! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Friday, 26 June 2015

! " छञपती शाहू महाराजांना जयंती दिनी ञिवार वंदन " !

राजर्षी शाहू महाराजराज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देणारे आदर्श शासनकर्ते आणि बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्र्वास निर्माण करणारे द्रष्टे समाजसुधारक !राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले. १८९४ मध्ये महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंतची २८ वर्षांची त्यांची कोल्हापूर संस्थानातील कारकीर्द महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते.राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापुरात मराठा, लिंगायत, पांचाल, जैन, मुसलमान, शिंपी, देवज्ञ, वैश्य, ढोर-चांभार, नाभिक अशा विविध जातींसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू केली. अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी ‘मिस क्लार्क बोर्डिंग’ हे वसतिगृह उभारले.बहुजन समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन त्यांना शिक्षण घेण्यास महाराजांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.त्यांनी अस्पृश्यांना (त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या) राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकर्‍या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. ‘दलितांच्या सेवेसाठी मला छत्रपतींचे सिंहासन सोडावे लागले तरी पर्वा नाही’ अशी घोषणा त्यांनी केली होती. जातिभेदाला महाराजांचा तीव्र विरोध होता. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. त्यांनी बहुजन समाजाची पिळवणूक करणारी कुलकर्णी वतने रद्द केली, तसेच महार कुटुंबांना गुलाम करणारी महार वतनेही रद्द केली.१९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी १९१६ मध्ये निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली. ब्रह्मणेतर चळवळीच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी महाराजांनी महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागांत दौरे काढून सभा घेतल्या. राजर्षी शाहूंना ब्रह्मणेतर चळवळीचे उद्गातेच म्हटले जाते. बहुजन समाजाला व (तत्कालीन) शूद्रातिशूद्रांना राजकीय सत्तेतही सन्मानपूर्वक सहभाग मिळावा यासाठी त्यांनी सक्रिय प्रयत्न केले. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी आपल्या कार्यातून सत्यशोधक विचार पुढे नेलाच, शिवाय सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले, पाठिंबाही दिला. ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्‍यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला व लोककला या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले. यातून कलाकारांना राजाश्रय मिळालाच पण मुख्य म्हणजे या कलांचा विकास व विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात (व भारतातही) झाला. काही लेखक, संशोधक यांनाही त्यांनी प्रोत्साहनपर सहकार्य केले. त्यांनी खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. युवकांमध्ये व्यायामाची आवड उत्पन्न होण्यासाठी त्यांनी आखाडे, तालमी यांना आर्थिक सहकार्य केले, तसेच कुस्तीला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. कोल्हापूरला ‘मल्ल विद्येची पंढरी’ म्हटले जाते ते यामुळेच.राजर्षी शाहू महाराजांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक व कृषी-सिंचन या सर्वच क्षेत्रांतील कार्याचा दूरगामी परिणाम केवळ कोल्हापूर परिसरावरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर झालेला स्पष्टपणे जाणवतो. कोल्हापूर संस्थानाचे राजे असूनही त्यांनी लोकशाही पद्धतीने राज्यकारभार केला. डॉ. आंबेडकरांनी ‘सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ’ अशा समर्पक शब्दांत राजर्षी शाहूंचे वर्णन केले आहे. शाहू महाराजांच्या सर्वव्यापक कार्यामुळेच कानपूरच्या कूर्मी क्षत्रिय समाजाने त्यांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल केली.अशा या द्रष्ट्या, पुरोगामी नेत्याचे ६ मे, १९२२ रोजी मुंबई येथे निधन झाले. 

Thursday, 25 June 2015

! " मी निसर्ग वेडा " !



वेड्याहुनी वेडा मी
वेड्याहुनी वेडा मी
एक निसर्ग वेडा मी
सह्याद्रीतल्या दर्या- खोर्यातुनी
भटकणारा एक भटक्या मी

वेड्याहुनी वेडा मी
एक दुर्ग वेडा मी
सह्याद्रीतल्या दर्या- खोर्यातुनी
भटकणारा एक भटक्या मी

वेड्याहुनी वेडा मी
एक पुस्तक वेडा मी
कथा , कादंबर्या , चरित्रांचा
ललित लेखनाचा ,
आवडत्या लेखकांचा
एक वेडा वाचक मी

वेड्याहुनी वेडा मी
एक काव्य वेडा मी
कवितेतुनी भावनांना
शब्दात उतरविणारा एक
निर्मल कागद मी

वेड्याहुनी वेडा मी .....
एक निसर्ग वेडा मी

Monday, 22 June 2015

!!! " निसर्ग " !!!

