! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Tuesday, 21 February 2017

किल्ले सिंधुदूर्ग


किल्ल्याचा प्रकार - जलदुर्ग                                                                                                               श्रेणी - सोपी 

जिल्हा - सिंधुदूर्ग

                            सागरी प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी छ. शिवाजी महाराजांना जलदुर्ग उभारण्याची निकड जाणवू लागली. यासाठी त्यांनी मालवण शेजारील "कुरटे' बेटाची निवड केली. महाराजांच्या आज्ञेनुसार हिरोजी इंदुलकरांच्या नेतृत्वाखाली हजारो मजूरांनी सलग 3 वर्षे मेहनत घेऊन सिंधुदर्गची निर्मिती केली. याकामी सुमारे एक कोटी होन खर्ची पडले.( १ होन = ४ रू.)

                                                  

इतिहास -

                        सिंधुदुर्गच्या उभारणीस 25 नोव्हेंबर 1664 रोजी सुरवात झाली. सलग 3 वर्षे हे काम चालू होते. सिंधुदुर्ग हा 48 एकर परसलेला आहे आणि तटबंदी 2 मैल (3 कि.मी.) आहे. सिंधुदुर्गच्या तटाच्या भिंतीची उंची सुमारे 30 फूट (9.1 मी) तर रुंदी 12 फूट (3.7 मी) आहे. सागरी लाटांपासून तसेच परकीय आक्रमणापासून संरक्षणासाठी या प्रचंड भिंती उभारलेल्या आहेत. छ. शिवाजी महाराजांच्या तसेच छ. संभाजीराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्यावर हल्ला करण्याचे धाडस कोणीही दाखविले नाही.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

                          होडीतून किल्ल्यामध्ये पायउतार झाल्यावर महाद्वारातून आत प्रवेश करावा. किल्ल्याचे प्रवेशद्वार गोमुखी बांधणीचे आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर दगडी पायऱ्यांनी नगारखान्यात प्रवेश करता येतो. नगारखान्याच्या डाव्या बाजूला दोन घुमट्या आढळतात. किल्ल्याचे बांधकाम चालू असताना त्याच्यी पाहणी करण्यासाठी महाराज आले होते. त्यावेळी चुन्याच्या ओल्या गिलव्यावरून महाराज चालत गेले. महाराजांच्या डाव्या पायाच्या व उजव्या हाताचा ठसा तेथे उमटला. आज त्या जागेवर घुमट्या बांधून त्याचे जतन केले आहे. इथून पुढे गडाच्या तटफेरीला सुरवात करावी, भल्यामोठ्या बुरूजांचे व नागमोडी तटबंदीचे निरीक्षण करीत चालत रहावे. किल्ल्यावर एकूण 42 बुरूज आहेत. तटामध्ये पहारेऱ्यांसाठी असणारे शौचकप आहेत. एका बुरूजाच्या बाजूने बाहेर समुद्राकडे जाण्यासाठी दरवाज आहे. तथील पळण आपले लक्ष वेधून घेते, याला "राणीच्या वेळा' असे म्हणतात. राणी जलक्रीडा करण्यासाठी याचा वापर करीत. तटफेरी पूर्ण करून शिवराजेश्‍वर मंदिराकडे चालू लागायचं. शिवराजेश्‍वर मंदिर हे राजाराम महाराजांनी बांधलेले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ्या पाषाणात कोरलेली शिवछत्रपतींची मूर्ती आहे. दररोज भल्या पहाटे मुर्तीला अभिषेक घातला जातो. त्यानंतर चांदीचा मुखवटा, जिरेटोप आणि वस्त्रे चढविली जातात. समोर एक तलवार ठेवण्यात येते. महाराजांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदीर आहे. पुढे महादेवाचे मंदीर आहे. पुढे भवानी मातेचे मंदीर लागते. गडावर दहीबाव, साखरबाव, दुधबाव अशा नावांच्या विहीरी आढळतात. वाड्याचे पडके अवशेष पाहत निशाणकाठी बुरूजावर यावे, तेथून गडाची तटबंदी तसेच गडाचा विस्तृत प्रदेश नजरेस पडतो.

संपूर्ण गड पाहण्यास 2-3 तास लागतात.

No comments:

Post a Comment