बीजे
पुणे जिल्हा हा ऐतिहासिक घडामोडीचे एक प्रमुख केंद्र आहे.. छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून ते महात्मा गांधीच्या वास्तव्यापर्यंत अनेक घटनांचे साक्षीदार असलेला जिल्हा म्हणून इतिहासांच्या पानात नोंद आहे.. असंच एक इतिहासातलं पान नुकतंच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ‘पाबळ’ या गावी जाऊन उलगडता आलं...
पाबळ गावी मस्तानीची समाधी पाहण्याचा योग नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात आला. त्या समाधीला पाहून ज्या भावना मनात उमटल्या त्या तुम्हालाही कळाव्यात आणि मस्तानीच्या स्मृतीला उजाळा मिळावा म्हणून टाकलेला हा प्रकाश..
पुणे जिल्हा हा ऐतिहासिक घडामोडींचे एक प्रमुख केंद्र आहे.. छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून ते महात्मा गांधीच्या वास्तव्यापर्यंत अनेक घटनांचे साक्षीदार असलेला जिल्हा म्हणून इतिहासाच्या पानात नोंद आहे.. असंच एक इतिहासातलं पान नुकतंच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ‘पाबळ’ या गावी जाऊन उलगडता आलं.. काय आहे या पानात..?
इतिहासाच्या दृष्टीने हे पान काहीसं दुर्लक्षित होतं आणि आहे.. ते आजही प्रकर्षांने जाणवते.. हे इतिहासातील पात्र काही वाहिन्यांनी कथानक म्हणून निवडलं त्याला चांगला टीआरपीही घेतला.. पण प्रत्यक्षात या पात्राची उपेक्षा मृत्यूनंतरही जवळजवळ तीन शतकांनंतरही कायम आहे. का झाली उपेक्षा.. काय गुन्हा केला होता.. तो तीन शतकांनंतरही पुसला जात नाही.. तो गुन्हा होता एका जिगरबाज योद्धय़ावर भरभरून प्रेम केल्याचा.. आता तुम्हाला उकल झाली असेल मी कोण्या ऐतिहासिक पात्रासंदर्भात बोलतोय ते.. हो.. तेच.. बाजीरावावर जिवापाड प्रेम करणाऱ्या मस्तानीवर..!
मला इतिहासात काय झाले हे पुन्हा तुम्हाला सांगायची गरज नाही.. ते ठिकाण बघून मन पिळवटून गेलं.. घालमेल झाली ते व्यक्त करण्यासाठी या माझ्या भावना आ�
[22:42, 23/12/2015] बीजे: आहेत. माझं मन त्या इतिहासातील घटनांचा अंदाज बांधत थेट शनिवारवाडय़ात गेलं. मस्तानी दरवाज्याच्या कोपऱ्यात येऊन थांबलं.. आरासपानी सौंदर्याची मालकीण या वाडय़ाच्या कोपऱ्यात आपला गुदमरलेला श्वास घेऊन का राहिली असेल..
काय करावें तें आतां ! झालें न येसें बोलता !!
नाहीं दोघांचिये हाती ! गांठी घालावी एकांती !!
या अभंगाच्या ओळी तिच्या मन:स्थितीचे भान टिपण्यासाठी अतिशय चपखल बसतात.
माझं मन त्या इतिहासातील घटनांचा अंदाज बांधत थेट शनिवारवाडय़ात गेलं. मस्तानी दरवाज्याच्या कोपऱ्यात येऊन थांबलं.. आरासपानी सौंदर्याची मालकीण या वाडय़ाच्या कोपऱ्यात आपला गुदमरलेला श्वास घेऊन का राहिली असेल.
तो एकांतवास मिळवण्यासाठी दोघांनाही किती यत्न करावे लागले असतील.. निरपेक्ष प्रेमाला समाजाच्या विखारी नजरांसमोर जावे लागले असेल.. त्यातूनच बाजीरावांनी मस्तानीला पाबळ या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला असावा. पाबळ हे गाव भौगोलिकदृष्टय़ा डोंगराळ भागात मोडते.. पुण्यापासून जवळपास ५० ते ६० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. पाण्याची वानवा असलेला (आज ती परिस्थिती नाही) भाग असल्यामुळे त्याकाळी फार मोठी लोकवस्ती त्या ठिकाणी असण्याची शक्यता फारच कमी वाटते. त्यामुळेच इथे दोघांना एकांतवास मिळेल म्हणून हे ठिकाण निवडले असावे.. पाबळ गावच्या वेशीपासून अर्धा किलोमीटरच्या अंतरावर हा भव्य वाडा बांधल्याच्या आज फक्त खुणा दिसतायत. आता तो भग्न अवस्थेतील वाडा आपल्या शेवटच्या घटका मोजताना दिसतो आहे.
