! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Wednesday, 31 August 2016

आई...।।।।

बायको सतत आईवर आरोप करत होती..........

आणि

नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहन्यास सांगत होता...

पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती

ती  जोरजोरात ओरडून सांगत होती

"मी अंगठी टेबलवरच ठेवली होती
आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं..
अंगठी असो वा नसो ती आईनेच उचललीये"

गोष्ट जेव्हा पतिच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली..
त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली..

तिन महिन्या पूर्वीच लग्न झालेलं होतं..

पत्नीला ती चापट सहन झाली नाही.ती घर सोडून चालली

आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला....

कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का??

तेव्हा पति ने उत्तर दिले

त्या उत्तराला ऐकून
दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले

पति ने पत्नी ला सांगितले..

"जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले

आई अजुबाजूच्या परिसरात झाड़ू मारुन थोड़े पैसे आनायची ज्यात एक वेळेचं
पोट भरायचं.

आई एका ताटात भाकर वाढायची

आणि

रिकाम्या डब्याला झाकुन् ठेवायचि
आणि म्हणायची

माझ्या भाकरी या डब्यात आहेत बाळा तू खा.

मी पण नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो

आई माझं पोट भरलय आता मला नाही खायचं.

आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालन पोषण केलं आणि मोठं केलं

आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकिचा झालो

पण हे कसं विसरु की आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं,

ती आई या स्तिथिला अशा अंगठी साठी भुकेलि असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही..

तू तर तिन महिन्यापासूनच माझ्या सोबत आहे.

मी तर आईच्या तपश्चर्यला 25 वर्षापासून बघितलय.😔

हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रु आले.

ति समजूच् शकत नव्हती की मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेड़तोय की
ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज....✍🏻

या मेसेज़ला शेयर करायला कोणतीच शपथ नाहिये.
आवडला तर नक्कीच शेयर करा..🤗

मी किल्क केलेला अमेझिंग फोटोग्राफ....।।।।।

Tuesday, 30 August 2016

आमची जात..।।

#वाघाची जात कधी थकणार नाही,
शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही,
शपथ आहे आम्हाला या
मातीची मरे पर्यंत
#जय_शिवराय म्हणायला कधी
विसरणार नाही .
🚩🚩#जय_जिजाऊ🚩🚩
🚩🚩#जय_शिवराय🚩🚩

Wadal

🚩🚩याला मनत्यात नाद 🚩🚩

!        !!        शिव सकाळ    
🚩🚩🚩याला मनत्यात नाद
!       !! जगदंब जगदंब जगदंब !!        !
!         !! क्षत्रिय कुलावतंस !!           
              !! सिंहासनाधिश्वर             महाराजाधिराज !! 
!! छत्रपती शिवाजी महाराज कि जय !!
          !! तमाम-शिवभक्तांना !!
              !! जय शिवराय !!
              !! जय जिजाऊ !!
!     !! जय शिवशंभु मावळ्यानो !!     !

Sunday, 21 August 2016

आला आषाढ-श्रावण...।।

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

काळ्या ढेकळांच्या गेला
गंध भरून कळ्यांत;
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत.

चाळीचाळीतून चिंब
ओंली चिरगुटें झाली;
ओल्या कौलारकौलारीं
मेघ हुंगतात लाली.

ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी;
आणि पोपटी रंगाची
रान दाखवितें नक्षी.

ओशाळला येथे यम,
वीज ओशाळली थोडी,
धावणाऱ्या क्षणालाही
आली ओलसर गोडी.

मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
येतां आषाढ-श्रावण
निवतात दिशा-पंथ.

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

वादळ

Saturday, 20 August 2016

औसा किल्ला...।।

लिक अंबरने बांधलेला भुईकोट किल्ला, हिंदू व बौद्ध लेणी ( खरोसा )

लातूर  औसा

 

औसा येथील मलिक अंबरने बांधलेला भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. याशिवाय येथील श्रीबीरनाथ महाराजांचे देऊळ, श्रीमल्लिनाथ महाराजांचा मठ व औरंगजेबाने बांधलेली मशीद प्रसिद्ध आहे. औसा तालुक्यातील खरोसा या गावातील हिंदू व बौद्ध लेणी प्रसिद्ध आहेत

Wednesday, 17 August 2016

रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा !!!

