-हा दुर्ग देखील माचीप्रबळ गावाच्या कडेला लागून आहे. या दुर्गावर चढून जाण्यासाठी खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. कोण्या राज्याचे कलावंती राणीवर प्रेम होत. ती त्याला सोडून जावू नये म्हणून त्याने कलावंती दुर्गाच्या माथ्यावर एक महल बांधला होता. याच माथ्यावर शिमग्याच्या सणाला माचीप्रबळ गावातील आदिवासी नृत्य करतात. हया दर्गाचे रुप इतके सुंदर आहे की या दुर्गाची पुर्वीकाळी सोडून गेलेल्या 33 जगामधील ठिकाणामध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे कलावंती दुर्गाचा 11 वा नंबर लागतो. परंतु अजूनदेखील याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले जात नाही.
! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !
Thursday, 7 January 2016
Tuesday, 5 January 2016
! " मिञहो जिवन जगण्यासाठी संघर्ष हा करावच लागतो " !
मिञहो तुम्हाला सांगतो जिवन
जगण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो
ऊगवत्या सूर्याला जसं ऊगवाव लागतं,
तसचं मावळावे ही लागते,
कारण सूर्यालाही ऊगवणयासाठी आणि अस्तासाठी संघर्ष करावा लागतोच.
लोकांना वाटते त्याचे जिवन किती सूंदर आहे,
पण एक दिवस त्याच्या जागी जावून बगा,
पण तो दिवस तूमचा दूद॔वी अनुभव असेल.
म्हणून सांगतो मित्रहो जिवनांत संघर्ष हा करावाच लागतो...!!!!
ज्या झाडांची पावसाळयात हिरवीगार पालवी पाहून मनात आनंद वाटतो,
त्याच झाडांना ऊन्हांळयांत जावून विचारा त्यांचे दुःख,
कारण झाडांना सुद्धा जिवन जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो.
म्हणून सांगतो मित्रहो जिवनांत संघर्ष हा करावाच लागतो...!!!!
एका अपंगाला हात नसतात पाय नसतात ,
पण फरपटत आपले जिवन जगतो,
आणि आम्हाला सव॔ काही असून जीवन जगण्याची ईच्छाच नसते.
म्हणून सांगतो मित्रहो जिवनांत संघर्ष हा करावाच लागतो...!!!!
कवी :- आपलेच बीजे
जगण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो
ऊगवत्या सूर्याला जसं ऊगवाव लागतं,
तसचं मावळावे ही लागते,
कारण सूर्यालाही ऊगवणयासाठी आणि अस्तासाठी संघर्ष करावा लागतोच.
लोकांना वाटते त्याचे जिवन किती सूंदर आहे,
पण एक दिवस त्याच्या जागी जावून बगा,
पण तो दिवस तूमचा दूद॔वी अनुभव असेल.
म्हणून सांगतो मित्रहो जिवनांत संघर्ष हा करावाच लागतो...!!!!
ज्या झाडांची पावसाळयात हिरवीगार पालवी पाहून मनात आनंद वाटतो,
त्याच झाडांना ऊन्हांळयांत जावून विचारा त्यांचे दुःख,
कारण झाडांना सुद्धा जिवन जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो.
म्हणून सांगतो मित्रहो जिवनांत संघर्ष हा करावाच लागतो...!!!!
एका अपंगाला हात नसतात पाय नसतात ,
पण फरपटत आपले जिवन जगतो,
आणि आम्हाला सव॔ काही असून जीवन जगण्याची ईच्छाच नसते.
म्हणून सांगतो मित्रहो जिवनांत संघर्ष हा करावाच लागतो...!!!!
कवी :- आपलेच बीजे
Monday, 4 January 2016
! " मैत्री " !
-
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,एक
प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी...कधी शिकवण कधी आठवण,तहानलेल्या चातकाला
जशी पावसाची वणवण...तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवणारी,मैत्री असावी एक
वेगळं आयुष्य घडवणारीहसत राहणारी.., हसवत राहणारी...संकटकाळी हात
देणारी...आनंदी समयी साद घालणारी...मनाची कवाडे उघडून डोकावणारी...काहीं t
गुपितांचे राखण करणारी...मन मोकळे करुन सारं सांगणारी...सांगता सांगता मोहीत
करणारी...कधी कुणाला न लुटणारी...चांगल्याच कौतुक करणारी...तितकीच चूका
दाखविणारी...शूध्द सोन्याप्रमाणे चम चम चमकणारी...,मैत्री असावी अशी...