वसंतातल्या भल्या पहाटे
साखरझोपेतून मजला
फुलपाखरांनी जागवावे
सुखद थंडसे पहाटवारे
सर्वांगाला स्पर्शुन जावे...

फुलांच्या धुंद मंद गंधाने
गायचे मी विसरलो असे
कोकिळाने गार्‍हाणे गावे
लटक्या रागात मग त्याने
डहाळीवर झुलत रहावे..

शेवाळल्या क्षीण प्रवाहाने
चाहुल माझी लागता मग
थबकून मजकडे पहावे
वरुन पान एक टपकता
चटकन पुढे निघुन जावे...

गार हिरव्या वृक्षांनी अन
ऊंच काळ्या कड्यांनी काही
हितगुज मेघांशी करावे
अवचित कंठातून माझ्या
गीत एक लकेरून जावे...


!!!! " बीजे एक वादळ " !!!!!

Sunday, 21 June 2015

! " शिंपले " !

अथांग  असा सागर आणि
त्या सागरातले लहानसे शिंपले

रेतीचा एक कण
हळूच त्यात शिरावा व
शिंपल्याने अलगद तो
आपल्या कवेत घ्यावा

शिंपल्याच्या प्रेमात आणि सहवासात
त्या कणाचा मोतीच बनून जातो

मोत्याचा प्रवास थेट शिंपल्यातून
राजकन्येच्या गळ्यात होतो
आणि ते शिंपले मग
पायदळी तुडवल्या जाते

शिंपले नाहीसे होण्याचे दुखः
मोत्यांवर उमटलेले नसते , कारण

त्यांना काय माहित
शिंपल्यांनी आपल्याला
केवढे जपले असते.


!!!! " बीजे एक वादळ " !!!

!! " पहिला पाऊस ....!!!!



पहिला पाऊस, पहिली आठवण,
पहिल्या पावसातले ते अविस्मरणिय क्षण ...
आजही घालतात साद मला, या पहिल्या पावसाच्या सरी ...
तुझ्या आठवणित गुंफतात मला, या पहिल्या पावसाच्या सरी ...

नकळत हात तुझा हातात येता,
उमललेली ह्दयाची कळी ...
वाढलेले ह्दयाचे ठोके,
तुने करिता चावट खोडी ..

पावसात चिंब भिजताना,
तुला पाहन्याचा तो आनंद ...
ढगांच्या गर्जनाने तुझा,
माझ्या मीठीत येण्याचा तो प्रसंग ...

तो थेंब पावसाचा, तुझ्या गालावरती थांबलेला ..
घेताना मीठीत तुला, माझ्या ओठांनी मी टीपलेला ..
सोबतिला असलेला मातिचा ही गंध,
अजूनही आहे श्वासात माझ्या, तुझ्या गजर्‍याचा सुगंध ..

कितीतरी अशा आठवणि, आनी बरेच असे क्षण,
पडत असतो पाऊस बाहेर, आनी आतमध्ये रडते माझे मन ..

असा हा पाऊस वेडा, नेहमिच तुझी आठवण घेऊन येतो,
होताना एकरूप मातीशी, माझ्या पापण्यांना ओल करून जातो ..

पहिला पाऊस, पहिली आठवण,
पहिल्या पावसातले ते अविस्मरणिय क्षण .....................

Tuesday, 16 June 2015

! " जिजाऊच्या स्मृतीदिनी मानाचा मूजरा " !