माझ्या आठवणीतला रक्षाबंधन..


माझ्या आठवणीतला रक्षाबंधन !!!!!

सकाळी लवकर उठून

अंघोळीला केलेली घाई

माझ्या आधीच उठलेली

नटून बसलेली माझी ताई...

दादा आवर ना लवकर

म्हणणारी आमची छोटी

माझीच पहिली राखी हं

हाच शब्द तिच्या ओठी ......

रांगोळीने सजल्या पाटावरती

जणू बसला होता तो बाहुला

पेढे मिठाई कुठे गरीबांच्यात

तो गोडवा साखरेवर भागवला ......

बांधली राखी मनगटावर

तोऱ्यात दिला एक रुपाया

तरी रुसून ताई म्हणाली

कायरे आईकडचाच हा रुपाया ....

मलाच समजेना झाले क्षणाला

काय कसे समजावे या वेडीला

तरी समजूत काढत बोललो

मोठा झाल्यावर साडी घेईन तुला .....

काहीच समजत न्हवते तेंव्हा

बंधनातला हा धागा कशाला

सगळेच बांधतात म्हणून बांधायचो

चमचमणाऱ्या पाकळ्या हाताला ...

.

रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा !!!

रक्षाबंधन....

नात हे प्रेमच तुझ आणि माझ 

हरवलेले ते गोड दिवस , त्यांच्या मधुर आठवणी 

आज सार सार आठवलाय 

हातातल्या राखी सोबतच .

भाव मनी दाटतोय ..

बंध हे प्रेमाचे नात आहे 

ताई  तुझ आणि माझ नात जन्मो जन्मीचे आहे 

रक्षाबंधन

नात आपलं नितळ प्रेमाचं 
बांधून ठेवलंय या राखीने, 
जीवनात यश मी साधु शकलो 
ताई तुझाच तर साथीने

गावाकडची माती.....!!!!

प्रत्येकाच्या मनात एक छोटंसं गाव असतं
ते किती सुंदर आहे हे ज्याचं त्यालाच ठाव असतं

तांबडी लाल माती नि हिरवी गार शेतं
कौलारू घरांची शाकारलेली छतं

कुठल्याश्या घरातून एक म्हातारी बोलावते
ओळखीचे कोणी नाही, हे पाहून तिची पापणी ओलावते

"कोणाची गं पोर तू? ये आत ये", म्हणते
वाकून भाकरी वाढताना जराशी कण्हते

तिच्या हातची चटणी- भाकरी लागते इतकी गोड
कारण त्यात असते माया नि आपुलकीची ओढ

भाकर खाताना माय पाठीवरून हात फिरवते
टचकन डोळ्यांत पाणी येतं नि आईची आठवण येते

बाहेर खाटल्यावर असतो एक म्हातारा
चीपटं- मापटं शरीर नि डोळ्यांपुढे अंधार सारा

जायची वेळ आल्यावर पाय निघता निघत नाही
आपण वळून पाहिलं नाही, तरी गाव पाहत राही 

गाव सोडलं तरी मन गावीच राहतं
त्याच्या डोळ्यांनी ते सारं गाव पाहतं

प्रत्येकालाच गावी राहिलेले दिवस परत यावेसे वाटतात
गावची नुसती आठवण झाली तरी डोळ्यांत अश्रू दाटतात

Tuesday, 16 August 2016

भंडारदरा

भंडारदरा

भंडारदरा हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातीलअहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे.येथेभंडारदरा धरण आहे. या गावाजवळ जलविद्युत केंद्र आहे. भौगोलिक अक्षांश- १९ ३१’ ४” उत्तर; रेखांश ७३ ४’ ५”पूर्व.

भंडारदरा (शेंडी) हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. ते निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात.

भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.

भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. भंडारदरा धरणाचे मूळ नाव नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते. हे प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधलेले धरण आहे. प्रवरा नदीचा उगम जवळच्या रतनगडावर झालेला आहे. हा प्रदेश महर्षी अगस्ती आणि महर्षी वाल्मिकी अशा ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेला असून जवळच अकोले येथे महर्षी अगस्ती यांचा आश्रम व आजोबाचा डोंगर येथे महर्षी वाल्मिकी ऋषींची समाधी आहे. प्रवरेच्या बाबतीत अशी आख्यायिका आहे की अगस्ती ऋषींच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देव पृथ्वीवर अवतरले व त्यांनी गंगेचीच एक धारा असलेली प्रवरा नदी इथे प्रवाहित केली. प्रवरा नदीचे पाणी हे अमृतासमान असून म्हणून नदीला "अमृतवाहिनी" असे म्हटले जाते.

मुख्य आकर्षण

भंडारदरा हे एक अतिशय वेगाने लोकप्रिय होत चाललेले पर्यटनस्थळ असुन दरवर्षी विविध ठिकाणांहुन येथे भेट देणारांची संख्या वाढत आहे. बॉलीवूडमधील अनेक दिग्दर्शकांचे हे एक आवडते स्थान असुन कित्येक प्रसिद्ध हिंदी/मराठी चित्रपटांचे चित्रीकरण याच परिसरात झालेले आहे. (कटी पतंग, हीना, राम तेरी गंगा मैली, राजू चाचा, आणि देऊळ हे त्यांपैकी काही चित्रपट होत.)

आज 350 साल झाले या गोष्टीला..। आग्य्राहून सुटका

आज 350 साल झाले या गोष्टीला..।

आग्य्राहून सुटका

इ.स. १६६६ साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत नऊ वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली.

शिवाजीराजे दिल्ली दरबारात
शिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्‍न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना व दर्ग्यांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटार्‍यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकर्‍यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली. तोपर्यंत शिवाजी निसटून २४ तास झाले होते.

आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि लगोलग स्वराज्याकडे न जाता मथुरे कडे गेले, तेथे संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसर्‍या विश्वासू माणसांबरोबर पाठविले. एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदार्‍या घ्याव्या लागल्या. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही.

यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.

! શિવરાય !

॥पराक्रमाचा अर्थ म्हणजे॥

"#શિવરાય"

॥पराक्रमाची शर्थ म्हणजे॥

"#શિવરાય"

॥पराक्रमाची परिभाषा म्हणजे॥

"#શિવરાય"

॥पराक्रमाची दिशा म्हणजे॥

"#શિવરાય"

॥पराक्रमाचा सन्मान म्हणजे॥

"#શિવરાય"

॥पराक्रमाचा अभिमान म्हणजे॥

"#શિવરાય"

॥पराक्रमाचा श्वास म्हणजे॥

"#શિવરાય"

॥पराक्रमी ईतिहास म्हणजेच॥

"#શિવરાય"

||॰||॰||#ખય_શિવરાય||॰||॰||

! कळसूबाई !

भंडारदरा परिसरातच कळसूबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वाधिक उंच शिखर असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे १६४६ मीटर आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे मंदीर आहे. नवरात्रात इथे दररोज हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येतात. शिखरावरुन दिसणारे परिसराचे दृश्य अतिशय मनमोहक असे आहे.

! जायकवाडी धरण !

जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण आहे मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे.

धरणाची माहितीसंपादन करा

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची  : ४१.३ मी. (सर्वोच्च)
लांबी  : ९९९७.६७ मी.

दरवाजेसंपादन करा

प्रकार : S - आकार
लांबी : ४७१ मी.
सर्वोच्च विसर्ग : २२६५६ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : २७, (१२.५० X ७.९० मी)

पाणीसाठासंपादन करा

ओलिताखालील क्षेत्र

क्षेत्रफळ  : ३५० वर्ग कि.मी.
क्षमता  : २९०९ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : २१७० दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : ३५००० हेक्टर
ओलिताखालील गावे  : १०५

Monday, 15 August 2016

! चिखलदरा धबधबा !

चिखलदरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे. चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.

आख्यायिका

चिखलदर्‍याचा मनोरंजक इतिहास आपल्याला अगदी महाभारत काळापर्यंत मागे घेऊन जातो. पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदर्‍यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झर्‍यात भीमाने आंघोळ केली ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते.

निसर्ग

चिखलदर्‍याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग ही व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. चिखलदर्‍याच्या घाटात किंवा चिखलदर्‍याहून सेमाडोहला जाणार्‍या रस्त्यावर वाघ दिसू शकतात. मोर, रानकोंबडा, अस्वले तर बर्‍याच मोठ्या प्रमाणात आहेत; मात्रसह्याद्रीतल्या सदाहरित जंगलांसारखी घनदाट हिरवीगार झाडी येथे दिसत नाही. येथील जंगल शुष्क पानझडीच्या अरण्याच्या प्रकारात मोडते. कॉफी हे येथील मुख्य उत्पादन आहे. कॉफीला लागणारे ७० ते ८० फॅरनहाइट तापमान येथे लाभते.

Sunday, 14 August 2016

!!! जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद !!!

हे राष्ट्र जिजाऊचे ,हे राष्ट्र शिवरायांचे …
हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे .

भारताचे स्वातंत्र्य अबाधित राहो हीच आई जिजाऊ चरणी प्रार्थना …

जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद !

! बाजीराव पेशवे !

