! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Tuesday, 23 September 2014

! " राजमाता जिजाबाई " !

रायगडावरील राज्याभिषेक समारंभनंतर काही दिवसातच, म्हणजे १७ जून १६७४ रोजी शिवाजीती आई जिजाबाई हिचा वृद्धापकालाने मृत्यू झाला. समारंभानंतरचे दिवस ती पाचाडच्या कोटात राहिली होती. राज्यरोहणानंतर काहीच दिवसात घडलेली ही दुखद घटना हा शिवाजीसाठी मोठा मानसिक धक्काच होता.

जिजाबाईशी असलेले शिवाजीचे जिव्हाळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. दहा वर्षांपूर्वी जेव्हा होदेगिरीला शाहजीचा अकाली मृत्यू झाला होता तेव्हा जिजाबाई सती जायच्या तयारीत होती. शिवाजी सुरतेहून परतत असताना त्याला ही दुखद बातमी कळली होती. त्याने तत्काल वेगात परत येऊन जिजाबाईची मनधरणी केली होती व तिला सती जाण्यापासून थांबवले होते. संकटकाळी जिजाबाई ही त्याचा भक्कम आधार होती. तो आधार आज त्याला पारखा झाला होता.

जिजाबाईच्या पार्थिवावर पाचाडला अत्यसंस्कार करण्यात आले. त्याच जागी आज तिची समाधी बांधली आहे.


पाचाड ( रायगढ ) येथील जिजामाता यांची समाधी तसेच समाधी वरिल सिलालेख


! " किल्ले रायगढ टकमक टोक " !

किल्ले रायगढ येथील सगळ्यात विहंगमय दृष्य दाखवणारे ठिकाण महणजे ! टकमक टोक ! पूर्वी जर कोणी गदारी केली तर त्याला या टकमक टोकावरूण पोत्यात घालून वरून खाली फेकून देत . पण तूम्ही या टोकावरून खाली पाहतांना कळेल की याची ऊॅची आणि खाली फेकलेलयाची काय आवथा होत असेल मी या टोकावरून फोटोग्राफी केली आहे खाली तूम्ही बघा .


फक्त बीजे



Monday, 22 September 2014

! " चला इतिहास घडवूया " !

झालेल्या इतिहासाची आठवण करण्यापेक्षा आपण एक संकल्प करूयात की ज्या शिवरायांनी पूण॔ आयुष्य या मराठी मातीसाठी खच॔ केलं त्या शिवरायांचं अखंड महाराष्ट्राचे सप्न पूण॔ करूया .
     त्या शिवाय आपणाला या महाराष्ट्रात कोणी खाणार नाही , या महाराष्ट्रात परकिय लोक ईतक्या प्रमाणात झाले अहेत की , आपल्या महाराष्ट्रीयन माणसाच्या हाताला कामधंदा सूधा भेटणे मूशकिल झाले आहे म्हणूनच म्हणतो चला ऊठा आणि घडवा महाराष्ट्र महाराजां च्या सप्नातला


! " जय भवानी " !
! " जय शिवाजी " !
! " जय महाराष्ट्र " !

! " शिवरायांचा दरारा " !


शिवरायांचा दरारा- संशोधकांना शिवाजी महारांजांबद्दलचा संदर्भ “लंडन गॅझेट” या पत्राच्या १६७२ च्या आव्रुत्तीत.
"शिवरायांचा दरारा"
संशोधकांना शिवाजी महारांजांबद्दलचा संदर्भ “लंडन गॅझेट” या पत्राच्या १६७२ च्या आव्रुत्तीत सापडला
मराठ्यांनी जेव्हा सुरतेवर हल्ला चढवला तेव्हा जे पत्र तत्कालीन ब्रिटीश अधिकार्याने त्याच्या वरिष्ठांना लिहिले ते अगदी तंतोतंत मी इथे देत आहे, यावरून आपल्या शिवछत्रपतींचा त्याकाळी मुघलावरती आणि इंग्रजामध्ये असलेला दबदबा लक्षात येईल.. ओळी कमीच आहेत पत्राच्या परंतु अर्थ भलताच मोठा आहे….
ते पत्र :-

Two days since we received Letters from
India, written by the English President residing
at Suratte, who acquaints us with
the daily fears they have there, from Sevagee
the Rebel, who having beaten the
Mogul in several Battels, remains almost Master of
that Countrey

हिंदुस्थानच्या इतिहासात अठरावे शतक हे मराठ्यांचे शतक आहे….
शिवरायांची अभेद्य नजर कोणाही शत्रूवर पडल्यावाचून कधीही राहिली नाही, भविष्याचा अंदाज शिवरायांनी कधीच ओळखून ठेवला होता हे आपण सर्व जाणताच, शिवछत्रपतींचे मावळे, शिवछत्रपतींचे गनिमी युद्ध, शिवरायांचे अनुमान, शिवरायांचे ध्येय या सगळ्या गोष्टी किमान आपल्या समजण्याच्या पलीकडच्याच होत्या..
उपरोक्त पत्रावरून स्पष्टपणे दिसून येते कि ज्यांनी हिंदुस्थानावर इतकी वर्षे राज्य केली त्यांच्यामध्ये शिवरायांचा किती दरारा होता

फक्त बीजे

! " भगव्याला मान हाच आमचा स्वाभिमान " !