जिजामाता (जन्म – १२ जानेवारी १५९८, : मृत्यू – १७ जून १६७४) ह्या मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाऊंचे वडील होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाईचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले. हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला . या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता
जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. जिजाबाईंना पहिले आपत्य झाले नाव काय ठेवायचे हा प्रश्न होता ६ महिन्यानंतर दीराचे नावा प्रमाणे संभाजी ठेवले. यानंतर त्यांना ४ मुले झाली चार ही दगावली,७ वर्षाचा काळ निघुन गेला. १९ फेब्रुवारी फाल्गुन वैद्य तृतीया सुर्यास्ताच्या वेळी शिवनेरीत जिजाऊंना मुलगा झाला. छत्रपती शिवाजीराजे भोसलेयांचा जन्म झाला. शिवनेरीत पाळणा बांधला नाव ठेवले “शिवाजी”. स्वतः च्या कर्तुत्वाने अगर थोर पती मिळाल्याने ज्यांचे आयुष्य कीर्तिमंत ठरले अशा नामवंत स्त्रीया पुष्कळ आहेत. पण मुलगा अत्यंत थोर व कर्तबगार निपजल्यामुळे जिच्या मातृत्वाची कीर्ती चहूकडे वर्षानुवर्ष गाजत राहिली अशी भाग्यवती एक राजमाता जिजाबाईच श्री. छत्रपतींची माता.
शिवाजी या लहानच, पण या क्षणापासून दोन उत्तम गुरु त्याला लाभले. एक दादाजी व दुसरा परमश्रेष्ठ गुरु प्रत्यक्ष माता जिजाबाई! माता जिजाबाईचं कर्तृव्य फार थोड म्हटलं पाहिजे शिवाजीच्या बालमनावर त्यांचे संस्कार घडी – घटकेला होत होते. हिऱ्याला पैलू पाडण्यासारखं हे जिजाऊंनी कठीण काम केलं महाभारत व रामायणातल्या आदर्श पुरुषांच्या शौर्याच्या व न्यायाच्या कथा ती मुलाला रोज सांगे, तर दुसऱ्या तऱ्येचे राजकारणाचे धडे, जहागीरीची व्यवस्था व शालेय शिक्षण यांची माहिती दादाजी कोंडदेव देत होते. शिवाजीराजे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली.कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगितल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता.
प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे, ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत आपण- समाज, तू आणि मी ही – पारतंत्र्यात आहोत, ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच.राजांना घडवताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईनं लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.
शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली. राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज सोयरिक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते. यवनांचा उच्छेद करून आपण्याच मराठ्यांचे राज्य स्थापन करण्याचे विचार शिवरायांचा मनात घोळू लागले. माता जिजाऊच्या व माता जगदंबेच्या शुभशीर्वादाने शिवाजीने तोरणा गड घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे शिवबाने आजूबाजूचे किल्ले जिंकून घ्यायला सुरुवात केली. १६४६ सालापासून शिवाजीने चाकण,पुरंदर,रोहीडा, राजमाची अशी अनेक किल्ले घेतले आणि १९७४ साली शिवाजी छत्रपती झाले !
जिजाबाईंच्या आयुष्यातली एकच एक इच्छा ‘आपलं मराठयाचं स्वत्रंत्र राज्य व्हावं’ ही तिच्या अलौकिक पुत्रांनी पूर्ण केली. जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय. मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. शहाजीराजेंच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या. या संस्कारांच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या. राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहावत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली. शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे


! " मी मावळा शिवाजी महाराजांचा " !

शब्दांचे जाळे आम्ही विनत नाही
भावनांशी खेळ आम्ही खेळत नाही
पैशासाठी ईमान आम्ही विकत नाही
स्वार्थासाठी खोट आम्ही बोलत
नाही
दुसर्यास होईल त्रास असे कधी वागत
नाही



माणुसकी नाती अन माती हाच
आमचा श्वास
आहे जोवर या भुवरी करणार तोवर
शिवभक्ती
हाच आमचा ध्यास
कारण आम्ही जाणतो
पति
करोडपती होणे सोपे आहे पण
छत्रपती नाही छत्रपती ऐकदाच झाले
ते म्हणजे
राजे शिवछत्रपती
जय जिजाऊ...
जय शिवराय...
जय शंभूराजे...

Monday, 15 June 2015

! " महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर " !









करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मीमहालक्ष्मी मंदिर पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. ते कोल्हापुरात (करवीर) आहे. मंदिराच्या मांडणीवरुन ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे.कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरेल. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे.या देवस्थानाची महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत गणना होते.मुसलमानांनी देवळाचा विध्वंस केला तेव्हा मूर्ती अनेक वर्षे पुजाऱ्याने लपवून ठेवली होती. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.महालक्ष्मी ही विष्णूची भार्या व म्हणून समोर गरुडमंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे. तर मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे.देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे.

Sunday, 14 June 2015

! " न्यु शाहू पॅलेस कोल्हापूर " !

पंचगंगेच्या तीरावर वसलेले कोल्हापूर हे प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने प्रसिध्द आहे. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर आणि दख्खनचा राजा जोतिबाचे मंदिर यामुळे हे एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते.राजश्री शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणांमुळे कोल्हापूरने नवा आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कोल्हापूरला पन्हाळा गड, रंकाळा तलाव, राधानगरी धरण,खासबाग मैदान, शालिनी पॅलेस या ठिकाणांनी वैभवसंपन्न बनविले आहे. या सर्व ऐतिहासिक ठिकाणांसोबत कोल्हापूरच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे तो शाहू महाराजांच्या न्यू पॅलेसने!कोल्हापूर शहराच्या उत्त्तरेकडे साधारणत: तीन किलोमीटर अंतरावर नवा राजवाडा प्राचिन संस्थान काळाची शान दाखवत उभा आहे. करवीर संस्थानचे ४ थे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कालखंडामध्ये हा नवा राजवाडा उभारणीस १८७७ साली सुरवात झाली व न्यू पॅलेस इ.स. १८८४ मध्ये बांधून पूर्ण झाले. प्रसिध्द ब्रिटीश वास्तुशिल्पकार चार्ल्स मान्ड यांनी न्यू पॅलेसची रचना केली होती. युरोपीयन आणि भारतीय वास्तूशास्त्राचे मिश्रण असलेली ही वास्तू शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना आहे. राजवाडा परिसरात तलाव, तलावाकाठी राखीव जंगल व जंगलात हरिण, मोर यांसह इतर प्राणी आहेत. न्यू पॅलेसमध्ये आजही राजपरिवाराचे वास्तव्य आहे.३० जून १९७४ रोजी राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या जन्म शताब्दी दिनी राजवाडयातील तळमजला हा करवीर संस्थानचे शेवटचे छत्रपती मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांच्या नावाने शहाजी छत्रपती म्युझिअम म्हणून सूरू करण्यात आला. यामध्ये वेगवेगळी प्रेक्षणीय दालने आहेत. या प्रत्येक दालनामध्ये प्राचिन काळातील महाराजांच्या कालखंडात वापरलेल्या सर्व वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. म्युझिअमच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर प्रथमत: दृष्टीस पडते ते म्हणजे छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचे घोडयावर आरूढ असलेले भव्य रंगचित्र, यानंतर आपण म्युझिअममधील वेगवेगळया दालनात प्रवेश करतो. या म्युझिअममध्ये हत्तीचे दालन, फर्निचरचे दालन,राजश्री छत्रपती शाहू दालन,शस्त्रास्त्र दालन, दरबार हॉल, प्राणी संग्रहालय अशी विविध दालने आहेत.