हिर-रांझा.. लला- मजनू.. यांचा प्रेम इतिहास गौरवाने सांगितला जातो.. थोडय़ाफार प्रमाणात साम्य असलेल्या या प्रेमाला मात्र इतिहासातही ‘एक ठेवलेली बाई’ अशा अतिशय हिनकसपणे रंगवलं जातं. खरं तर एक क्रांतिकारी प्रेमकहानी म्हणून हे इतिहासातील सोनेरी पान म्हणून आपण जपून ठेवावे असेच आहे. जोधा-अकबरच्या प्रेमाला
[22:44, 23/12/2015] बीजे: प्रेमाला इतिहासाने जसे स्वीकारले तसे बाजीराव-मस्तानीला इतिहास आणि आजचं समाजमनही स्वीकारत नाही.. हे त्या जीर्ण झालेल्या ऐतिहासिक स्थानाकडे बघून वाटतं...
मस्तानीच्या स्मृतीला एक रोमांचक इतिहास म्हणून महत्त्व मिळेल अशी अपेक्षा करायला तरी हरकत नाही. म्हणतात ना जो समाज आपला इतिहास सांभाळतो तोच सुसंस्कृत आणि समृद्ध समजला जातो.
मस्तानीने गिळलेला हिरा आणि चोर
मस्तानीच्या समाधीस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला समाधीतील काही चिरे पुन्हा नव्याने सांधलेले दिसतील.. मी त्याबाबत काही जणांना छेडले असता जी माहिती मिळाली ती (खरी की खोटी हे काळच जाणे ) खरंच फार चमत्कारी आहे. मस्तानीची समाधी आतापर्यंत एकूण तीन वेळा चोरांनी खोदण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील दोन वेळा समाधीपासून अंदाजे चार ते पाच फूट अंतरावर खोल खड्डा करून समाधीच्या आतपर्यंत बोगदा पाडला होता. तर एक वेळा समाधीवरील दगड काढून खाली खोदण्याचा प्रयत्न केला होता. पण तत्कालीन बांधकामशास्त्र कमिशनवर चालत नसल्यामुळे अतिशय मजबूत होते. त्यामुळे दोन थरांच्या पुढे चोरांना जात आले नाही.. ते तसेच टाकून चोर पळून गेले.. हा खटाटोप कशासाठी केला असेल असे तुम्हाला वाटत असेल तर ऐका.. मस्तानीने मृत्यूपूर्वी एक मौल्यवान हिरा गिळला होता म्हणे..तो मिळावा म्हणून हा चोरांचा उपद्व्याप होता. हे कळले.. मला फार आश्चर्य वाटले; तुम्हालाही वाटले ना आश्चर्य !
[22:44, 23/12/2015] बीजे: एकेकाळी केवळ एकांतवास मिळावा म्हणून निवडलेलं स्थळ आज मात्र एकांताचीच भीती वाटावी असं झालं आहे. आम्ही मस्तानीची समाधी पाहण्यापूर्वी त्या गावातील इतर स्थळं पाहिली त्यात भव्य भरवनाथ मंदिर आणि जैन मंदिर पाहिले. दोन्ही मंदिरं गावाच्या वैभवात भर पाडणारे आहेत. मात्र ज्या मस्तानीच्या समाधीचे स्थान म्हणून मागच्या तीन शतकापासून जगभरातील इतिहासांच्या अभ्यासकांना खुणवणाऱ्या या गावात ही समाधी मात्र भग्न अवस्थेत पाहून काय दुर्दैवी होती ही सौंदर्याची सम्राज्ञी.. असंच वाटून जातं. िहदूंनी ‘ठेवलेली बाई’ म्हणून झटकले तर मुस्लीम समाजाला ती आपली वाटली नाही. मस्तानीच्या मृत्यूनंतर त्यावर जो चबुतरा बांधला आहे त्याची रचना समाधीसारखी आहे.. पण आज ती कबर म्हणून ओळखली जाते. दहा बाय पाच लांबी-रुंदी असलेल्या या समाधीवर एक फुलाची वेली आहे. ती वेली कधीही सुकत नाही असे जाणकार सांगतात. माझे प्रेम हे अमर होते आणि आहे अशीच कबुली या अमर वेलीच्या रूपात मस्तानी देत तर नसावी ना! असं त्या न सुकणाऱ्या वेलीकडे बघून क्षणभरासाठी वाटले. दिल्लीपर्यंत आपल्या मनगटाच्या बळावर साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या या योद्धय़ाच्या मनावर राज्य करणाऱ्या मस्तानीला समाजाने मात्र स्वीकारले नाही हे मात्र भूतकाळ, वर्तमानाने सिद्ध केलं आहे.
