथ्यावर ठेवलेल्या पहिल्या पावलातच आपण या सुळक्याचेच होऊन जातो. या ठिकाणाहून इरशाळगड, पेठ हे साद घालताना दिसतात तर दूरवर दिसणारे माथेरानचे पॉइंट्स हे भुरळ घालतात. पण या सर्वात भारदस्त वाटतो तो या सुळक्याचा सख्खा शेजारी प्रबळगडच! हे सारे पाहतानाच निरोपाची घडी जवळ येत असते. अवघ्या एका दिवसात होणारी कलावंतीण सुळक्याची ही सफर ही मन ताजतवानं करणारी ठरते. या उंच सुळक्याची चढाई ही मनस्वी आनंद तर देतेच; पण त्याहीपेक्षा कातळात कोरलेल्या नितांत सुंदर पाय-यांच्या स्थापत्यशास्त्रात मन अगदी भिजवून सोडते.

Thursday, 22 June 2017

लिंगाणा

-
सह्याद्रीच्या ऐन कातळकड्याला खेटून रायगड जिल्ह्यात उभा असलेला हा किल्ला. खरं तर सुळकाच..
याच्या निम्म्या उंचीला एक खोदीव गुहा आहे. इथवर पोचणं हेच फार जिकिरीचं काम आहे.. बऱ्याच गिर्यारोहकांच्या यादीत हा किल्ला घर करुन बसलेला आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेल्या रायलिंग पठारावरुन या सुळक्याच्या माथ्यापर्यंतचा परिसर लांबून का होईना, न्याहाळता येतो. इथूनच खाली कोकणात उतरणाऱ्या वाटेचं संरक्षण हे या किल्ल्याचं उद्दिष्ट.. एखाद्याला शिक्षा करायची असल्यास इथल्या गुहेत सोडून द्यावे.. बाकी काम लिंगाणा चोख पार पाडत असे...