! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Tuesday, 6 February 2018

कलावंतीण दुर्ग किल्ला

जय महाराष्ट्र मित्रांनो, आता आम्ही आपणास महाराष्ट्रातील किल्ले व त्यांची माहिती सांगणार आहोत. महाराष्ट्रात एकूण ३५० च्या वर गडद किल्ले आहेत. हे गडकिल्ले आपल्या कायम स्मरणात असावेत तसेच आपणाला कायम आपल्या इतिहासाची आठवण असावी म्हणून किल्ल्यांची माहिती सांगितली आहे. आता आपण कलावंतीण दुर्ग विषयी जाणून घेणार आहोत.

दुर्ग कलावंतीण हा मुंबई-पुणे गतिमार्गावरून पुण्याकडे जाताना पनवेलच्या पूर्वेला माथेरानच्यारांगेत असलेला एक डोंगरवजा किल्ला आहे.

 

कलावंतीण दुर्ग

 कलावंतीण दुर्ग

 गडावर पोहचायचे कसे :

हा गड मुंबई-पुणे हायवेवरून दिसतो. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (NH4) शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास जेथे मुंबई-पुणे महामार्ग जोडला जातो. तेथे शेडुंग फाटा लागतो. पनवेलमधील वरुण गांधी हॉस्पिटलजवळ सहा आसनी रिक्षाने ठाकुरवाडी गावामध्ये उतरता येते. १० लोकांचे साधारणतः २००-२५० रुपये द्यावे लागतात. आणि दुसरा उपाय म्हणजे पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा आहे. माणशी १२ रुपये बसचे टिकीट आहे. ठाकुरवाडीला आल्यावर प्रबल गडाच्या दिशेने पायी पायी जावे लागते.

‘कलावंतीण दुर्गाचा इतिहास :

कोण्या राज्याचे कलावंती राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून न जावी म्हणून त्या राज्यांनी कलावंती राणीला त्या किल्ल्यावर महाल बांधून दिला. हा दुर्ग प्रबल गडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्ये करतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग, इर्शल गड, कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते.

 

कलावंतीण दुर्ग

कलावंतीण दुर्ग

निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि सह्याद्रीच्या पर्वतराईमध्ये ताठ मानेने कटाक्ष टाकत उभा असलेला कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड एकाच दिवसात पाहणे तसे मोठ्या धाडसाचे आहे. मी आजवर पाहिलेल्या सर्व किल्ल्यांमध्ये चढाई करण्यास अवघड सुळका, असे कलावंतीण दुर्ग बाबत म्हणता येईल. प्रबळगडाच्या शेजारी उभा असलेला कलावंतीण दुर्ग म्हणजे केवळ उंचच उंच एक सुळका आहे. जास्त उंची आणि दगडामधील कोरलेल्या पायऱ्या यामुळे दुर्गाच्या सर्वात वर जाण्यासाठी खूप हिम्मत लागते.

पनवेल आणि कर्जत दरम्यान जून्या मुंबई –

पुणे महामार्गावरून जात असताना प्रबळगड दिसतो. प्रबळगडाच्या परिसरात उल्हास नदी, पाताळगंगा नदी, माणिकगड, कर्नाळा, इर्शाळगड आणि जवळच माथेरानचा डोंगर आहे. मुंबई पुणे महामार्गावरून कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगडकडे पाहिल्यास प्रबळगड म्हणजे महादेवाची पिंड आणि कलावंतीण दुर्ग म्हणजे समोर बसलेला नंदी असे दृश्य दिसते. माथेरानच्या सनसेट पाँईंटवरून दिसणारा सूर्यास्त प्रबळगड आणि कलावंतीण दुर्गच्या मध्ये होतो.

जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून प्रबळगडाच्या पायथ्याशी असलेल्या माची प्रबळ या गावी पोहचण्यासाठी ठाकूरवाडी या गावातून जावे लागते.

शेडुंग मार्गे :

मुंबई किंवा पुण्याहून पनवेल अथवा कर्जतला आल्यानंतर जून्या पनवेल – पुणे मार्गावर शेडुंगकडे जाणारा मार्ग आहे. शेडुंग गावापासून ठाकूरवाडी गावापर्यंत जाण्यासाठी रिक्षा असतात. तेथून पुढे पाय वाटेने माची प्रबळला पोहचता येते.