पश्चिम राष्ट्रांनी स्वत:च्या इतिहासाचे संवर्धन करून इतरांचाही इतिहास आपल्या संशोधनासाठी जवळ
[22:45, 23/12/2015] बीजे: बाळगला. इतिहासाचे महत्त्व त्या लोकांना कळते. म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांची तलवार, कोहिनूर आणि तुलनेने अलीकडच्या गांधीजींच्या वस्तू संग्रही ठेवल्या. त्या मिळवण्यासाठी आपण आज प्रयत्न करतो आहोत. या सर्व गोष्टींचा बोध घेऊन आपणही भविष्यात कदाचित हे शिकू.. त्यानंतर मस्तानीच्या स्मृतीला एक रोमांचक इतिहास म्हणून महत्त्व मिळेल अशी अपेक्षा करायला तरी हरकत नाही. म्हणतात ना जो समाज आपला इतिहास सांभाळतो तोच सुसंस्कृत आणि समृद्ध समजला जातो. ते आपल्या बाबतीतही व्हावे ही आशा (कदाचित वेडी) बाळगून मस्तानीच्या समाधीला आणि तिच्या अपार प्रेमाला सलाम करून मी थांबतो. आपणही अवश्य जा आणि वेलीला हात लावून सांगा.. इतिहासाने तुला बदनाम केले. आम्ही मात्र निदान तुझ्या प्रेमाचा तरी गौरव करू..!!
पुणे जिल्हा हा ऐतिहासिक घडामोडीचे एक प्रमुख केंद्र आहे.. छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून ते महात्मा गांधीच्या वास्तव्यापर्यंत अनेक घटनांचे साक्षीदार असलेला जिल्हा म्हणून इतिहासांच्या पानात नोंद आहे.. असंच एक इतिहासातलं पान नुकतंच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ‘पाबळ’ या गावी जाऊन उलगडता आलं...
पाबळ गावी मस्तानीची समाधी पाहण्याचा योग नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात आला. त्या समाधीला पाहून ज्या भावना मनात उमटल्या त्या तुम्हालाही कळाव्यात आणि मस्तानीच्या स्मृतीला उजाळा मिळावा म्हणून टाकलेला हा प्रकाश..
पुणे जिल्हा हा ऐतिहासिक घडामोडींचे एक प्रमुख केंद्र आहे.. छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून ते महात्मा गांधीच्या वास्तव्यापर्यंत अनेक घटनांचे साक्षीदार असलेला जिल्हा म्हणून इतिहासाच्या पानात नोंद आहे.. असंच एक इतिहासातलं पान नुकतंच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ‘पाबळ’ या गावी जाऊन उलगडता आलं.. काय आहे या पानात..?
इतिहासाच्या दृष्टीने हे पान काहीसं दुर्लक्षित होतं आणि आहे.. ते आजही प्रकर्षांने जाणवते.. हे इतिहासातील पात्र काही वाहिन्यांनी कथानक म्हणून निवडलं त्याला चांगला टीआरपीही घेतला.. पण प्रत्यक्षात या पात्राची उपेक्षा मृत्यूनंतरही जवळजवळ तीन शतकांनंतरही कायम आहे. का झाली उपेक्षा.. काय गुन्हा केला होता.. तो तीन शतकांनंतरही पुसला जात नाही.. तो गुन्हा होता एका जिगरबाज योद्धय़ावर भरभरून प्रेम केल्याचा.. आता तुम्हाला उकल झाली असेल मी कोण्या ऐतिहासिक पात्रासंदर्भात बोलतोय ते.. हो.. तेच.. बाजीरावावर जिवापाड प्रेम करणाऱ्या मस्तानीवर..!