कोणाच्या बापाला
अपला मुलगा इंजिनियर करायचा
कोणाला डाँक्टर
कोणाला इंसपेक्टर करायचा
कोणाला कलेक्टर
कोणाला काँन्ट्राक्टर करायचा
आम्हाला तर आमच्या बापाने
एकच मंत्र शिकवला
काहीही कर
कसाही जग
पण
लढं भगव्यासाठी
मरं भगव्यासाठी


! " किल्ले पूरंदर छायाचित्रे " !

! " शिवरायांचे पराक्रमी मावळ॓ प्रयागजी प्रभू " !

अजिंक्यतारा झुंजविणारे प्रयागजी प्रभू
८ डिसेंबर १६९९ औरंगजेब बादशाह अजिंक्यतारा घेण्यासाठी सरसावला. अजिंक्यताराचे किल्लेदार होते प्रयागजी प्रभू. गड घेण्यासाठी बादशाहचे प्रयत्न सुरु झाले. गडाच्या वाटेवर मोगल गस्त घालू लागले. मराठ्यांचे गडावर येणे जाणे कठीण होउन बसले. गडावर तोफांचा मारा सुरु झाला, औरंगजेबास जास्तीत जास्त आठवडाभरात गड ताब्यात येइल, असे वाटत होते. पण महीने गेले तरी सुद्धा गडावरचे मराठे काही दाद देई नात. एकदा तर बादशाही सैन्याने गडावर सुलतानढवा सुद्धा केला पण मराठ्यांच्या तिखट प्रतिकारा समोर मोगली सैन्याला माघार घ्यावी लागली. २ मार्च १७०० रोजी छत्रपति राजाराम राजांचा सिंहगडावर मृत्यु झाला. या बातमीने मोगली गोटात आनंदाचे वातावरण पसरले. त्यांना वाटले आता मराठे शरण येतील आणि मग आपला उत्तरेतला मार्ग मोकळा. पण कसले काय, जरी या बातमीने मराठे खचले होते तरी सुद्धा त्यांनी किल्ला तसाच लढ़वायचा ठरविले. आता त्यांना एक नवे नेतृत्व मिळाले होते, ताराराणीच्या रुपात साक्षात् भवानी माताच मोगलांचा विनाश करण्यास सरसावली होती.राजाराम राजे जाऊन महिना होउन गेला तरी बादशाहस अजिंक्यतारा काही दाद देत नव्हता. १३ एप्रिल १७०० च्या पहाटे. मोगलांनि किल्ल्याच्या तटा खाली दोन भुयारे खणली आणि त्यात सुरुंग पेरून त्यांस बत्ती लाविली. एक सुरुंग फुटला आणि अनेक मराठे त्या खाली गाडले गेले, खुद्द प्रयागजी सुद्धा ढीगाऱ्यात अडकले पण सुदैवाने ते बचावले. तट फुट्ल्याचा आनंदात मोगल वर चढून येऊ लागले, अनेक मोगल किल्ल्यात घुसले. तेवढ्यात अचानक दुसरा सुरुंग उडाला आणि तट चढ़णारे हजारो मोगल त्या खाली गढले गेले. कित्येक मोगल तर उंच फेकले गेले. आधीच आत आलेल्या मोगली सैन्यावर आता प्रयागजी आणि त्यांचे मराठे तुटून पडले आणि त्यांना साफ़ कापून काढले. गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनि तब्बल साडेचार महीने औरंग्जेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाणागोटा, दारुगोळा संपला, तेव्हा गडावरच्या मराठ्यानी २१ एप्रिल १७०० रोजी शरणागती पत्करली.

! " शिवरायांचे पराक्रमी मावळ॓ लायजी पाटील " !