हत्तीच्या दालनामध्ये आपणस प्रथम दर्शनी दिसतो तो विविध आभूषणाने सजलेला बैठक स्वरूपातील हत्ती. हत्तीला सजविण्यासाठी असणाऱ्या विविध आभूषणामध्ये हत्तीवरील भरजरी झूल (घाशा), जरी पटका तसेच चांदीची लहान तोफ, प्राचीन काळातील दुमिर्ळ नाणी आपणास या दालनामध्ये पहावयास मिळतात. त्यानंतर येते ते फर्निचर दालन, या दालनात आपणास शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये वापरत असलेले विविध साहित्य पाहता येते.विशेष म्हणजे छत्रपती घराण्याचा वंशपरंपरागत आकर्षक पाळणा, छत्रपती घराण्यातील सर्व महाराजाचे फोटो या दालनात आपणास पाहावयास मिळतात.यानंतर आपण प्रवेश करतो राजश्री शाहू हॉल मध्ये छत्रपती शाहू महाराजांची संक्षिप्त ओळख करून देणारे हे दालन खऱ्या अर्थाने आपणास छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटना व जीवनपट छायाचित्राच्या स्वरूपात याठिकाणी पहावयास मिळतात. महाराजांच्या बालपणीची छायाचित्रे, छत्रपती शाहू महाराज यांचे अधिकार ग्रहण केलेल्या प्रसंगाचे छायाचित्र, ऑफिसमधील तसेच दिल्ली दरबारात वापरत असलेली खुर्ची , पुर्वीच्या काळातील पितळी खलबत्ता, गिडी जग, तोटी असलेला पितळी तांब्या ठेवण्यात आलेला आहे. शाहू महाराज (पहिले) यांच्या वापरातील कपडे, महाराणी व्हिक्टोरिया यांनी छत्रपती शिवाजी (४ थे) यांना दिलेला करवीर 'राजचिन्हाचा ध्वज' ठेवण्यात आलेला आहे.शाहू कुस्ती मैदान येथे भरवण्यात आलेले कुस्ती मैदान पाहण्यासाठी झालेल्या गर्दीचे छायाचित्र तसेच शिकारीचे विविध प्रकार पहावयास मिळतात. जसजसे आपण पुढे पाहत जातो तसे इतिहासातील अनेक गोष्टींना उजाळा मिळतो. याच दालनामध्ये इतिहास प्रसिध्द घराण्याच्या वंशावळींची ओळख करुन देणारा माहिती फलक पहावयास मिळतो. त्यामध्ये करवीर छत्रपती घराण्याचा वंशवृक्ष, पवार छत्रपती घराण्याची वंशावळ, भोसले घराणे शाखेची वंशावळ, कागलकर घाटगे सर्जेराव घराण्यांची वंशावळ अधोरेखीत करण्यात आली आहे.या दालनातील आणखी एक वैशिष्टये म्हणजे शिकारलेल्या निरनिराळ्या प्राण्यांच्या अवशेषापासून बनविलेल्या नाविन्यपूर्ण व विविध उपयोगी वस्तू पाहताना आपण भारावून जातो. सांबराचे शिंग व गेंड्याच्या पायापासून तयार केलेले टी पॉय,गव्याच्या पायापासून तयार करण्यात आलेले पेटी स्टँड, वाघाच्या शेपटीतील मणक्यापासून बनविलेली छडी, वाघाच्या व गव्याच्या पायापासून बनविलेला ऍ़श ट्रे, डुकराच्या दातापासून तयार केलेली फुलदाणी, शहामृगाच्या पायापासून बनविलेले मेणबत्तीचे स्टँड, वाघाच्या कवटीपासून तयार केलेली सिगारेट केस व ऍ़श ट्रे हे सर्व पाहताना डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहत नाही. शस्त्रास्त्र दालनामध्ये विविध प्रकारच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे या ठिकाणी पहावयास मिळतात. छत्रपती शाहू महाराजांनी साठमारी करण्यासाठी तयार करुन