मला इतिहासात काय झाले हे पुन्हा तुम्हाला सांगायची गरज नाही.. ते ठिकाण बघून मन पिळवटून गेलं.. घालमेल झाली ते व्यक्त करण्यासाठी या माझ्या भावना आ�
[22:42, 23/12/2015] बीजे: आहेत. माझं मन त्या इतिहासातील घटनांचा अंदाज बांधत थेट शनिवारवाडय़ात गेलं. मस्तानी दरवाज्याच्या कोपऱ्यात येऊन थांबलं.. आरासपानी सौंदर्याची मालकीण या वाडय़ाच्या कोपऱ्यात आपला गुदमरलेला श्वास घेऊन का राहिली असेल..
काय करावें तें आतां ! झालें न येसें बोलता !!
नाहीं दोघांचिये हाती ! गांठी घालावी एकांती !!
या अभंगाच्या ओळी तिच्या मन:स्थितीचे भान टिपण्यासाठी अतिशय चपखल बसतात.
माझं मन त्या इतिहासातील घटनांचा अंदाज बांधत थेट शनिवारवाडय़ात गेलं. मस्तानी दरवाज्याच्या कोपऱ्यात येऊन थांबलं.. आरासपानी सौंदर्याची मालकीण या वाडय़ाच्या कोपऱ्यात आपला गुदमरलेला श्वास घेऊन का राहिली असेल.
तो एकांतवास मिळवण्यासाठी दोघांनाही किती यत्न करावे लागले असतील.. निरपेक्ष प्रेमाला समाजाच्या विखारी नजरांसमोर जावे लागले असेल.. त्यातूनच बाजीरावांनी मस्तानीला पाबळ या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला असावा. पाबळ हे गाव भौगोलिकदृष्टय़ा डोंगराळ भागात मोडते.. पुण्यापासून जवळपास ५० ते ६० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. पाण्याची वानवा असलेला (आज ती परिस्थिती नाही) भाग असल्यामुळे त्याकाळी फार मोठी लोकवस्ती त्या ठिकाणी असण्याची शक्यता फारच कमी वाटते. त्यामुळेच इथे दोघांना एकांतवास मिळेल म्हणून हे ठिकाण निवडले असावे.. पाबळ गावच्या वेशीपासून अर्धा किलोमीटरच्या अंतरावर हा भव्य वाडा बांधल्याच्या आज फक्त खुणा दिसतायत. आता तो भग्न अवस्थेतील वाडा आपल्या शेवटच्या घटका मोजताना दिसतो आहे.
हिर-रांझा.. लला- मजनू.. यांचा प्रेम इतिहास गौरवाने सांगितला जातो.. थोडय़ाफार प्रमाणात साम्य असलेल्या या प्रेमाला मात्र इतिहासातही ‘एक ठेवलेली बाई’ अशा अतिशय हिनकसपणे रंगवलं जातं. खरं तर एक क्रांतिकारी प्रेमकहानी म्हणून हे इतिहासातील सोनेरी पान म्हणून आपण जपून ठेवावे असेच आहे. जोधा-अकबरच्या प्रेमाला
[22:44, 23/12/2015] बीजे: प्रेमाला इतिहासाने जसे स्वीकारले तसे बाजीराव-मस्तानीला इतिहास आणि आजचं समाजमनही स्वीकारत नाही.. हे त्या जीर्ण झालेल्या ऐतिहासिक स्थानाकडे बघून वाटतं...
मस्तानीच्या स्मृतीला एक रोमांचक इतिहास म्हणून महत्त्व मिळेल अशी अपेक्षा करायला तरी हरकत नाही. म्हणतात ना जो समाज आपला इतिहास सांभाळतो तोच सुसंस्कृत आणि समृद्ध समजला जातो.
