समुद्रकिनारे
पाहताच क्षणी प्रेमात पडावा असा अत्यंत रमणीय समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभला आहे. महाराष्ट्राची ही पश्चिम किनारपट्टी ७०० किमी. इतकी लांब आहे. अरबी समुद्राच्या असंख्य मनोहारी छटांप्रमाणेच इथले समुद्रकिनारे ही असंख्य आहेत. पांढऱ्या पुळणीशी हळूच सलगी करणारे कोकणातले अनेक समुद्रकिनाऱ्यावरचे नितळ पाणी, साहसी खेळांसाठी प्रसिद्ध असे श्रीवर्धनचे निळेशार पाणी अशी या समुद्राची अनेक मनमोहक रूपे आहेत. पावसाळ्यात प्रसंगी रौद्र रूप धारण करून विध्वंस करणारे मुंबईचे समुद्रकिनारे एरव्ही मात्र इथल्या जागांच्या किमती वधारण्यासाठी कारणीभूत ठरतात.

No comments:
Post a Comment