! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Monday, 10 November 2014

॥ शिवजन्माची पहाट ॥


शिवजन्माची पहाट




सूर्यकीरणे गारव्याला होती जाळत
शिवनेरीवर भगवाही होता खेळत ,
येणार्‍या नव्या पर्वाची लागली होती चाहूल
शिवजन्मान पडणार होत पहिल मराठी पाउल ...


मराठ्यांचा प्रत्येक आश्रू
जिजाउन साठवला होता ,
आई भवानीस तेच आश्रू देऊन
पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता ...


मंदिर थराराली , शिवनेरीची तोफ कडाडली
वार्‍याची कोवळी झुळुक दर्‍या खोर्‍यात दरवळली ,
जिजाउपोटी मराठ्यांचा राजा अवतरला
सांगत मुकी पाखरही किलबीलली ....


नगारा वाजला ,शाहिरी साज चढला
डंका डोंगरा आड सांगत सुटला ,
आता सह्याद्रीवर भगवा फडकनार
मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकनार ....


इतिहासच पाहील पान
शिवजन्मान लिहाल गेल होत ,
हिरव्या दगडावर आता भगवे रक्त
स्वराज्याचा इतिहास कोरत होत ...

॥ शिवरायांची आरती ॥

महाराजांच्या कविता
शिवरायांची आरती

जय देव, जय देव, जय जय शिवराया ।
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया ॥ धृ ॥


अर्थ :- हे शिवरायातुझा जयजयकारअसो.
तुझ्याशी अनन्यशरण झालेल्याआर्यांचे (भारतीयांचे) तारण करण्याकरता, त्यांच्यावरील आलेल्यासंकटांचे निवारण करण्याकरता तु ये. (धृवपद)

आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला ।
आला आला सावध हो शिवभूपाला ।
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला ।
करुणारव भेदूनी तव हृदय न का गेला ॥१॥


:- या आर्यभूमीवर इस्लामचे आक्रमण आले आहे त्या मुळे हे भूमीच्यापालनकर्त्या शिवराया तू सावध हो. सद्गतित कंठाने ही भूमाता तुजलाआळवत आहे. हा करुणाघन असा आवाज तुझे हृदय भेदून टाकीत नाहीकाय ? (१)

श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी ।
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी ।
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता ।
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता ॥२॥
[10:55, 11/11/2014] Fakt BJ: :- शुंभ निशुंभ यांचे निर्दालन करणारी ही जगन्माता. दशानन रावणाचेमर्दन करुन या जगदंबेचे रक्षण श्रीरामांनी केले. असे सपूत ही भारत माताप्रसवली. अशी ही भारतमाता इस्लामच्या छळाने गांजून गेलेली आहे. हेशिवराया तुझ्या शिवाय दुसरा तारणहार या मातेला कोण आहे बरे ?

त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो ।
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो ।
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया ।
भगवन भगवदगीता सार्थ कराया या ॥३॥


:- अतिशय त्रस्त झालेले आम्ही दीन लोक तुझ्या शरणास आलेलोआहोत. पारतंत्र्यामुळे आम्हाला मरणकळा आलेली आहे. संतसज्जनांच्या संरक्षणाकरता दैत्यांच्या नाशाकरता परमेश्वर अवतार घेतोअसे गीतावाक्य आहे. श्रीकृष्णाचे हे वाक्य सार्थ ठरवण्याकरता हे शिवरायतुम्ही या. (३)

ऐकुनिया आर्यांचा धावा महिवरला ।
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला ।
देशास्तव शिवनेरी घेई देहाला ।
देशास्तव रायगडी ठेवी देहाला ।
देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला ।
बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला ॥४॥


:- आर्यमंडळाचा पृथ्वीवरील धावा ऐकून स्वर्गाधिष्ठीत तो शिव राजागहिवरुन गेला. या देशासाठीच तो शिवनेरी गडावर जन्म घेता झाला अन्देशासाठीच रायगडावर देह ठेवता झाला. या देशाला स्वातंत्र्य प्रदान करताझाला.
अशा शिवराजाचा जयजयकार करा. बोला, छत्रपती शिवाजी महाराज कीजय ! (४)

!!सुप्रभात!!

धुक्याची चादर घेऊन
      पहाट यावी .
कोकिळेच्या भूपाळीने
      जाग यावी .
ऊगवत्या नारायणाची
       लाली न्याहाळावी .
गोठ्यातील कपिलेची
     धार चाखावी.
तुक्याची एक तरी
      ओवी गुणगुणावी .
प्रसन्न ,संपन्न आयुष्याची
      प्रार्थना करावी .
एक सकाळ ....
      अशीही अनुभवावी  
   
 !!सुप्रभात!!

