माथ्यावर छत्र नाही, चरणावर फुल नाही कि दिव्याचा मिणमिणता उजेड नाही... मित्रानो हे कोणते ठिकाण आहे माहित आहे का...?
हे आहे छत्रपती शिवरायांच्या बरोबरीने रयतेसाठी हयातभर खस्ता खात रयतेच्या स्वराज्याची स्वप्न पाहणाऱ्या आई जिजाऊच्या लाडक्या स्नुषा, छत्रपती शिवरायांची प्रिय अर्धांगिनी, छत्रपती संभाजीराजे यांच्या वंदनीय मातोश्री व स्वराज्याच्या पहिल्या महाराणी सईबाईसाहेब महाराज यांची किल्ले राजगडावरती उघड्यावरती आहे
आज ज्या राज्यात न पावणाऱ्या देवाला सोन्याचे सिंहासन मिळते..हाती तलवार हि न धरलेल्या शेंबड्या वीरांची महाकाय स्मारके उभारली जातात..कुडमुड्या लेखक व कवींची स्मृतिस्थळे जोपासली जातात..भ्रष्टाचारने बरबटलेल्या नेत्यांच्या महाकाय समाध्या उभ्या केल्या जातात..औरंजेबाच्या व आफ्झुल्याच्या समाधीला पंचतारांकित सुविधा मिळतात..त्याच राज्यात आज छत्रपती शिवरायांना कायम स्फुर्तीस्थानी असलेल्या व छत्रपती संभाजी महाराज नावाच्या तुफानाला जन्म देणाऱ्या ह्या स्वराज्याचा आध्य महाराणींच्या समाधीला मात्र वनवासच लाभत आहे हे पाहून कुठल्याही मराठी माणसाच्या काळजाला भोके पडली पाहिजेत दुर्दैवाने पण तसे होताना मात्र दिसत नाही..ज्यांची पाऊले आपण वंदन केली पाहिजेत त्याच सईबाईसाहेबाची हि अवहेलना होत आहे ह्याहून आपल्या महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट कोणती असू शकते..?
आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी अखंड लक्ष्मी अलंकृत सखल सौभाग्यामंडीत महाराणीसरकार सईबाईसाहेब यांची 358 वी पुण्यतिथी त्यानिमित्त आपल्या मराठी माणसांना त्यांची एक आठवण...
नको तिथे लख्ख दिवे अन गरज तिथे काजवे. सरकार आपले खिसे भरण्यात मग्न आहे.
No comments:
Post a Comment