घेतलेली विविध प्रकारची हत्त्यारे, इ. स. १८७० मध्ये श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज (पहिले) इंग्लंडला गेले असता त्यांनी खास ऑर्डर देऊन मागितलेली सोन्याचा मुलामा चढवलेली बंदुक, विविध नमुन्यातील बंदुका तसेच दहा फुटी आकर्षक पुनी गन या ठिकाणी सर्वाचे लक्ष वेधून घेते. जुन्या काळातील ढंका, नौबत, नगारे, चौघडे तसेच डुकराची शिकार करणेसाठी वापरण्यात येणाऱ्या भाल्याची ओळख या शस्त्रास्त्र दालनात होते. यानंतर आपण प्रवेश करतो ते न्यू पॅलेसचा मुख्य भाग असलेला दरबार हॉल. अतिशय प्रशस्त व कलात्मकतेचा एक उत्कृष्ट नमुना आपणास पहावयास मिळतो. दरबार हॉलचे हे भव्य विलोभणीय दृश्य पाहताना पूर्वीच्या काळातील राजे महाराजांचे वैभव आवाक् करुन टाकते. दरबार हॉलमध्ये महाराजांसाठी असलेले कलाकुसरीने भरगच्च सजलेले 'राजसिंहासन' सर्वांचे लक्ष वेधून घेते. तसेच या हॉलमध्ये पुूर्वी जसा दरबार भरायचा तशीच मांडणी अजून ठेवलेली आहे. हॉलमधील छताकडे नजर टाकली असता त्याकाळी कलाकारांनी केलेले नक्षीदार कोरीव काम पाहीले की डोळयाचे पारणे फिटते. हॉलच्या दोन्ही बाजूस खिडकीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील उत्कट प्रसंग इटालियन चित्रकाराने बेल्जीअम ग्लासवर अतिशय दुर्मिळ आकर्षक रंगचित्राव्दारे चित्तारलेली आहेत. आपण पुढे जातो ते भारतासह विविध देशातील हिंस्त्र प्राणी, पशू आणि पक्षी यांची शिकार केलेले प्राणी आपणास पाहावयास मिळतात.महाराजा शहाजी छत्रपती (दुसरे) यांनी मारलेला आफ्रिकन गेंडा पाहावयास मिळतो, हिमालयातील खोकड, बर्फाळ प्रदेशातील अस्वल, हिमालयातील काळे अस्वल लहान मुलांचे लक्ष वेधून घेतात. वेगाने धावणारे चित्त्तळ ( रायबाग), पाहताना त्याच्या नजरेतील धार लक्षात येते हॉलच्या मध्यभागी सर्वाचे लक्ष वेधून घेतो तो वाघांचा कळप, सांबर, चौसिंगा, दुर्मिळ असे कस्तुरी मांजर व खवल्या मांजर, तसेच बुलबुल, बदक,लाव्हऱ्या, कोकीळ, मलबारी खार, हरिचल, ब्लड फेजंन्ट असे विविध प्रकारचे पशू , पक्षी व प्राणी पाहून त्याकाळी महाराजांनी केलेल्या शिकारी डोळयासमोर येऊन उभे राहतात.आपण म्युझिअमच्या बाहेर येतो बाहेरील सर्व भाग निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. म्युझिअमच्या समोर हिरवेगार लॉन आहे. विविध प्रकारच्या वृक्षांमुळे सर्व परिसर निर्सगरम्य वाटतो. बाहेरील आवारामध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज तसेच इतर महाराजाचे पुतळे पहावयास मिळतात. पुढील बाजूस प्राणी संग्रहालय व विस्तृत असे जलाशय आहे.या जलाशयामध्ये विविध प्रकारचे प्राणी तसेच दुर्मिळ पक्षी आपणास पहावयास मिळतात. या प्राणी संग्रहालयातील खास वैशिष्टय म्हणजे मध्य भारत येथून प्रत्येक वर्षी साधारणत: जानेवारी महिन्यामध्ये या जलाशयामध्ये स्थलांतरीत होणारा पक्षी म्हणजे चित्रबलाक. हा दुर्मिळ पक्षी इतर कोणत्याही ठिकाणी आपणास पाहावयास मिळत नाही. तसेच जलाशयाच्या मध्यभागी असणाऱ्या झाडावर काळया रंगाचे दुमिर्ळ असा कांडेसर पक्षी झाडाच्या फांदीवर बसलेला आपणास पहावयास मिळतो. जलाशयाच्या कडेला आपण अगदी बारकाईने पाहिले असता आपणास हॉर्न बील डक्स व कासव ही आपल्या मनाला भुरळ घालतात.