Thursday, 6 November 2014

॥ शिवछ्त्रपती ॥

होता तो सिंहाचा छावा
खेळून गनिमी कावा
माजवून रणदुदुंभी रणांगणात
खेचून आणला विजय त्यानं आपल्या अंगणात
जिंकून घेतलं आकाश त्यानं
जिंकून घेतले दुर्ग
विशाल सागरालाही पायबंध घातला त्यानं
बांधून सिंधुदुर्ग
नाव होतं त्याचं ''छत्रपती शिवाजी''.

॥ अर्थतज्ञ्ज्ञ शिवराय ॥



स्वराज्याची आर्थिक घडी बसविताना महाराजांना लष्करी आघाडीवर मोगल, आदिलशाही, सिध्दी यांच्याशी लढावे लागले तर व्यापारविषयक आघाडीवर इंग्रज,फ्रेंच,पोर्तुगीज,डच अशा बहुराष्ट्रीय कंपन्या ज्यांच्यामागे त्यांचे अख्खे देश पूर्ण ताकदीनिशी उभे होते अशा बलाढयांशी स्पर्धा करून व्यापार- उद्दीम वाढवावा लागला आणि एकवेळ अशी आणली की जगाकडून जकात घेणारया पोर्तुगीजांना सुध्दा महाराजांना जकात दयावी लागली आणि इंग्रजांच्या तर महाराजांनी मुसक्याच आवळल्या होत्या हे इंग्रजांचे वकील सारखे महाराजांशी बोलणी करायला यायचे यावरून कळते.आर्थिक आघाडीवर दुर्लक्ष करून २२ वर्षे शहाजहान ताजमहल बांधत बसला आणि कर्जबाजारी झाला.महाराजांनी याबाबतीत अत्यंत जागरुक राहून व्यक्तिगत खर्च खुप कमी ठेवून प्रचंड बचत करून तेच पैसे स्वराजच्या भांडवल निर्मितीसाठी गुंतवणूक केले.आयुष्यात केवळ उत्पादक गोष्टीवर गुंतवणूककरीत किल्ले
बांधले पण खर्चाची अनावश्यक बाब म्हणून राजमहल बांधणे टाळले.आर्थिक शहाणपण नव्हते म्हणूनच औरंगजेब कायम लढाया करण्यात गुतंलेला होता. त्यामुळेच आशियातील सर्वात श्रीमंत बादशहा मराठ्यांचा सामना करता करता बाद झाला आणि सर्वात छोटे असलेले स्वराज्य वाढत गेले.महाराज आशियातील सर्वात श्रीमंत राजे झाले. ते याच आर्थिक शाहणपणातून,त्यामुळेच आज ३५० वर्षानंतरही रयत महाराजांना विसरु शकली नाही,ती त्यांच्या लोककल्याणकारी धोरणांमुळेच. जगाच्या इतिहासात शिवाजी महाराज अमर झालेत ते केवळ लढाया जिंकल्या म्हणून नाही तर आर्थिक आघाडीवर महाराजांनी प्रचंड यश मिळवले. १०,००० कोटींच्या सिंहासनावर बसणारे आणि २१ कोटी ६० लाखांच्या तलवारी बाळगणारे तरीही साधेपणाने राहणारे शिवाजी महाराज खरच महान होते.त्यांचा श्रीमंतांना गरीब करणारा समाजवाद नव्हे तर गरिबाला श्रीमंत करणारा समतावाद होता