माथेरान – प्रबळगड मार्गे :

माथेरानजवळ असलेल्या पिसरनाथ मंदिराजवळून आकसरवाडी गावामधून प्रबळगडचा डोंगर चढता येतो. प्रबळगडावर गिर्यारोहणासाठी माथेरान मार्गे येणारे पर्यटक याच वाटेने येतात. शेंदुंग मार्गे आल्यानंतर माची प्रबळ गावामध्ये प्रबळ गडाच्या पायथ्याशी हॉटेल आहेत. तेथे जेवणाची सोय होऊ शकते. परंतु प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग पाहण्यासाठी मुक्कामी जाणाऱ्या गिरी प्रेमींना माची प्रबळ गावाच्या बाजूस असलेल्या डोंगराच्या पठारावरच तंबू ठोकून रहावे लागते. माची प्रबळ गावामध्ये जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शाळेच्या परिसरात देखील गिरीप्रेमी तंबू ठोकून राहतात.

कलावंतीण दुर्ग

प्रबळगडचा इतिहास :

प्रबळगड केंव्हा बांधला याची इतिहासात नोंद नाही. परंतु प्रबळगडावर असलेल्या गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड ठरवता येऊ शकतो. बुद्ध कालीन अथवा त्यानंतरच्या कालखंडात या गडाचे बांधकाम झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रबळगडाची मोक्याची जागा पाहता परिसरातील पनवेल आणि कल्याणच्या समुद्रातील प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी हा गड बांधण्यात आला असावा, असे म्हणतात. प्रबळगड हा व्यापारी मार्गावर तसेच समुद्र किनार्यापासून जवळच असलेला गड आहे. त्यामुळे शिलाहार आणि यादवांनी येथे लष्करी तळ उभारला होता. यादवांनी त्यावेळी गडास मुरंजन असे नाव दिले होते.

काही काळानंतर मुरंजन अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात आला. त्यावेळी निजामशाहीत असलेल्या शहाजी महाराजांनी मुघलशाही, निजामशाही आणि आदिलशाही असा संघर्ष सुरु असताना मुरंजनावर आश्रय घेतला होता. मुरंजनवर त्यावेळी शहाजी राज्यांच्या सोबत त्यांच्या धर्मपत्नी जिजाबाई साहेब आणि बाळ शिवाजी देखील होते. त्यानंतर इ.स. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला, या तहानुसार मुरंजनवर मोघलांची सत्ता स्थापन झाली.

काही काळानंतर इ. स. १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठेशाहीचा सरदार आबाजी महादेव यास कल्याणच्या मोहिमेवर पाठवले. त्यावेळी कल्याण, भिवंडीपासून रायरीपर्यंतचा सारा मुलूख आबाजी महादेव यांनी स्वराज्यात घेतला. तेंव्हाच हा मुरंजन स्वराज्यात आला. त्यावेळी किल्ल्याचे नाव बदलून किल्ले “प्रबळगड” असे ठेवण्यात आले. ( प्रबळ गडास प्रधानगड असे देखील म्हणतात.) . इ. स. १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मिर्झा राजे जयसिंग यांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड कलावंतीण दुर्ग देखील होता. त्यावेळी मिर्झाराजे जयसिंग यांनी किल्ल्यावर राजपूत सरदार केशरसिंह यांची किल्लेदार म्हणून नेमणूक केली. त्यानंतर झालेल्या केशरसिंह राजपूत आणि मराठ्यांच्या लढाईमध्ये प्रबळगड पुन्हा स्वराज्यात आला. पुढे कंपनी सरकारने प्रबळगडला माथेरानसारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करण्याचा विचार केला होता. परंतु स्थानिक परिस्थितीमुळे ते शक्य होवू शकले नाही.

कलावंतीण दुर्गाचा इतिहास : (साभार इंटरनेट)

असे म्हणतात कि, पूर्वी कोण्या एका राजाचे कलावंती नावाच्या राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून जावू नये, म्हणून त्या राजाने कलावंती राणीला प्रबळगडाच्या शेजारी असलेल्या सुळक्यावर एक महाल बांधून दिला. आजच्या दिवशी कलावंतीण दुर्गच्या सुळक्यावर पाहण्यासारखे काहीच नाही. परंतु सुळक्यावर चढण्याकरिता दगड कापून पायऱ्या तयार केलेल्या आहेत. आणि याची उंची खूप आहे.