! " वीर बाजीप्रभु देशपांडे स्मारक किल्ले पन्हं ळा " !



              पुणे जिल्ह्यातील भोरतालुक्यातील हिरडस येथील मावळातील सरदारम्हणजे बाजीप्रभू देशपांडे! हे मावळातील पिढीजातदेशकुलकर्णी. शिवरायांविरुद्ध लढणार्या बांदलांचेबाजी दिवाण होते. बाजीप्रभू देशपांडे हेपराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी,स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही अमिषाला बळी नपडणारे असे होते. वयाच्या पन्नाशीतही दिवसातील२०-२२ तास काम करूनही न थकणार्या बाजींचा पूर्णमावळ पट्टयात मोठा दबदबा होता. त्यांचेप्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहूनछत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलूव्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले.बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठाशिवरायांच्या चरणी वाहिली.महाराजांपेक्षा वयानेमोठ्या असणार्या बाजीप्रभूंच्या मनातमहाराजांविषयी आत्यंतिक प्रेमाबरोबरच भक्तिभावहोता आणि वडीलकीच्या नात्यानेकाळजीचीही भावना होती. पन्हाळगडाला शत्रूनेवेढा घातलेला असताना छत्रपतींची त्यातूनसुटका करणे; महाराजांना विशाळगडापर्यंतपोहोचवण्याची व्यवस्था करणेया भूमिका निभावतांना बाजीप्रभूंनी आपले केवळशौर्यच नव्हे, तर प्राण पणाला लावले.ही घटना स्फुरण चढवणारी,स्वराज्याविषयीचा अभिमान (आजही)आपल्या रोमरोमात भिनवणारी आहे.बाजीप्रभूंनी ‘लाखांचा पोशिंदा’ सुरक्षितराहण्यासाठी आपला देह अर्पण केला.त्यांचा अतुलनीय असा पराक्रम महाराष्ट्रातीलपुढच्या असंख्य पिढ्या नक्कीच स्मरणात ठेवतील.सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातूनसुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडेनिघाले होते. त्यावेळी आपली फसवणूक झाली हेलक्षात येऊन विजापूरी सैन्य त्यांचा पाठलाग करतहोते. पुढचा धोका लक्षात घेऊनचवडीलकीच्या अधिकारानेबाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्याससांगितले. बाजी आणि फुलाजी हे दोघे बंधूगजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत)सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले.सहस्रोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखलेहोते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीतअसतांनाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्याहिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली.पराक्रमाची शर्थ म्हणजे काय ते घोडखिंडीतील(पावनखिंडीतील) लढाईकडे पाहून समजते.सिद्धी मसूदचे सैन्य अडवतांना कामी आलेलेमराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी,जखमी झालेले स्वत:चे शरीर या कशाचेही भानबाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूपपोहोचलेयाचा इशारा देणार्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचेकान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हाताततलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते.खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतारप्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावरकर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले.(ही घटना दिनांक २३ जुलै, १६६०या दिवशी घडल्याची इतिहासात नोंद आहे.)मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमानेआणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्ररक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नावपावनखिंड झाले. बाजी-फुलाजी बंधूंवर विशाळगडावर,महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.बाजीप्रभू आणि फुलाजी यांची समाधी विशाळगडावरआहे. तसेच पन्हाळगडावरबाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.स्वराज्यनिर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजसुखरूप, सुरक्षित राहायला हवेत यासाठी स्वत:मृत्यूला सामोरेजायची तयारी असलेल्या बाजी आणि फुलाजीदेशपांडेंसारख्या सरदारांमुळेस्वराज्याचा पाया रचला जात होता. परंतुही हिर्यांसारखी अमूल्य माणसे सोडूनगेलेली पाहतांना महाराजांना काय वाटत असेल हेसांगणे कठीणच.


Saturday, 13 June 2015

! " किल्ले पन्हाळा " !








पन्हाळातीन दरवाजा येथील आतील द्वार, इ.स.१८९४,पन्हाळानावपन्हाळाउंची४०४० फूटप्रकारगिरीदुर्गचढाईची श्रेणीसोपीठिकाणकोल्हापूर, महाराष्ट्रजवळचे गावकोल्हापूरडोंगररांगकोल्हापूरसध्याची अवस्थाव्यवस्थितस्थापना{{{स्थापना}}}पन्हाळगडपन्हाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तसेच पन्हाळा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य गाव आहे.पन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महत्त्वाचा किल्ला आहे. पन्हाळ्याला पर्णालदुर्ग देखील म्हणतात. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २ जानेवारी, इ.स. १९५४रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आ

!!! " रायगढावरिल शिवराज्यअभिषेक दिनाच्या काही अप्रतिम छबी " !!!











Friday, 12 June 2015

! " भारतातील दहा मोठे व आकष॔क धबधबे " !