Wednesday, 5 November 2014

॥ लोकराजा शाहूमहाराज ॥

खुप छान कथा आहे.....
आठवडी बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून
घराकडे निघाली होती. आया-
बाया चपला फरफटत पाय उचलत होत्या.
धुरळ्याची रंगपंचमी झाली होती नुसती.
म्हातारी आजी पाटी कमरेवर घेऊन ताठ
उभी राहिली. फाटक्या चपलेला वादी बांधून
त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट
झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली.
लाडवांची पुरचुंडी प्लास्टिकच्या पिशवीत
चुंबळीच्या पदराखाली सरकवली.
आजी एस्.टी.च्या खांबाशी पोहोचते,
तो एस्.टी.निघून गेली होती. बांगडीवाल्या मुलाने
तिला हटकलंच,
म्हातारे, आज उशीरसा?'
माल संपेसंपेतो उशीर झाला होता. पण आज
बक्कळ पैसे जमले होते. त्यातूनच तिनं
खरेदी केली होती. कुणाला तरी हे उत्साहानं
सांगावं, असं तिला पण वाटत होतं. तेवढ्यात
समोरुन मोटार येताना दिसली.
आजीने चकटनं विचार केला, एस्.टी.ला दोन आणे
पडणारच होते. याला एक आणा जास्त देऊ. पण
अंधारायच्या आतं घरी तर पोहोचू!
आजीने आपला काळा फाटकोळा हात
झेंड्यासारखा हलवला. गाडी कचकन ब्रेक लावून
थांबली. ड्रॉयव्हर तसा रुबाबदार गडी वाटला.
तो आजीकडे बघून हसला.
"काय पायजे आजी?" त्यानं
विचारलं.आजीला त्यातला त्यात बर वाटलं.
म्हणाली, "माका सत्तर मैलार जांवचा आसा.
सोडशील रे? "यष्टी चुकली बग!'
ड्रॉयव्हर खाली उतरला.
म्हातारीची पाटी डिकीत
टाकली आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर
बसायला सांगितलं. आजी हरकली. चक्क पुढं
बसून जायचं? आणि गाडीत कोणी पॅसेंजर्च
नाही. पण तिला हळहळपण वाटली.
बिचाऱ्या ड्रॉयव्हरला आज मिळकतच नाही.
ती म्हणाली, "ह्यां बग, यष्टीवाले दोन आने घेता.
मियां तुका तीन आणे देतयं. चलात?''
ड्रॉयव्हर हसत म्हणाला, "आजी, तुला परवडतील
ते दे. तू मला मायसारखी ''
आजीचाजीव सुपाएवढा झाला. ती मायच्याच
हक्कानं ऐसपैस बसली. गाडी सुरु
झाली.बांगडीवालामुलगा तोंड वासून आश्चर्यानं
पाहत होता. गाडी हलली तसा तो ओरडलाच, "अगे
म्हातारे..... -पण आजीला आता त्याच्याकडे
बघायला सवड कुठं होती?
मऊ गादीवर आजीला फार सुख वाटलं,
एस्.टी.सारखी गर्दी नाही, कचकच नाही.
गाडी कशी भन्नाट निघाली होती. आजीनं
मनातल्या मनात ड्रॉयव्हरला मार्क देऊन टाकले.
दिवस भराच्या उन्हान,धुळीनं ती थकली होती.
आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी आली.
"आजी, तुझा सत्तर मैलाच्या दगड आला बघं.
इथंच उतरायच ना?"
आजी खडबडून उठली. कनवटीचे तीन आणे काढून
ड्रॉयव्हरच्याहातावर ठेवले. तेवढ्यात त्यान
डिकीतून तिची पाटी काढून दिली.
म्हाताऱ्या आजीला काय वाटलं कोण जाणे.तिनं
अलवार हातानं पुडी उलगडली.
त्यातला शेवकांडचा एक लाडू काढला.
ड्रॉयव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली,
"खा माझ्या पुता! "
ड्रॉयव्हरनं हातातल्या लाडवाकडं
आणि म्हातारीकडं डोळे भरुन पाहिलं
गाडी निघाली, तसा बाजूला उभा असलेला माणूस
म्हणाला,
"कुणाच्या गाडीतून इलंय?""
"टुरिंग गाडीतनं." आजी म्हणाली
आजीचं बोलणं ऐकून तो माणूस आणखीच
बुचकळ्यात पडला. तशी आजी खणखणीत
आवाजात म्हणाली
"तीन आणे मोजूनदिलंय त्येका",
"त्यांनी ते घेतलं?
अग म्हातारे तुझं डोकं फिरलं काय? टुरिंग कार
नव्हती ती.आपल्या राजांची गाडी.
या आपल्या  कोल्हापूरच्या शाहु महाराजांच्या शेजारी बसून आलीस
तू!'' दुसऱ्यानं माहिती पुरवली.
"अरे माझ्या सोमेश्वरा, खळनाथा'' म्हणत
म्हातारी भुईला टेकली. गाडी गेली त्या दिशेनं
तिन भक्तिभावानं हात जोडले. आपल्याला `माय'
म्हणणाऱ्या आणि गरिबांच्या टोपलीतला शेवकांडाचा लाडू
खाणाऱ्या,त्या लोकराजाच्या आठवणीनं,तिच
अंतःकरण भरुन आलं.

