! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Wednesday, 12 November 2014

॥ शाहिस्तेखान आणि डायरी ॥

शाहिस्तेखानला
रोज "डायरी"
लिहिण्याची सवय
होती. त्या डायरीचे नाव "शाहिस्तेखान
बुर्जी"
असे आहे. त्यामध्ये "शिवरायांनी"
केलेल्या हल्ल्याच्या प्रसंग त्याने नमूद
केलेला आहे. आणि याच बुर्जीत खानानं
आणखी एक घटना नोंदवली आहे.
तो असं लिहितो,,,
"शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे
लालमहालातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ
थांबला. शाहिस्तेखानाची एक बहिण धावत धावत
खानाकडे आली आणि म्हणाली, 'भाईजान
मेरी बेटी लापता हैं!...मेरी बेटी लापता हैं,
भाईजान!' त्यावेळी आपली बोटं
छाटलेला शाहिस्तेखान स्मितहास्य करत
म्हणाला,...'शिवाजीची माणसं तिला पळवणार
नाहीतच,
पण!
जरी त्यांनी पळवली असेल
तरी "बेफिक्र" राहा.
कारण! तो "शिवाजी राजा"
पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल.
"अरे! कोण विश्वास
दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर...!"
"अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून
बसली होती, नंतर
ती सापडली".
मित्रांनो हि गोष्टं सांगण्याच तात्पर्य एवढचं
कि, " आज या सबंध भारतीय
समाजाला "शिवाजी महाराजांसारख्या"
चारित्र्यवान
महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज
आहे".
!!!छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!!
!!! जय भवानी - जय शिवराय !!!

Monday, 10 November 2014

॥ शिवरायांची आरती व्हिडिओ ॥


॥ शिवजन्माची पहाट ॥


शिवजन्माची पहाट




सूर्यकीरणे गारव्याला होती जाळत
शिवनेरीवर भगवाही होता खेळत ,
येणार्‍या नव्या पर्वाची लागली होती चाहूल
शिवजन्मान पडणार होत पहिल मराठी पाउल ...


मराठ्यांचा प्रत्येक आश्रू
जिजाउन साठवला होता ,
आई भवानीस तेच आश्रू देऊन
पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता ...


मंदिर थराराली , शिवनेरीची तोफ कडाडली
वार्‍याची कोवळी झुळुक दर्‍या खोर्‍यात दरवळली ,
जिजाउपोटी मराठ्यांचा राजा अवतरला
सांगत मुकी पाखरही किलबीलली ....


नगारा वाजला ,शाहिरी साज चढला
डंका डोंगरा आड सांगत सुटला ,
आता सह्याद्रीवर भगवा फडकनार
मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकनार ....


इतिहासच पाहील पान
शिवजन्मान लिहाल गेल होत ,
हिरव्या दगडावर आता भगवे रक्त
स्वराज्याचा इतिहास कोरत होत ...

॥ शिवरायांची आरती ॥

महाराजांच्या कविता
शिवरायांची आरती

जय देव, जय देव, जय जय शिवराया ।
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया ॥ धृ ॥


अर्थ :- हे शिवरायातुझा जयजयकारअसो.
तुझ्याशी अनन्यशरण झालेल्याआर्यांचे (भारतीयांचे) तारण करण्याकरता, त्यांच्यावरील आलेल्यासंकटांचे निवारण करण्याकरता तु ये. (धृवपद)

आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला ।
आला आला सावध हो शिवभूपाला ।
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला ।
करुणारव भेदूनी तव हृदय न का गेला ॥१॥


:- या आर्यभूमीवर इस्लामचे आक्रमण आले आहे त्या मुळे हे भूमीच्यापालनकर्त्या शिवराया तू सावध हो. सद्गतित कंठाने ही भूमाता तुजलाआळवत आहे. हा करुणाघन असा आवाज तुझे हृदय भेदून टाकीत नाहीकाय ? (१)

श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी ।
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी ।
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता ।
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता ॥२॥
[10:55, 11/11/2014] Fakt BJ: :- शुंभ निशुंभ यांचे निर्दालन करणारी ही जगन्माता. दशानन रावणाचेमर्दन करुन या जगदंबेचे रक्षण श्रीरामांनी केले. असे सपूत ही भारत माताप्रसवली. अशी ही भारतमाता इस्लामच्या छळाने गांजून गेलेली आहे. हेशिवराया तुझ्या शिवाय दुसरा तारणहार या मातेला कोण आहे बरे ?