1} दुधसागर धबधबा : गोव्यात असलेल्या दूधसागर धबधबा हा भारतातील एक शानदार धबधबा आहे. मांडवी नदीच्या उगमस्थळावर असलेला हा धबधबा सुरु होतो. या धबधब्याची उंची 1017 फूट असून जगातील उंच धबधब्यांमध्ये दूधसागरचा क्रमांक 227 वा आहे. या धबधब्याला सी ऑफ मिल्क म्हणजेच 'दुधाचा समुद्र'ही म्हटलं जातं. हा धबधबा जंगलाने वेढलेला आहे.
 जोग धबधबा : कर्नाटकातील प्रसिद्ध जोग धबधबा शिमोगा जिल्ह्यात आहे, जो शारवथी नदीपासून तयार होता. या धबधब्याची उंची 830 फूट असून तो भारतातील दुसरा सर्वात उंच धबधबा आहे. या धबधब्याला यूनेस्कोने सर्वात सुंदर पर्यटनस्थळांपैकी एक असल्याचं घोषित केलं आहे.

2] जोग धबधबा : कर्नाटकातील प्रसिद्ध जोग धबधबा शिमोगा जिल्ह्यात आहे, जो शारवथी नदीपासून तयार होता. या धबधब्याची उंची 830 फूट असून तो भारतातील दुसरा सर्वात उंच धबधबा आहे. या धबधब्याला यूनेस्कोने सर्वात सुंदर पर्यटनस्थळांपैकी एक असल्याचं घोषित केलं आहे.


.3] नोतहसंगिथिआंग धबधबा : नोहसंगिथिआंग धबधबा हा मेघालय फॉल सेव्हन सिस्टर्स वॉटरफॉल नावानेही ओळखला जातो. मेघालयच्या इस्ट खासी हिल्स जिल्ह्याच्या मौजमई गावात असलेल्या या धबधबल्या मौजमई धबधबाही म्हटलं जातं. या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यातच धबधब्यातून पाणी पडतं. या धबधब्याची उंची 1013 फूट आहे.


4] ठोसेघर धबधबा: हा धबधबा महाराष्ट्रात आहे. सातारा जिल्ह्यातील या धबधब्याची उंची 1150 फूट आहे. हा धबधबा पश्चिम घाटातील आकर्षणाचं केंद्र आहे.


5]  अथिराप्पिल्ली धबधबा : केरळमधील अथिराप्पिल्ली धबधबा अतिशय सुंदर आहे. इथे 80 फुटांवरुन पाणी खाली पडतं. हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंदबिंदू


6} तालकोना धबधबा: आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिह्यातील श्रीवेंकटेश्वर नॅशनल पार्कमध्ये हा धबधबा आहे. हा धबधबा तिरुमाला पर्वतरांगांच्या सुरुवातीलाच आहे. याची उंची 270 फूट आहे. तालकोना धबधबा पाणी चंदनाचं लाकूड आणि वनौषधीने वेढलेला आहे.


 7] खंडधार धबधबा: उडीसा राज्यातील सर्वात मोठा धबधबा सुंदरगड जिल्ह्यातील जंगलामध्येच आहे. घोड्याच्या शेपटीच्या आकाराचा हा धबधबा 801 फूट उंचीचा आहे.


8]  चित्रकूट धबधबा: छत्तीसगडमध्ये असलेला चित्रकूट धबधबा अतिशय सुंदर आणि मोठा आहे. छत्तीसगडच्या इंद्रावतीमध्ये जगदलपूरजवळ हा धबधबा आहे. या मनमोहक धबधब्याची उंची 29 मीटर आहे. तर याची रुंदी हवामानानुसार बदलते.


9] धौंधर धबधबा: मध्य प्रदेश जबलपूर जिल्ह्यात हा धबधबा आहे. नर्मदा नदीपासून हा धबधबा बनला आहे. हा धबधबादेखील पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे.
   

10] कोर्तल्लम धबधबा: हा धबधबा तमिळनाडूच्या तिरुलेनवेली जिल्ह्यामध्ये कोर्तल्लम शहरात आहे.

!!! " बीजे एक वादळ " !!!