जंजीऱ्याच्या तटाला शिड्या लावणारे लायजी पाटिलकोकण किनारपट्टीवर फिरंग्यांसोबत मराठ्यांचा अजुन एक शत्रु अजगरा सारखा विळखा घालून बसला होता. अगदी महाराजांच्या शब्दात वर्णन करायचे तर "जैसा घरास उंदीर, तैसाच राज्यास सिद्दी." या सिद्दीचा अम्मल दंडाराजपुरीवर होता, तो स्वराज्यवर हल्ले करुन लूट घेउन पुन्हा आपल्या मुल्खात पसार होत असे. शिवकाळात शिवाजी महाराजांना कोकणात अनेक मानवी रत्ने मिळाली. वेंटाजी भाटकर , मायनाक भंडारी , तुळाजी आंग्रे , दौलतखान , सिद्दी मिस्त्री , कान्होजी आंग्रे , दर्यासारंग इत्यादी देवमासे आपल्या प्रचंड बळाचा स्वराज्यासाठी वापर करीत होते. त्यातीलच एक मासळीहून चपळ असलेला कोळी. याचं नाव होतं , लायजी सरपाटील कोळी. हा कुलाब्याचा राहणारा. विलक्षण धाडसी , शूर आणि विश्वासू. महाराजांनी सिद्दीचा मुलुख तर काबिज केलि पण त्याचा बुलंद जंजिरा मात्र त्यांना प्रत्येक वेळेस हुलकावणी देत राहिला. १६५७ ते १६७८ पर्यंत किमान ८ वेळेस महाराजांनी जंजिरा काबिज करण्याचा प्रयत्न केला पण यात त्यांना यश आले नाही. अशा जागत्या शत्रूच्या काळजात शिरायचं तरी कसं ? मुळात समुदात शिड्या लावायच्या तरी कशा ? आवाज होणार , हबशांना चाहूल लागणार. होड्यांत शिडी उभी करून तटाला भिडवली की , दर्याच्या लाटांनी शिड्यांचे आवाज होणार , शिड्या हलणार. वर गनीम जागा असणार. तो काय गप्प बसेल ? त्यांच्या एकवट प्रतिहल्ल्याने सारे मराठे भाल्या , र्वच्या , बंदुकांखाली मारले जाणार. एकूणच हा एल्गार भयंकर अवघड , अशक्यच होता , तरीही लायजी पाटलानं हे धाडस एका मध्यानरात्री करायचं ठरविलं. त्याने मोरोपंतांना आपला डाव समजविला. काळजात धडकी भरावी असाच हा डाव होता. लायजीने मोरोपंतांना म्हटलं , ' आम्ही होड्यांतून जंजिऱ्याचे तटापाशी जाऊन होड्यांत शिड्या , तटास उभ्या करतो. तुम्ही वेगीवेगी मागोमाग होड्यांतून आपले लष्कर घेऊन येणे. शिडीयांवर चढून , एल्गार करून आपण जंजिरा फत्ते करू. ' मोरोपंतांनी तयारीचा होकार लायजीस दिला. किनाऱ्यावर लायजीच्या काही होड्या मध्यरात्रीच्या गडद अंधारातून शिड्या घेतलेल्या कोकणी सैनिकांसह किल्ल्याच्या तटाच्या रोखाने पाण्यातून निघाल्या. आवाज न होऊ देता म्हणजे अगदी वल्ह्यांचा आवाजही पाण्यात होऊ न देता मराठी होड्या निघाल्या. जंजिऱ्याच्या तटांवर रास्त घालणारे धिप्पाड हबशी भुतासारखे येरझाऱ्या घालीत होते. लाय पाटील तटाच्या जवळ जाऊन पोहोचला. त्याच्या साथीदारांनी शिड्या होडीत उभ्या करून तटाला लावल्या. प्रत्येक क्षण मोलाचा होता. मरणाचाच होता. तटावरच्या शत्रूला जर चाहूल लागली , तर ? मरणच. लाय पाटील आता प्रत्येक श्वासागणिक मोरोपंतांच्या येऊ घातलेल्या कुमकेकडे डोळे लावून होता. पण मोरोपंतांच्या कुमकेची होडगी दिसेचनात. त्या भयंकर अंधारात लायपाटील क्षणक्षण मोजीत होता. किती तरी वेळ गेला , काय झालं , कोणास ठावूक ? ते इतिहासासही माहीत नाही. पण मोरोपंत आलेच नाहीत. लाय पाटलाने आपल्या धाडसी कौशल्याची कमाल केली होती. पण मोरोपंत आणि त्यांचे सैन्य अजिबात आले नाही. का येत नाही हे कळावयासही मार्ग नव्हता. आता हळुहळू अंधार कमी होत जाणार आणि ' प्रभात ' होत जाणार. (मूळ ऐतिहासिक कागदांत ' प्रभात ' हाच शब्द वापरलेला आहे.) अन् मग उजेडामुळे आपला डाव हबश्यांच्या नजरेस पडणार. अन् मग घातच! पुन्हा असा प्रयत्न करण्याचीही शक्यता उरणार नाही. काय करावं ? लायजीला काही कळेचना. त्याच्या जिवाची केवढी उलघाल त्यावेळी झाली असेल , याची कल्पनाच केलेली बरी. अखेर लाय पाटील निराश झाला. हताश झाला. त्याने तटाला लावलेल्या शिड्या काढून घेतल्या आणि आपल्या साथीदारांसह तो मुरुडच्या किनाऱ्याकडे परत निघाला. न लढताच होणाऱ्या पराभवाचं दु:ख त्याला होत होतं. मोरोपंतांची काय चूक किंवा गडबड घोटाळा झाला , योजना का फसली हे आज कोणालाच माहीत नाही. पण एक विलक्षण आरमारी डाव वाया गेला अन् लायजीची करामत पाण्यात विरघळली.