त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो ।
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो ।
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया ।
भगवन भगवदगीता सार्थ कराया या ॥३॥


:- अतिशय त्रस्त झालेले आम्ही दीन लोक तुझ्या शरणास आलेलोआहोत. पारतंत्र्यामुळे आम्हाला मरणकळा आलेली आहे. संतसज्जनांच्या संरक्षणाकरता दैत्यांच्या नाशाकरता परमेश्वर अवतार घेतोअसे गीतावाक्य आहे. श्रीकृष्णाचे हे वाक्य सार्थ ठरवण्याकरता हे शिवरायतुम्ही या. (३)

ऐकुनिया आर्यांचा धावा महिवरला ।
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला ।
देशास्तव शिवनेरी घेई देहाला ।
देशास्तव रायगडी ठेवी देहाला ।
देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला ।
बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला ॥४॥


:- आर्यमंडळाचा पृथ्वीवरील धावा ऐकून स्वर्गाधिष्ठीत तो शिव राजागहिवरुन गेला. या देशासाठीच तो शिवनेरी गडावर जन्म घेता झाला अन्देशासाठीच रायगडावर देह ठेवता झाला. या देशाला स्वातंत्र्य प्रदान करताझाला.
अशा शिवराजाचा जयजयकार करा. बोला, छत्रपती शिवाजी महाराज कीजय ! (४)

!!सुप्रभात!!

धुक्याची चादर घेऊन
      पहाट यावी .
कोकिळेच्या भूपाळीने
      जाग यावी .
ऊगवत्या नारायणाची
       लाली न्याहाळावी .
गोठ्यातील कपिलेची
     धार चाखावी.
तुक्याची एक तरी
      ओवी गुणगुणावी .
प्रसन्न ,संपन्न आयुष्याची
      प्रार्थना करावी .
एक सकाळ ....
      अशीही अनुभवावी  
   
 !!सुप्रभात!!

Thursday, 6 November 2014

॥ शिवछ्त्रपती ॥

होता तो सिंहाचा छावा
खेळून गनिमी कावा
माजवून रणदुदुंभी रणांगणात
खेचून आणला विजय त्यानं आपल्या अंगणात
जिंकून घेतलं आकाश त्यानं
जिंकून घेतले दुर्ग
विशाल सागरालाही पायबंध घातला त्यानं
बांधून सिंधुदुर्ग
नाव होतं त्याचं ''छत्रपती शिवाजी''.

॥ अर्थतज्ञ्ज्ञ शिवराय ॥



स्वराज्याची आर्थिक घडी बसविताना महाराजांना लष्करी आघाडीवर मोगल, आदिलशाही, सिध्दी यांच्याशी लढावे लागले तर व्यापारविषयक आघाडीवर इंग्रज,फ्रेंच,पोर्तुगीज,डच अशा बहुराष्ट्रीय कंपन्या ज्यांच्यामागे त्यांचे अख्खे देश पूर्ण ताकदीनिशी उभे होते अशा बलाढयांशी स्पर्धा करून व्यापार- उद्दीम वाढवावा लागला आणि एकवेळ अशी आणली की जगाकडून जकात घेणारया पोर्तुगीजांना सुध्दा महाराजांना जकात दयावी लागली आणि इंग्रजांच्या तर महाराजांनी मुसक्याच आवळल्या होत्या हे इंग्रजांचे वकील सारखे महाराजांशी बोलणी करायला यायचे यावरून कळते.आर्थिक आघाडीवर दुर्लक्ष करून २२ वर्षे शहाजहान ताजमहल बांधत बसला आणि कर्जबाजारी झाला.महाराजांनी याबाबतीत अत्यंत जागरुक राहून व्यक्तिगत खर्च खुप कमी ठेवून प्रचंड बचत करून तेच पैसे स्वराजच्या भांडवल निर्मितीसाठी गुंतवणूक केले.आयुष्यात केवळ उत्पादक गोष्टीवर गुंतवणूककरीत किल्ले
बांधले पण खर्चाची अनावश्यक बाब म्हणून राजमहल बांधणे टाळले.आर्थिक शहाणपण नव्हते म्हणूनच औरंगजेब कायम लढाया करण्यात गुतंलेला होता. त्यामुळेच आशियातील सर्वात श्रीमंत बादशहा मराठ्यांचा सामना करता करता बाद झाला आणि सर्वात छोटे असलेले स्वराज्य वाढत गेले.महाराज आशियातील सर्वात श्रीमंत राजे झाले. ते याच आर्थिक शाहणपणातून,त्यामुळेच आज ३५० वर्षानंतरही रयत महाराजांना विसरु शकली नाही,ती त्यांच्या लोककल्याणकारी धोरणांमुळेच. जगाच्या इतिहासात शिवाजी महाराज अमर झालेत ते केवळ लढाया जिंकल्या म्हणून नाही तर आर्थिक आघाडीवर महाराजांनी प्रचंड यश मिळवले. १०,००० कोटींच्या सिंहासनावर बसणारे आणि २१ कोटी ६० लाखांच्या तलवारी बाळगणारे तरीही साधेपणाने राहणारे शिवाजी महाराज खरच महान होते.त्यांचा श्रीमंतांना गरीब करणारा समाजवाद नव्हे तर गरिबाला श्रीमंत करणारा समतावाद होता