प्रबळगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

प्रबळगड आणि कलावंतीण दुर्गवर पाहण्यासारखे तसे काहीच नाही. प्रबळगडावर जात असताना वाटेवर पडलेल्या अवस्थेतील एक बुरुज आहे. प्रबळगडावर गेल्यानंतर आपल्याला दिसते कि समोर पठार आहे. गडावर वास्तूंचे अवशेष आहेत तसेच भरपूर झाडी देखील आहे. प्रबळगडावर एक गणेश मंदिर आहे. तसेच भग्न अवस्थेतील नंदी आहे.

प्रबळगड आणि कलावंतीण दुर्गवर गिर्यारोहण करण्यासाठी गिरीप्रेमी येत असतात. कलावंतीण दुर्गचा सुळका चढण्यास अवघड असल्यामुळे आणि गिर्यारोहणाचा थरार अनुभवता येत असल्यामुळे दुर्गप्रेमी याठिकाणी येत असतात. कलावंतीण दुर्गच्या सर्वात वरच्या टोकावर गेल्यानंतर परिसरातील माथेरान, चांदेरी, पेब दुर्ग, इर्शलगड, कर्नाळा किल्ला आणि समोर पनवेल तसेच नवी मुंबई शहर सहजपणे दिसते.

माची प्रबळ गावाच्या संरक्षकासारखा त्यांच्या मागे उभा असलेला हा मुरंजन डोंगर माची प्रबळ गावातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच कलावंतीण दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकांचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. परिसरातील लोक प्रबळगडावरील मंदिरामध्ये पूजा करतात.

गिर्यारोहणाचा थरार अनुभवण्यास उत्सुक असलेल्या गिरीप्रेमींसाठी प्रबळगड (मुरंजन / प्रधानगड) आणि कलावंतीण दुर्गचे गिर्यारोहण एक पर्वणी आहे.

Monday, 5 February 2018

ओढ शिवजयंतीची

*सह्याद्रीचा सिँह जन्मला*
_आई जिजाऊ पोटी!_
*हर हर महादेवाची घुमली गर्जना*
*गड किल्याच्या ओठी!*
_रायगडावर तुम्ही ऊभारली_
*... शिवराष्ट्राची गुढी!*
_राजे तुम्ही नसता तर_
*सडली असती हिँदुची मढी!*
_तुम्हा मुळे तर आम्ही_
*पाहतो देवळाचे कळस,*
_तुम्ही नसता तर नसती_
*दिसली अंगनात तुळस!*j

*||जय भवानी जय शिवाजी ||*

🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅शुभ रात्री 🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆

Wednesday, 27 December 2017

कलाल बांगडी तोफ.

कलाल बांगडी या तोफेचा पल्ला १२किमी पर्यंत आहे असे म्हणतात आणि कितीही उन असले तरी तोफ अजिबात तापत नाही. एक आख्याईका अशी की, पेशव्यांनी किल्ला जिंकण्यासाठी ही तोफ आणवली होती पण किल्ला जिंकता न आल्याने निराश होऊन त्यांनी ती तशीच सोडून दिली. तिच पुढे सिद्दीने किल्ल्यात आणवली. तर काहींच्या मते ती इतकी जड होती ही ती बोटीने आणणे अशक्यप्राय होते. त्यामुळे ती तुकड्या तुक़ड्यात आणून इथे जोडण्यात आली.[ वादळ ]

Wednesday, 20 December 2017

राजधानी रायगडचे वर्णन

राजधानी रायगडचे वर्णन - थाँमस निकोल्स
23 मे 1673 रोजी थाँमस निकोल्स रायगड वर आला होता. हिंदु-दुर्ग रायगड विषयी तो लिहीतो-
"सकाऴी त्या उंच टेकडीवर आम्ही गेलो. वाटेत अनेक ठिकाणी पायरया तयार केल्या होत्या आणि पुढे दरवाज्या जवळ गेलो असता तेथील पायरी पक्क्या खडकात खोदलेल्या आहेत. जेथे टेकडीला निसर्गत: अभेदता नाही तेथे 24 फुट उंचीची भिंत किंवा तट बांधला आहे आणि भिंती पासुन 40 फुटांवर लगेच दुसरी भिंत बांधली आहे.
जर शत्रुने पहिली भिंत पार केली तर तर त्यांना हकलुन लावान्यासाठी दुसरी भिंत तयारच होती. अशा प्रकारे हा किल्ला ईतका दुर्गम बनवला आहे कि जर रसदेचा पुरवठा झाल्यास हा किल्ला अगदी अल्प शिबंदीच्या सहाय्याने सर्व जगाविरुद्ध लढु शकेल.”