याला  म्हणतात " लोकराजा"...

॥ शिवबा लाखात नाही तर जगात एक ॥

अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात
"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू" हा 100
मार्काचा पेपर
घेतला जातो.
पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात
"आदर्श राजा असा असावा"
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो.
अनेक देशांमध्ये आदर्श राजे
छत्रपतींचा इतिहास
अभिमानाने शिकवतात.
पण आमचं दुर्दैव.......
आमच्याकडे शिवरायांचा इतिहास
पुसण्याचाच प्रयत्न केला जातो.
गर्व असेल
शिवाजी महाराजांच्या भूमीत
जन्म घेतल्याचा तर आदशॆ ठेऊण शेयर
करा ..
शिवाजी महाराज जर मुसलमानांचे
विरोधक असते
तर …
शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख
कोण होता ?
…. "इब्राहीम खान"...!
…. ,
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख
कोण होता ?
…"दौलत खान"....!
…,
शिवाजी महाराजांच्या
घोड-दलाचा प्रमुख कोण होता ?….
"सिद्दी हिलाल"......!
शिवाजी महाराजांचा पहिला
सर-सेनापती कोण होता ?
…. "नूर खान"…. !
शिवाजी महाराजांबरोबर
आग्र्याला गेलेला …
"मदारी मेहतर"…. …।
शिवाजी महाराजांचा एकमेव वकील
…."काझी हैदर" …।
शिवाजी महाराजांचे एकमेव
चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे
नाव
...."मीर मोहम्मद" ……
आणि शिवाजी महाराजांना
अफझलखानाचा वध
करण्यासाठी वाघनख्या पाठवून
देणारा…
"रुस्तुमे जमाल" हा हि मुसलमान…।
जर एवढे मुसलमान
अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात
असू शकतात तर शिवाजी महाराज
मुसलमानाचे विरोधक असू शकतात
काय ?…।
शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड
होते त्यापैकी 10 मुसलमान होते … ….
शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद
पाडली नाही । एकही कुराण जाळले
नाही ….
याचा गांभीर्याने विचार या देशात
झाला पाहिजे ….
रायगड
किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे
जगदीश्वराचे मंदिर बांधले …
महाराजांनी मंत्र्याला विचारले,"जगदीश्
वराचे मंदिर बांधले" पण
माझ्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद कुठे
आहे ?…
मंत्र्याने विचारले महाराज
जागा दाखवा ….??
महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील
जागा दाखवली आणि तेथे
आपल्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली
… हा इतिहास आपल्या देशात
का सांगितला जात नाही ?….
हा इतिहास जर समाजापुढे गेला तर
या देशात सामाजिक दुरी निश्चित
नाहीशी होईल ….
अफझल खानाला मारल्यानंतर
शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले
……
जिजाऊनि विचारले ,
अफझल खानाचे काय झाले ?
महाराज उत्तरले,
'मासाहेब'
अफझल खान मारला गेला ….
जिजाऊनि विचारले
त्याचं प्रेत कुठ आहे ?
….
महाराज उत्तरले,
प्रतापगडाच्या पायथ्याशी ….
काय म्हणाल्या जिजाऊ ?
…. शिवबा... अफझल खान जिवंत
असेपर्यंत त्याच्याशी वैर होते, अफझल
खान संपला(मेला ) आता वैरही संपले...
तुझ्या राज्यात
कोण्या प्रेताला कोल्हया-कुत्र्याने
तोडावे हे शोभणार नाही ….
त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर …
आणि तुझ्या विजयाचे प्रतिक म्हणून
तेथे स्मारक बांध …। .
शिवाजी महाराजांनी अफझल
खानच्या प्रेताचे
प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले
व तेथे त्याची कबर बांधली ….
"जय शिवराय "
""16 व्या शतकात शिवनेरीवर एक
तारा चमकला ...
जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला,
पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला ,
ज्याच्या हातुन महाराष्ट्र घङला .""
कृपा करुन
हा आपल्या राजाचा इतिहास
लोकांसमोर आणून
जगाला दाखवा की,
"
आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध
नसुन तो फक्त अन्यायाविरुद्ध होता"!!
सर्वाना विनंती आहे कि,
काळजीपूर्वक वाचा व विचार करा .
शक्य तेवढा फोरवर्ड करा..
लाईक आणी कमेंट करण्यापेकश्या शेयर
कले तर खुप आनंद होईल...
॥ जय जिजाऊ-जय शिवराय " ॥