! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Friday, 14 August 2015

! "भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्व मिञांना हार्दीक शुभेच्छा" !



देवाला एकच विनंती, भारत देशाची आम्ही शाळेत घेतलेली प्रतिज्ञा आम्हाला विसरु देऊ नको. प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावर मानाने विराजमान झालेल्या ह्या प्रतिज्ञेला आज मनातल्या कुठल्या का होईना एखाद्या पानावर एक स्थान आहे, ते असेच निढळ राहु देत.

भारत माझा देश आहे।
सगळे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

जय हिंद… जय भारत

!!!!! " बीजे एक वादळ " !!!!!

Thursday, 6 August 2015

! " किल्ले देवगीरी वरिल आकष॔क मेंढा तोफ " !

‪#‎मेंढा‬ तोफ देवगिरी किल्ल्यावर ‪#‎चिनी‬ महालापासुन जवळच एका ‪#‎बुरुजावर‬ ही मेंढा तोफ आहे. ‪#‎चारही‬ दिशांना फिरू शकणाऱ्या ह्या तोफेला मागच्या बाजुला मेंढ्याचे तोंड आहे त्यामुळे ह्या तोफेला मेंढा ‪#‎तोफ‬ असे नाव पडले. ‪#‎मुस्लिम‬ शासक हिला ’तोप किला शिकन’ म्हणजे ’किल्ला तोडणारी तोफ’ म्हणतात. या तोफेवर दोन उल्लेख आहे, ‪#‎संपूर्ण‬ खिताबासहीत एक ‪#‎औरंगजेबाचा‬ आणि दुसरा तोफ निर्मात्याचे नाव मुहमद-हुसेन अमल-ए-अरब असे लिहिलेलं आहे.



Wednesday, 5 August 2015

! " किल्ले देवगीरी " !

दौलताबाद किल्ला (दौलताबाद, जि. औरंगाबाद)दौलताबाद हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक गाव असून येथेच हा एक किल्ला आहे. १२९६ मध्ये अल्ला‍उद्दिन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने प्रथम दख्खन प्रांतात प्रवेश करून यादवांचा पराभव केला आणि त्यांची संपत्ती लुटून त्यांना दरिद्री बनवले. सेनापती मलीक कफूर याने अल्ला‍उद्दिनाच्या कार्याची पूर्ती केली आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली..-इतिहास-देवगिरी हा एक अपूर्व दुर्ग आहे.एखादा डोंगर पोखरून एक बेलाग दुर्ग आपल्या मध्ययुगीन शिल्पज्ञानी निर्मिलेला आहे.यादवांची हि एकेकाळची राजधानी खलजी सुलतानांच्या ताब्यात गेली.पुढे १४ व्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्लीच्या मुहमद्द तुघलकाने तर दिल्लीची राजधानी हलवून ती देवगिरीला आणली.तोपर्यंत या देवदुर्गाचे नामकरण दौलताबाद करण्यात आले होते.पुढे निजामशाहीची राजधानी म्हणून देवगिरी प्रसिद्ध होताच. शिवप्रभूंच्या मातोश्री जिजाबाई यांच्या वडील आणि तीन भावांचे खूनही याच दुर्गात झाले.सभासदाच्या बखरीत शिवप्रभूंच्या मुखी 'पृथ्वीवर दौलताबाद चखोट खरा ..!' असे शब्द आहेत.देवगिरीचे सारेच न्यारे आहे.दुर्गाचा खंदक हा डोंगराचा उतरता भाग पोखरून काढून केला आहे.तशीच ती अंधारी ! राष्ट्रकुट सत्ताधीशांनी दुर्गावर जाण्यासाठी कातळ पोखरून गोलाकार अंधारी वाट केली आहे. त्या वाटेशिवाय दुर्गावर जाताच येत नाही. त्या गडद अंधाराच्या वाटेने जात असताना चुकून प्रकाश दिसतो; पण त्या प्रकाशाची वाट आपल्याला खंदकात भिरकावून देते.पूर्वी त्या अजस्त्र खंदकात मगरी सोडलेल्या असत.१७५६-५७ मध्ये या दुर्गाचा ताबा मराठ्यांकडे आला होता.देवगिरी हा मिश्रदुर्ग आहे.म्हणजे दुर्ग जमिनीवरही आहे आणि डोंगरावरही आहे. नुसताच गिरिदुर्ग किंवा फक्त स्थलदुर्ग नव्हे. दुर्गाच्या दोन बाजूला तिहेरी तटबंदी आहे. अंबरकोट,महाकोट आणि कालाकोट अशी त्यांची नावे आहेत. अंबरकोट हे नाव कदाचित निजामशाहीचा वजीर मलिक सर्कमलिक अंबर याच्या नावावरून पडले असावे. तटबंदीत चीनलेले देवालयांचे दगड जागोजाग दिसतात.खंदक,बुरुज,तट,झरोके यांची रेलचेल आहे.मात्र,देवगिरीचे सर्वात अदभुत म्हणजे खंदक आणि अंधारी.काळ्या फत्तराचा६०-७० मीटर उंचीचा दगड कोरून काढला आहे.खांदकाची रुंदीही चांगली १५-२० मीटर आहे.खंदकावरचा कडा छीन्नी लावून गुळगुळीत केला आहे. सुरुंग लावला असेल का,हा प्रश्न आहेच;पण अंधारीत तर फक्त छीन्नीच्याच खुणा दिसतात..अंधारीच्या वाटेचे प्रवेशद्वार एखाद्या लेणीच्या द्वारासारखेच आहे.त्यावरील कलाकुसर राष्ट्रकुटाच्या लेणीशी साधर्म्य दर्शवते.आत गडद अंधार आहे.मशाली,पलिते घेतल्याखेरीज आतले काहीच दिसत नाही.कसे केले असेल हे काम ? मार्ग वळणाचा आहे. ठोकळमनाने त्याचे तीन भाग पडतात.पहिले भुयार २५ मीटर लांब आणि १० मीटर रुंद आहे.दुसरे १० मीटर लांब आणि तेवढेच रुंद आहे.तिसर्या भागाला मोठी अंधारी म्हणतात.त्यातून ३० मीटरचा कडेलोटहि आहे.मोठ्या अंधारीत जागोजाग १०० खोदीव पायरया आहेत.त्यापुढे लोखंडी तवा पेटवण्याची जागा आहे.हे सारे अपूर्व आहे.देवगिरी डोंगरातून सुमारे ८० लाख टन दगड काढून टाकून दुर्ग बळीवंत करण्यात आला आहे..


