—थाँमस निकोल्स, इंग्रज वकिल

सौजन्य : शिवरायांचा शिलेदार

फुलात न्हाली पहाट ओली,

फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भुकल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले

रंग फुलांवर ओघळतांना असे जुईला लदबदले
गालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले

निळ्या तिच्या डोळ्यांत कथाई, कुणाकुणाच्या आठवणी
एक झोपडी साक्षीमधली करीत बसली साठवणी

अशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे
दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे

आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातुन बोलविले
भरात येउनी नग्न शरीरी उघड्यावरती भोग दिले

काचोळीची गाठ सावरित हळू तयाला सांगितले
तिचियापोटी पाचघडीचे लख्ख चांदणे अवघडले

फुलात न्हाली पहाट ओली, कळीत केशर साकळते
गंधवतीच्या मनात राजस एक पाखरु भिरभिरते!

Monday, 4 December 2017

श्री शिवरायांची पूजा.

सांगलीकरांकडून दररोज होते किल्ले श्री रायगडावर छत्रपती श्री शिवरायांची पूजा.

लेख आवर्जुन वाचा

रायगडावरील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा सांगलीकरांकडून ऊन-पाऊस -वारा यांची पर्वा न करता गेली २४ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे.
दर दोन दिवसांनी शहरातील दोन शिवभक्त स्वखर्चाने सांगली ते रायगड असा सुमारे ३५० किलोमीटरचा प्रवास करून ‘रोप वे’चा उपयोग न करता पायी चालत गडावर जातात.
या उपक्रमास शिवभक्त ॥ श्री रायगड व्रत ॥ असे म्हणतात.
यामध्ये एकादिवसाचाही खंड पडलेला नाही. कोणताही उपक्रम अव्याहत चालविणे ही अशक्य गोष्ट असल्याचा सर्वसाधारण समज आहे, परंतु सांगलीतील शिवभक्तांनी रायगड व्रताच्या माध्यमातून या संकल्पनेलाछेद दिला आहे.
१४ जानेवारी १९९१ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर या उपक्रमास श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान चे संस्थापक श्री संभाजीराव भिडे (गुरूजी) यांनी प्रारंभ केला.
प्रारंभापासूनच प्रत्येकाने स्वखर्चाने गडावर जायचे आणि पूजा करायची, हा दंडक शिवभक्तांनी जपला आहे.
बहुतांशजण एसटी बसनेच प्रवास करतात. शिवभक्त सांगलीहून कऱ्हाड, तेथून महाडमार्गे रायगडावर पोहोचतात. तेथे गेल्यावर रात्री गडावरील धर्मशाळेत मुक्काम करतात.
पहाटे उठून गडावरील छत्रपती श्री शिवरायांची समाधी, महाराजांचे सिंहासन, होळीच्या माळावरील महाराजांची मूर्ती, श्री जगदीश्वराचे मंदिर, श्री शिरकाई देवीची मूर्ती आणि गडाच्या पायथ्याशी पाचड येथील राजमाता जिजाऊसाहेबांची समाधी या सहा ठिकाणी पूजा करण्यात येते.
दुपारी श्री शिवचरित्राचे वाचन करण्यात येते. रात्री पुन्हा गडावरच मुक्काम करून पहाटे पुन्हा सहा ठिकाणी पूजा करून दोघे शिवभक्त सांगलीकडे रवाना होतात.
त्याच दिवशी दुपारी सांगलीहून दुसरे दोघेजण रायगडाकडे जाण्यासाठी निघतात.
रायगडला जाऊन पुन्हा सांगलीत येईपर्यंत कोणीही हॉटेलमध्ये जेवण करीत नाही. जातानाच दोन दिवसांची शिदोरी बांधून नेण्यात येते.
या उपक्रमात खंड पडू नये यासाठी वर्षाच्या प्रारंभीच १८३ दिवसांकरिता शहरातील ३६६ शिवभक्तांचे वेळापत्रक शिवप्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात येते.
त्यामध्ये बदल होत नाही. काही अडचण निर्माण झाली, तर संबंधित शिवभक्तच दुसऱ्या दोघांची सोय करून देतात.
प्रत्येक शिवभक्ताला सरासरी ८०० रुपये प्रवास खर्च येतो.
सांगलीहून रायगडावर जाऊन पूजा करण्यापेक्षा तेथे रोजच्याकरिता पगारी माणूस नेमण्याचा सल्ला काहींनी दिला होता, परंतु तो सल्ला सर्वच शिवभक्तांनी नाकारला.
तेथे जाऊन पूजा केल्यानंतर वेगळीच अनुभूती येत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी या गोष्टीस नकार दिला. भारतीय परंपरा, रुढी, सण यांचे रक्षण छत्रपती श्री शिवरायांनी केले. त्यामुळे देवांचाही देव असलेल्या शिवरायांच्या समाधीची पूजाकरणे हे कर्तव्यच असल्याची शिवभक्तांची भावना आहे.
पावसाळ्यात दरडी कोसळणे, वेळेत बस न मिळणे अशा अडचणी येतात. असे असले तरीही रायगड व्रतामध्ये खंड पडत नाही.
तीस रुपयांत बारा हार
ज्यावेळी रायगड व्रतास प्रारंभ झाला,त्यावेळी सांगलीतील श्री शिवाजी महाराजांच्या मुर्तीसमोरच्या जाधव बंधूंनी गडावरील दोन दिवसांच्या पूजेसाठी बारा हार तीस रुपयांना दिलेहोते.
त्यावेळेपासून आजअखेर त्यांनी हारांची रक्कम वाढविलेली नाही ! आजही शहरातून जाणाऱ्या शिवभक्तांना जाधव बंधू तीस रुपयांमध्येच बारा हार देतात.