 (१७०० - १७४०) महान सेनानायक थे। वे १७२० से १७४० तक मराठा साम्राज्य के चौथे छत्रपतिशाहूजी महाराज के पेशवा (प्रधानमन्त्री) रहे। इनको 'बाजीराव बल्लाल' तथा 'थोरले बाजीराव' के नाम से भी जाना जाता है। इन्होने अपने कुशल नेतृत्व एवं रणकौशल के बल पर मराठा साम्राज्य का विस्तार (विशेषतः उत्तर भारत में) किया। इसके कारण ही उनकी मृत्यु के २० वर्ष बाद उनके पुत्र के शासनकाल में मराठा साम्राज्य अपने चरमोत्कर्ष पर पहुँच सका। बाजीराव प्रथम को सभी ९ पेशवा में सर्वश्रेष्ठ माना जाता है।
इनके पिता बालाजी विश्वनाथ पेशवा भी शाहूजी महाराज केपेशवा थे। बचपन से बाजीराव को घुड़सवारी करना, तीरंदाजी, तलवार भाला, बनेठी, लाठी आदि चलाने का शौक था। १३-१४ वर्ष की खेलने की आयु में बाजीराव अपने पिताजी के साथ घूमते थे।[1] उनके साथ घूमते हुए वह दरबारी चालों व रीतिरिवाजों को आत्मसात करते रहते थे।यह क्रम १९-२० वर्ष की आयु तक चलता रहा। जब बाजीराव के पिता का अचानक निधन हो गया तो मात्र बीस वर्ष की आयु के बाजीराव को शाहूजी महाराज ने पेशवा बना दिया।
जब महाराज शाहू ने १७२० में बालाजी विश्वनाथ के मृत्यूपरांत उसके १९ वर्षीय ज्येष्ठपुत्र बाजीराव को पेशवा नियुक्त किया तो पेशवा पद वंशपरंपरागत बन गया। अल्पव्यस्क होते हुए भी बाजीराव ने असाधारण योग्यता प्रदर्शित की। पेशवा बनने के बाद अगले बीस वर्षों तक बाजीराव मराठा साम्राज्य को बढ़ाते रहे। उनका व्यक्तित्व अत्यंत प्रभावशाली था; तथा उसमें जन्मजात नेतृत्वशक्ति थी। अपने अद्भुत रणकौशल, अदम्य साहस और अपूर्व संलग्नता से, तथा प्रतिभासंपन्न अनुज चिमाजी अप्पा के सहयोग द्वारा शीघ्र ही उसने मराठा साम्राज्य को भारत में सर्वशक्तिमान् बना दिया। इसके लिए उन्हें अपने दुश्मनों से लगातार लड़ाईयाँ करना पड़ी। अपनी वीरता, अपनी नेतृत्व क्षमता व कौशल युद्ध योजना द्वारा यह वीर हर लड़ाई को जीतता गया। विश्व इतिहास में बाजीराव पेशवा ऐसा अकेला योद्धा माना जाता है जो कभी नहीं हारा। छत्रपति शिवाजी महाराज की तरह वह बहुत कुशल घुड़सवार था। घोड़े पर बैठे-बैठे भाला चलाना, बनेठी घुमाना, बंदूक चलाना उनके बाएँ हाथ का खेल था। घोड़े पर बैठकर बाजीराव के भाले की फेंक इतनी जबरदस्त होती थी कि सामने वाला घुड़सवार अपने घोड़े सहित घायल हो जाता था।
इस समय भारत की जनता मुगलों के साथ-साथ अंग्रेजों व पुर्तगालियों के अत्याचारों से त्रस्त हो चुकी थी। ये भारत के देवस्थान तोड़ते, जबरन धर्म परिवर्तन करते, महिलाओं व बच्चों को मारते व भयंकर शोषण करते थे।[1] ऐसे में बाजीराव पेशवा ने उत्तर भारत से लेकर दक्षिण भारत तक ऐसी विजय पताका फहराई कि चारों ओर उनके नाम का डंका बजने लगा। लोग उन्हें शिवाजी का अवतार मानने लगे। बाजीराव में शिवाजी महाराज जैसी ही वीरता व पराक्रम था तो वैसा ही उच्च चरित्र भी था।
शकरलेडला में उसने मुबारिज़खाँ को परास्त किया। (१७२४)। मालवा तथा कर्नाटक पर प्रभुत्व स्थापित किया (१७२४-२६)। पालखेड़ में महाराष्ट्र के परम शत्रु निजामउलमुल्क को पराजित कर (१७२८) उससे चौथ तथा सरदेशमुखी वसूली। फिर मालवा और बुंदेलखंड पर आक्रमण कर मुगल सेनानायक गिरधरबहादुर तथा दयाबहादुर पर विजय प्राप्त की (१७२८)। तदनंतर मुहम्मद खाँ बंगश को परास्त किया (१७२९)। दभोई में त्रिंबकराव को नतमस्तक कर (१७३१) उसने आंतरिक विरोध का दमन किया। सीदी, आंग्रिया तथा पुर्तगालियों को भी विजित किया। दिल्ली का अभियान (१७३७) उसकी सैन्यशक्ति का चरमोत्कर्ष था। उसी वर्ष भोपाल में उसने फिर से निजाम को पराजय दी। अंतत: १७३९ में उसने नासिरजंग पर विजय प्राप्त की।
अपने यशोसूर्य के मध्यकाल में ही २८ अप्रैल १७४० को अचानक रोग के कारण उसकी असामयिक मृत्यु हुई।मस्तानी नामक मुसलमान स्त्री से उसके पत्नीसंबंध के प्रति विरोधप्रदर्शन के कारण उसके अंतिम दिन क्लेशमय बीते। उसके निरंतर अभियानों के परिणामस्वरूप निस्संदेह, मराठा शासन को अत्याधिक भार वहन करना पड़ा, मराठा साम्राज्य सीमतीत विस्तृत होने के कारण असंगठित रह गया, मराठा संघ में व्यक्तिगत महत्वाकांक्षाएँ प्रस्फुटित हुई, तथा मराठा सेनाएँ विजित प्रदेशों में असंतुष्टिकारक प्रमाणित हुई; तथापि बाजीराव की लौह लेखनी ने निश्चय ही महाराष्ट्रीय इतिहास का गौरवपूर्ण परिच्छेद रचा।

Monday, 1 August 2016

गुहागर (Ratnagiri)

महाराष्ट्रातील जवळजवळ सगळेच समुद्रकिनारे हे सुंदर, शांत, स्वच्छ, आणि निसर्ग रमणीय आहेत. गुहागरचा समुद्रकिनारा सुद्धा याला अपवाद नाही. खरंतर गुहागर म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचे वैभवच म्हणावे लागेल. वासिष्ठी आणि जयगड खाड्यांच्या मध्ये वसलेले गुहागर हे अत्यंत टुमदार असे छोटेसे गाव असून त्याला लाभलेला सुंदर निसर्गरम्य किनारा आणि पांढरीशुभ्र पुळण हे इथे वारंवार यावेसे वाटणारे आकर्षण नक्कीच आहे. 
 