! " भगव्यासाठी वाटेल ते ते ते....!!!!!

सांग जगाला ओरडुन
मी मावळा आहे शिवबाचा…
माय मराठीचा लेक मी
आशीर्वाद मां जिजाऊचा
अभिमान मला भगव्याचा
गर्व आहे मराठा जातीचा
सांग जगाला ओरडुन …..
भीती न कुणा शैतानाची
शिवबा पाठीशी आहे उभा
पाठीवरी वार काय करता
जीवा समोरी आहे उभा
सांग जगाला ओरडुन…….
उठतील जे हात शिवरायांकडे
वरच्या वर उडवून देऊ
प्राण गेला तरी चालेल
पुन्हा जन्म राजेसाठी घेऊ
सांग जगाला ओरडुन…….

! " मनाला भूरळ करणारे कैलास मंदिर " !

संभाजीनगर









येथील वेरुळयेथे असलेले कैलास मंदिर तीन मजली लेणे म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर सुमारे आठ मीटर उंचच्या जोत्यावर उभे आहे. कैलास दिराच्या चोहुकडे शिल्पे कोरलेली आढळतात. गोपूरच्या दोन्ही भिंतींतर पौराणिक दृष्ये आढळतात. इ.स. 758 च्या सुमारास येथील मंदिराचे बांधकाम सुरु झाले होते.येथील लेणे हे मुख्यत्वेकरुन शिवाचे आहे. या मंदिराचे तीन भाग आहेत. गोपुरम, नंदिमंडप आणि मुख्य देवालय. या मंदिराचे बांधकाम हे निपूण वास्तुतज्ञांवर सोपविले होते. हे मंदिर राष्ट्रकुट राजाच्या काळात बांधले गेले.मंदिराच्या पाठीमागे एका प्रसंगाचे वर्णन केलेले आहे. भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी रावणाने खुप जप केले. पण ते काही प्रसन्न होत नव्हते. तेव्हा रावणाने विचार केला की पुर्ण कैलासच लंकेत उश्पलुन न्यावा. त्यासाठी त्याने आपल्या सर्व हातांनी जोर लावून कैलास उचलण्यासाठी प्रयत्न केले. सर्व कैलास हलु लागले. ते स्थिर करण्यासाठी भगवान शिवांनी फक्त आपल्या पायाच्या अंगठयाने दाब दिला. यावरुन या ठिकाणाला कैलास मंदिर हे नाव पडले असे सांगण्यात येते.