श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान

कोंडाजी फर्जंद

कोंडाजी फर्जंद
अवघ्या साठ मावळ्यानिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा पराक्रमी वीर हा कोंडाजी होय.तुंगभद्रेपासून उत्तरेस अहिवंतापर्यंत अनेक गड राजांनी कब्जात घेतले होते.पण दख्खनचा दरवाजा असलेला पन्हाळगड त्यांना ताब्यात मिळाला नव्हता.राजेंनी दि.६ जून १६७२ रोजी रायगडावर आपल्या सहकाऱ्यांना ही सल बोलून दाखविली.
यावेळी कोंडाजी फर्जंद,राजेंना बोलिला की गड म्या घेतो.त्याने अवघे तीनशे हशम(मावळे)राजेंकडे मागितले.अवघ्या तीनशे मावळ्यानिशी पन्हाळगड जिंकावयास निघालेल्या कोंडाजीचे राजेंनी कौतुक करून त्यास सोन्याचे कडे दिधले.कोंडाजीने कोकणातून महाडमार्गे येऊन राजापुरास आपला तळ टाकला.राजापुर व पन्हाळा किल्ला हे अंतर आडवाटेने(जंगली रस्त्याने)अंदाजे ८०-९० कि.मी होते.हेरगिरीने वेष पालटून गडावर जाऊन त्यांनी गडाची पूर्ण माहिती काढली.गडावर अंदाजे दोन हजार गनिम होते.बाबूखान हा अदिलशाही किल्लेदार होता.
फाल्गुन वद्य त्रयोदशी(दि.६ मार्च १६७३)रोजी मध्यरात्री राजापुरातून येऊन फिरंगोजी गडाच्या जवळ पोहोचला.तीनशे मावळ्यापैकी त्यांनी निवडक साठ मावळे घेऊन गडावर हल्ला केला.तीन दरवाज्याजवळ असलेल्या कड्यावरून चढून त्यांनी गडावर प्रवेश केला.मध्यरात्री मराठे गडावर आल्यावर त्यांनी कापाकापीला सुरूवात केली.गडाचा किल्लेदार बाबूखान व कोंडाजी यांच्यात महाभयंकर युध्द जाहाले.अखेर कोंडाजीच्या तलवारीच्या वारात बाबूखानाचे मस्तक धडावेगळे झाले.किल्लेदार पडल्यामुळे खानाच्या सैन्यात गोंधळ उडाला.ते पळून जाऊ लागले.पण गडावरील साठ मावळ्यांनी त्यांची दाणादाण उडवून गड ताब्यात घेतला.अवघ्या साठ मावळ्यांनिशी गड ताब्यात घेणारा कोंडाजी खरोखरच वीर होता.