गुहागरला सुरुचे बन असलेला अत्यंत सलग आणि सुरेख असा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्याचबरोबर श्रीव्याडेश्वर आणि श्रीदुर्गादेवीची नितांत रमणीय मंदिरे या परिसराची शोभा अजूनच वाढवतात. इथे मिळणारे अगदी खास कोंकणी चवीचे पदार्थ पर्यटकांना या प्रदेशाची भुरळ पाडतात. समुद्रकिनाऱ्याला समांतर जाणारा एकमेव रस्ता या गावाला लाभलेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या घरांची अंगणे विविध रांगोळ्यांनी सजवलेली असतात. व्याडेश्वराचे पुरातन मंदिर गावाच्या अगदी मधोमध वसले असून त्यामुळे गावचे भौगोलिकदृष्ट्या दोन भाग पडतात. एक म्हणजे खालचा पाट आणि दुसरा वरचा पाट. गुहागर हे आंबा, फणस, काजू, सुपारी आणि नारळ या फळांसाठी सुप्रसिद्ध आहे. गुहागरच्या उत्तरेकडे असलेल्या अंजनवेल या गावाशी दाभोळ हे गावाचे फेरीबोटीने जोडले गेल्यामुळे गुहागरचे महत्त्व अजून वाढलेले दिसते. तसेच दक्षिण दिशेला हेदवीवरून जयगड हे गावसुद्धा फेरीबोटीने जोडल्यामुळे गुहागर हे रत्नागिरी तालुक्याशी जोडले गेलेले आहे. गुहागरला आल्यावर समुद्रात होणारा सूर्यास्त पाहणे यासारखी दुसरी रमणीय गोष्ट नाही. हा नयनरम्य सूर्यास्त पाहणे सुखकर व्हावे म्हणून स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना बसण्यासाठी उत्तम सोय किनाऱ्यावर केलेली आहे.
गुहागरचा पेशवे घराण्याशी फार पूर्वीपासून संबंध आलेला आहे. थोरले माधवराव पेशव्यांचे काका राघोबादादा यांची पत्नी आनंदीबाईचे माहेर या गुहागरचेच. इथून १५ कि.मी. वर असलेल्या कोतुळक या गावी असलेल्या ओक घराण्यात आनंदीबाईचा जन्म झाला होता.
दगडी बांधणीचे व्याडेश्वर हे शिवमंदिर गुहागरचे ग्रामदैवत होय. अनेक चित्पावन ब्राह्मण कुटुंबियांचे हे कुलदैवत आहे. त्याचप्रमाणे नुकताच जीर्णोद्धार झालेले दुर्गादेवीचे मंदिरसुद्धा अत्यंत रमणीय ठिकाणी वसलेले आहे. गुहागरमध्ये अजून एक प्राचीन मंदिर असून ते उफराटा गणपतीचे आहे. इथे गणपतीचे तोंड पश्चिम दिशेला केलेले आढळते.
मुंबईपासून अंतर २८० कि.मी.
कसे जावे ?
विमान 
जवळचा विमानतळ मुंबई इथे आहे.
रेल्वे
जवळचे रेल्वे स्थानक हे कोंकण रेल्वेवरील चिपळूण हे आहे.
रस्ते
गुहागर हे चिपळूण, रत्नागिरी, पुणे आणि मुंबईशी रस्त्याने जोडले गेलेले आहे. या सर्व गावातून गुहागरला जाण्यासाठी परिवहनाच्या बसेस उपलब्ध असतात.