Indian navy.
छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराविषयीचे धोरण आज्ञापत्रात स्पष्ट दिसते. ‘ज्याचे आरमार त्याचा समुद्र’
हे त्यांनी पुरेपूर ओळखले होते.
आरमाराला साथ देण्याकरीता त्यांनी जलदुर्गांची एक शृंखलाच कोकण किनारपट्टीवर उभी केली. शिवकालीन नौका
1) संदेश वाहक होडी-
हा होडीचा सर्वात लहान प्रकार असून तो केवळ वल्हवता येत असे.यावर डोलकाठी नसत क्वचितच एखादे शिड असे. होड्या केवळ संदेश आणि पिण्याचे पाणी ने आण करण्याकरिता वापरल्या जात.
2) मचवा –
मचवा हे एक छोटे जहाज असून ते वल्हवता येत असे.त्यावर सुमार २५-४० सैनिक असत.हे जहाज त्वरेने हालचाल करत असे.ह्यावर शक्यतो तोफा नसत व केवळ छर्रे व ठासणीची बंदुके असणारी शिपायांची तुकडी असे. असलीच तर लहान पल्ल्याची व छोटे गोळे फेकणारी एक तोफ मचव्यावर असत व तोफ असताना सैनिकांची संख्या कमी असे.
3) शिबाड –
शिबाड हा मालवाहू जहाजाचा प्रकार आहे त्यावर तोफा बसवून ते युद्धासाठीही वापरता येत असे.यावर एक डोलकाठी व शिड असून हे जहाज वल्हवता येत नसे. ते केवळ वारयाच्या आधारे एकाच दिशेने चालत असे.
4) गुराब –
हे जहाज शिबाडापेक्षा मोठे असून त्यावर किमान २ व क्वचित ३ डोलकाठ्या असत व प्रत्येक डोलकाठीवर २ चौकोनी शिड असत व बऱ्याचदा एक लहान त्रिकोणी शिडही असे.ह्यामुळे ते विविध दिशांच्या वाऱ्याच उपयोग करून विविध दिशांना चालवता येत असे.गुराबेवर जहाजाच्या लाम्बीशी काटकोनात प्रत्येक बाजूने ५-७ तसेच नाळेवर समोरून व पिछाडीस एक तोफ असे.या तोफा माध्यम पल्ल्याच्या असून त्या ५-६ पौंड वजनाचे गोळे फेकू शकत. ह्यावर सुमार १००-१५० सैनिक असत.
जगाच्या पाठिवरचा सर्वात बुध्दिवान आणि काळाच्या पुढे एक पाऊल असणारा रयतेचा राजा
म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज…
No comments:
Post a Comment