! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Sunday, 14 June 2015

! " वीर बाजीप्रभु देशपांडे स्मारक किल्ले पन्हं ळा " !



              पुणे जिल्ह्यातील भोरतालुक्यातील हिरडस येथील मावळातील सरदारम्हणजे बाजीप्रभू देशपांडे! हे मावळातील पिढीजातदेशकुलकर्णी. शिवरायांविरुद्ध लढणार्या बांदलांचेबाजी दिवाण होते. बाजीप्रभू देशपांडे हेपराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी,स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही अमिषाला बळी नपडणारे असे होते. वयाच्या पन्नाशीतही दिवसातील२०-२२ तास काम करूनही न थकणार्या बाजींचा पूर्णमावळ पट्टयात मोठा दबदबा होता. त्यांचेप्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहूनछत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलूव्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले.बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठाशिवरायांच्या चरणी वाहिली.महाराजांपेक्षा वयानेमोठ्या असणार्या बाजीप्रभूंच्या मनातमहाराजांविषयी आत्यंतिक प्रेमाबरोबरच भक्तिभावहोता आणि वडीलकीच्या नात्यानेकाळजीचीही भावना होती. पन्हाळगडाला शत्रूनेवेढा घातलेला असताना छत्रपतींची त्यातूनसुटका करणे; महाराजांना विशाळगडापर्यंतपोहोचवण्याची व्यवस्था करणेया भूमिका निभावतांना बाजीप्रभूंनी आपले केवळशौर्यच नव्हे, तर प्राण पणाला लावले.ही घटना स्फुरण चढवणारी,स्वराज्याविषयीचा अभिमान (आजही)आपल्या रोमरोमात भिनवणारी आहे.बाजीप्रभूंनी ‘लाखांचा पोशिंदा’ सुरक्षितराहण्यासाठी आपला देह अर्पण केला.त्यांचा अतुलनीय असा पराक्रम महाराष्ट्रातीलपुढच्या असंख्य पिढ्या नक्कीच स्मरणात ठेवतील.सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातूनसुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडेनिघाले होते. त्यावेळी आपली फसवणूक झाली हेलक्षात येऊन विजापूरी सैन्य त्यांचा पाठलाग करतहोते. पुढचा धोका लक्षात घेऊनचवडीलकीच्या अधिकारानेबाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्याससांगितले. बाजी आणि फुलाजी हे दोघे बंधूगजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत)सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले.सहस्रोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखलेहोते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीतअसतांनाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्याहिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली.पराक्रमाची शर्थ म्हणजे काय ते घोडखिंडीतील(पावनखिंडीतील) लढाईकडे पाहून समजते.सिद्धी मसूदचे सैन्य अडवतांना कामी आलेलेमराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी,जखमी झालेले स्वत:चे शरीर या कशाचेही भानबाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूपपोहोचलेयाचा इशारा देणार्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचेकान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हाताततलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते.खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतारप्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावरकर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले.(ही घटना दिनांक २३ जुलै, १६६०या दिवशी घडल्याची इतिहासात नोंद आहे.)मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमानेआणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्ररक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नावपावनखिंड झाले. बाजी-फुलाजी बंधूंवर विशाळगडावर,महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.बाजीप्रभू आणि फुलाजी यांची समाधी विशाळगडावरआहे. तसेच पन्हाळगडावरबाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.स्वराज्यनिर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजसुखरूप, सुरक्षित राहायला हवेत यासाठी स्वत:मृत्यूला सामोरेजायची तयारी असलेल्या बाजी आणि फुलाजीदेशपांडेंसारख्या सरदारांमुळेस्वराज्याचा पाया रचला जात होता. परंतुही हिर्यांसारखी अमूल्य माणसे सोडूनगेलेली पाहतांना महाराजांना काय वाटत असेल हेसांगणे कठीणच.


No comments:

Post a Comment