मस्तानीने गिळलेला हिरा आणि चोर
मस्तानीच्या समाधीस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला समाधीतील काही चिरे पुन्हा नव्याने सांधलेले दिसतील.. मी त्याबाबत काही जणांना छेडले असता जी माहिती मिळाली ती (खरी की खोटी हे काळच जाणे ) खरंच फार चमत्कारी आहे. मस्तानीची समाधी आतापर्यंत एकूण तीन वेळा चोरांनी खोदण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील दोन वेळा समाधीपासून अंदाजे चार ते पाच फूट अंतरावर खोल खड्डा करून समाधीच्या आतपर्यंत बोगदा पाडला होता. तर एक वेळा समाधीवरील दगड काढून खाली खोदण्याचा प्रयत्न केला होता. पण तत्कालीन बांधकामशास्त्र कमिशनवर चालत नसल्यामुळे अतिशय मजबूत होते. त्यामुळे दोन थरांच्या पुढे चोरांना जात आले नाही.. ते तसेच टाकून चोर पळून गेले.. हा खटाटोप कशासाठी केला असेल असे तुम्हाला वाटत असेल तर ऐका.. मस्तानीने मृत्यूपूर्वी एक मौल्यवान हिरा गिळला होता म्हणे..तो मिळावा म्हणून हा चोरांचा उपद्व्याप होता. हे कळले.. मला फार आश्चर्य वाटले; तुम्हालाही वाटले ना आश्चर्य !
[22:44, 23/12/2015] बीजे: एकेकाळी केवळ एकांतवास मिळावा म्हणून निवडलेलं स्थळ आज मात्र एकांताचीच भीती वाटावी असं झालं आहे. आम्ही मस्तानीची समाधी पाहण्यापूर्वी त्या गावातील इतर स्थळं पाहिली त्यात भव्य भरवनाथ मंदिर आणि जैन मंदिर पाहिले. दोन्ही मंदिरं गावाच्या वैभवात भर पाडणारे आहेत. मात्र ज्या मस्तानीच्या समाधीचे स्थान म्हणून मागच्या तीन शतकापासून जगभरातील इतिहासांच्या अभ्यासकांना खुणवणाऱ्या या गावात ही समाधी मात्र भग्न अवस्थेत पाहून काय दुर्दैवी होती ही सौंदर्याची सम्राज्ञी.. असंच वाटून जातं. िहदूंनी ‘ठेवलेली बाई’ म्हणून झटकले तर मुस्लीम समाजाला ती आपली वाटली नाही. मस्तानीच्या मृत्यूनंतर त्यावर जो चबुतरा बांधला आहे त्याची रचना समाधीसारखी आहे.. पण आज ती कबर म्हणून ओळखली जाते. दहा बाय पाच लांबी-रुंदी असलेल्या या समाधीवर एक फुलाची वेली आहे. ती वेली कधीही सुकत नाही असे जाणकार सांगतात. माझे प्रेम हे अमर होते आणि आहे अशीच कबुली या अमर वेलीच्या रूपात मस्तानी देत तर नसावी ना! असं त्या न सुकणाऱ्या वेलीकडे बघून क्षणभरासाठी वाटले. दिल्लीपर्यंत आपल्या मनगटाच्या बळावर साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या या योद्धय़ाच्या मनावर राज्य करणाऱ्या मस्तानीला समाजाने मात्र स्वीकारले नाही हे मात्र भूतकाळ, वर्तमानाने सिद्ध केलं आहे.
पश्चिम राष्ट्रांनी स्वत:च्या इतिहासाचे संवर्धन करून इतरांचाही इतिहास आपल्या संशोधनासाठी जवळ
[22:45, 23/12/2015] बीजे: बाळगला. इतिहासाचे महत्त्व त्या लोकांना कळते. म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांची तलवार, कोहिनूर आणि तुलनेने अलीकडच्या गांधीजींच्या वस्तू संग्रही ठेवल्या. त्या मिळवण्यासाठी आपण आज प्रयत्न करतो आहोत. या सर्व गोष्टींचा बोध घेऊन आपणही भविष्यात कदाचित हे शिकू.. त्यानंतर मस्तानीच्या स्मृतीला एक रोमांचक इतिहास म्हणून महत्त्व मिळेल अशी अपेक्षा करायला तरी हरकत नाही. म्हणतात ना जो समाज आपला इतिहास सांभाळतो तोच सुसंस्कृत आणि समृद्ध समजला जातो. ते आपल्या बाबतीतही व्हावे ही आशा (कदाचित वेडी) बाळगून मस्तानीच्या समाधीला आणि तिच्या अपार प्रेमाला सलाम करून मी थांबतो. आपणही अवश्य जा आणि वेलीला हात लावून सांगा.. इतिहासाने तुला बदनाम केले. आम्ही मात्र निदान तुझ्या प्रेमाचा तरी गौरव करू..!!
No comments:
Post a Comment