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,एक
प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी...कधी शिकवण कधी आठवण,तहानलेल्या चातकाला
जशी पावसाची वणवण...तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवणारी,मैत्री असावी एक
वेगळं आयुष्य घडवणारीहसत राहणारी.., हसवत राहणारी...संकटकाळी हात
देणारी...आनंदी समयी साद घालणारी...मनाची कवाडे उघडून डोकावणारी...काहीं t
गुपितांचे राखण करणारी...मन मोकळे करुन सारं सांगणारी...सांगता सांगता मोहीत
करणारी...कधी कुणाला न लुटणारी...चांगल्याच कौतुक करणारी...तितकीच चूका
दाखविणारी...शूध्द सोन्याप्रमाणे चम चम चमकणारी...,मैत्री असावी अशी...
Friday, 1 January 2016
! " जिजाऊंचा अखेरचा श्वास " !
राजमाता जिजाऊंचा पाचाड येथील राजवाडा अखेरची घटका मोजत आहे. पुरातत्त्व विभागाच्या उदासिनतेमुळे हा ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या राजवाडय़ाची तात्काळ दुरुस्ती केली जावी अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात हिंदवी स्वराज्याची चेतना जागवणाऱ्या जिजाऊंचे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे वास्तव्य होते. जिजाऊंच्या समाधिस्थळापासून अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर त्यांच्यासाठी सुसज्ज राजवाडय़ाची उभारणी करण्यात आली होती. याच राजवाडय़ात जिजाऊंचे अनेक वर्षे वास्तव्य होते. आपल्या जीवनाचा अखेरचा श्वासही त्यांनी याच वाडय़ात घेतला. महाराजांचे सन्यदलही या परिसरात वास्तव्यास होते. आज मात्र या ऐतिहासिक वाडय़ाची दुरवस्था झाली आहे. काळाच्या ओघात राजवाडय़ाचा बराचसा भाग नामशेष झाला आहे. राजवाडा परिसरात गवताचे साम्राज्य पसरले आहे, तर या भागात गुरांचा वावर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राजवाडा परिसराला अवकळा आली आहे.महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजवाडय़ालगतच्या १४ एकरला परिसराला पुरातत्त्व खात्याने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल आहे. तसे फलकही येथे लावण्यात आले आहेत. मात्र राजवाडय़ाची देखभाल करण्याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष दिलेले नाही. देखभाल दुरुस्तीअभावी वाडय़ाची तटबंदीही अखेरची घटका मोजते आहे. इमारतीच्या पायाचे दगडही निखळू लागले आहेत. मात्र पुरातत्त्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी फिरकतानाही दिसत नाही. किल्ले रायगड आणि जिजाऊंची समाधी पाहायला येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांची पावले इकडे वळतात खरी, पण येथील परिस्थिती पाहून हताश होतात. पुरातत्त्व विभागाने हा परिसर अडगळीत टाकल्याची भावना शिवभक्त व्यक्त करताहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकासाठी शासन कोटय़वधी रुपये खर्च करणार आहे. मात्र दुसरीकडे जिजाऊ राजवाडय़ासारखी ऐतिहासिक स्मारके नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या स्मारकाची वेळीच देखभाल केली नाही तर इतिहासाच्या या पाऊलखुणा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक ग्रामस्थ या परिसराची देखभाल करायला तयार आहेत, परंतु त्याला पुरातत्त्व विभाग मान्यता देत नाही. रायगड जिल्हा परिषदेने पण यासाठी निधी देण्याची तयारी दाखवली होती, मात्र पुरातत्त्व विभाग त्यालाही तयार नाही. पुरातत्त्व खात्याच्या या अनास्थेबद्दल ग्रामस्थ नाराजी व्यक्त करतात. शासनाने यात लक्ष घालून हा इतिहासाचा वारसा जतन करावा अशी मागणी करत आहेत.
Tuesday, 29 December 2015
! " मंगेश पाडगावकर " !
अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती
इथे सुरू होण्याआधी संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते डोळ्यांतिल पाणी
जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती
सर्व बंध तोडुनि जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती
गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे
असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडित धावे जीव तुझ्यासाठी
आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी
डोळ्यांतुन माझ्यासाठी लाव दोन ज्योती
कवी मंगेश पाडगावकर यांना बीजे कडून आखेरचा भगवा मुजरा....!!!!
Sunday, 27 December 2015
! " ऐतिहासिक विहिर " !
साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावरम्हणजे सातारा ते भुईंज रस्त्यावर उजवीकडे"शेरी लिंब"नावाचे गाव आहे,
या गावात एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी बारा मोटेची विहीरआहे.
शिवकालीन स्थापत्यशास्त्राचं एक अद्भुत उदाहरण म्हणजे ही बारा मोटेची विहीर.
ही विहीर पाहताना थक्क व्हायला होतं, म्हणजे हि विहीर आहे कि भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
म्हणजे बघा विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि कमान असलेला भरभक्कम दरवाजा, मध्यभागी दोन मजली महाल आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी.
साधारण शिवलिंगाचा आकाराची ही विहीर आहे.
अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत.
विहिरीस आलिशान जिना आणि आतउतरण्यास चोरवाटा आहेत.
या विहिरीवर बारा मोटा चालत असत असे म्हणतात, नीट लक्ष देवून पाहिल्यास बारा मोटेचे बारा चौथरे नजरेस पडतात.
या विहिरीचे बांधकाम इ.स. १६४१ ते १६४६ या दरम्यान श्रीमंत सौ. विरुबाई भोसले यांनी केले.
या विहिरीची खोली ११० फूट असून व्यास साधारण ५० एक फूट आहे.
विहीर दोन टप्प्यात विभागली आहे.
अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती दुसरी विहीर.
या दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे.
आलिशान जिना उतरून आपण खाली महालाच्या तळमजल्यावर जावून पोहोचतो.
इथून महालाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दोन चोरवाटा आहेत.
इंग्रजी एल आकाराच्या जिन्याने वर जाताच आपण छोटेखानी महालात येवून पोहोचतो.
या महालाला मध्यभागी चार खांब आहेत, प्रत्येक खांबावर वेगवेगळीशिल्पे कोरलेली आहेत.
गणपती, हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र.
खांबाच्या दुसऱ्या बाजूस अशावारूढ महाराजांचे शिल्प कोरलेले आहे, त्यावरील बाजूस नक्षीदार फुले.
या महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास दरवाजावरील कमानिशेजारी दोन शरभ शिल्पे कोरलेली दिसतात.
एवढे सगळे अवशेष पाहून महालाच्याछतावर चढून आलो आणि पाहिला तर इथेसिंहासन आणि समोर सभेसाठी बैठक व्यवस्था केलेली आहे.
सातारचे राजे छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांची विहिरीतील गुप्त महालात खलबते चालत असत तसेच वरील बाजूस असलेल्या सिंहासनावर बसून सहकार्यांशी संवाद साधत असत.
इतिहासाच्या पुस्तकात दुर्लक्षित राहिलेली ही विहीर पाहण्याचे भाग्य लाभणे म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजाची कृपा आणखी दुसरं काय...!
या गावात एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी बारा मोटेची विहीरआहे.
शिवकालीन स्थापत्यशास्त्राचं एक अद्भुत उदाहरण म्हणजे ही बारा मोटेची विहीर.
ही विहीर पाहताना थक्क व्हायला होतं, म्हणजे हि विहीर आहे कि भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
म्हणजे बघा विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि कमान असलेला भरभक्कम दरवाजा, मध्यभागी दोन मजली महाल आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी.
साधारण शिवलिंगाचा आकाराची ही विहीर आहे.
अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत.
विहिरीस आलिशान जिना आणि आतउतरण्यास चोरवाटा आहेत.
या विहिरीवर बारा मोटा चालत असत असे म्हणतात, नीट लक्ष देवून पाहिल्यास बारा मोटेचे बारा चौथरे नजरेस पडतात.
या विहिरीचे बांधकाम इ.स. १६४१ ते १६४६ या दरम्यान श्रीमंत सौ. विरुबाई भोसले यांनी केले.
या विहिरीची खोली ११० फूट असून व्यास साधारण ५० एक फूट आहे.
विहीर दोन टप्प्यात विभागली आहे.
अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती दुसरी विहीर.
या दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे.
आलिशान जिना उतरून आपण खाली महालाच्या तळमजल्यावर जावून पोहोचतो.
इथून महालाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दोन चोरवाटा आहेत.
इंग्रजी एल आकाराच्या जिन्याने वर जाताच आपण छोटेखानी महालात येवून पोहोचतो.
या महालाला मध्यभागी चार खांब आहेत, प्रत्येक खांबावर वेगवेगळीशिल्पे कोरलेली आहेत.
गणपती, हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र.
खांबाच्या दुसऱ्या बाजूस अशावारूढ महाराजांचे शिल्प कोरलेले आहे, त्यावरील बाजूस नक्षीदार फुले.
या महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास दरवाजावरील कमानिशेजारी दोन शरभ शिल्पे कोरलेली दिसतात.
एवढे सगळे अवशेष पाहून महालाच्याछतावर चढून आलो आणि पाहिला तर इथेसिंहासन आणि समोर सभेसाठी बैठक व्यवस्था केलेली आहे.
सातारचे राजे छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांची विहिरीतील गुप्त महालात खलबते चालत असत तसेच वरील बाजूस असलेल्या सिंहासनावर बसून सहकार्यांशी संवाद साधत असत.
इतिहासाच्या पुस्तकात दुर्लक्षित राहिलेली ही विहीर पाहण्याचे भाग्य लाभणे म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजाची कृपा आणखी दुसरं काय...!
Friday, 25 December 2015
Subscribe to:
Posts (Atom)







