! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Wednesday, 8 October 2014

! " महाराष्ट्रातील सात अद्भुत आश्चर्य ( सात वंडर्स ) " !

महाराष्ट्रातील सात अद्भुत आश्चर्य ( सात वंडर्स )

|| सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्र ||जगतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर 'एबीपी माझा'ने महाराष्ट्रातूनही “सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्र” या कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात नयनरम्य स्थळ निवडली गेली आहेत.


१. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी शिवतीर्थ रायगड किल्ला, रायगड.

२. मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला दौलताबाद किल्ला, दौलताबाद.

३. पश्चिम घाटातील कास पठार, सातारा.

४. मध्य रेल्वेचं मुख्यालय छत्रपती शिवाजी टर्मिनल (सीएसटी स्टेशन), मुंबई.

५. शांती-सद्भावनेचं प्रतिक ग्लोबल पॅगोडा, मुंबई.

६. लोणार सरोवर, बुलडाणा.

७. अंजिठा लेणी, औरंगाबाद.  |












|छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||॥जय जिजाऊ॥॥जय शिवराय॥॥जय शंभूराजे॥॥जयोस्तू मराठा॥


Tuesday, 7 October 2014

! " कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा " !

सर्वाना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ......................
आसमंत हा उजळून जाई
चंद्र प्रकाशात पृथ्वी न्हाई
कोजागिरीच्या पौर्णिमेची
रात हि आनंदात रंगून जाई ...........



चंद्र चांदणे आकाश सजवी
पृथ्वी सगळी उजेडात हि थिजली
मना-मनामध्ये आनंदाचे
रंग तरंग हे भरून जाई ........



बदाम- पिस्ता, केशर मलई
दुध सुगंधी बनवून जाई
आई लक्ष्मी च्या आशीर्वादाने
चंद्र तारका हरकून जाई .........



चंद्राची ती मंगल पूजा
लक्ष्मी मातेच्या कृपा प्रसादे
लहान मोठे सुखात न्हाई ,
कोजागिरीच्या पौर्णिमेची
रात हि आनंदात रंगून जाई ...........

! " सरखेल कान्होजी आंग्रे यांची हि तलवार. " !

तलवारींचे तेज सांगती...मराठ्यांच्या शौर्याची गाथा..
मनापासुन वंदन करितो...टेकवुनिया माथा..

सरखेल कान्होजी आंग्रे यांची हि तलवार.

जय शिवराय…. !

! " शाहिस्तेखान प्रकरण " !

५ एप्रिल १६६३ शाहिस्तेखान प्रकरण -

मुघल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगझेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा. अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रुसैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले...

Monday, 6 October 2014

! " महाराजांचा बाणा " !

शाहिस्तेखान जेव्हा स्वराज्यावर चालून
आला होता आणि लालमहालात
थांबला होता,
तेव्हा छत्रपती शिवरायांनी गनिमी काव्याने
हल्ला करून त्याची बोटे छाटली.
या शाहिस्तेखानाला रोज
डायरी लिहायची सवय होती. त्याचं
'शाहिस्तेखान बुर्जी' नावाचं रेकाँर्ड आहे.
त्यात हा प्रसंग त्याने लिहीलाय. त्यात
एक घटना त्याने नोंदवलीय. तो लिहतो, "
शिवराय आले तसे वाय्रासारखे
लालमहालातून निघून गेले. काही वेळाने
गोंधळ थांबला आणि शाहिस्तेखानाची एक
बहीण धावत धावत त्याच्याकडे आली.
म्हनाली, भाईजान मेरी बेटी गायब है,
मेरी बेटी गायब है!'
त्यावेळी शाहिस्तेखान तिला म्हणाला,'
शिवरायांची माणसं तिला पळवणार
नाहीतच पण जरी त्यांनी पळवली असेल
तरी बेफिक्र राहा.
तो शिवीजीराजा पोटच्या लेकीसारखीच
तिची काळजी घेईल !'
कोण विश्वास
दुश्मनालाही महाराजांच्या चारीत्र्यावर !
अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून
बसली होती. नंतर ती सापडली.
मित्रांनो आज
या समाजाला या चारीत्र्यवान
महापुरूषाच्या आदर्शाची खरी गरज आहे.
॥ जय शिवराय ॥

! " संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला " !

संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला :—-


वय किमान ७० च्या वर असा एक मुघल सम्राट औरंगझेब . त्या वेळी मराठ्यांचे छत्रपती संभाजी राजे होते .त्यांचे वय किमान ३२ वर्षे .त्या काळी संभाजी राज्यांनी १२० लढाया केल्या त्या मधून ते एकही लढाई हरले नव्हते . अश्या वीर योद्ध्याला पकडणे औरंगझेबला शक्य नव्हते .म्हणूनच औरंगझेब शस्त्र सोबत किमान ४ लाख सैन्या घेऊन तो दक्खन मध्ये उतरला . त्याचे स्वप्ना होते की तो काबुल पासून ते दक्खन पर्यंतचे पूर्ण क्षेत्र मुघलांच्या ताब्यात घ्याचे पण त्याचे हे स्वप्ने पूर्ण झालेच नाही .कारण शिवाजी महाराजान्ने असे होऊच दिले नाही .आणि म्हणून तो निराश झाला होता . शिवाजी महाराजांचे निधन ५० व्या वर्षी झाल्या नंतर संभाजी ना मराठ्यांचा छत्रपती  झाले   . मग औरंगझेबाने निश्चय केला की काही झाला तरी मी मराठ्यांचे हे राज्य त्यांचा कडून घेऊनच राहील . म्हणून मग त्याने कुटनीतीने मराठ्यांमध्ये फुट पडायला सुरुवात केली .आणि यात संभाजीche साळे गणोजी व कनोजी सामील झाले . संभाजी राज्यानजवळ ४५ हजारांचे सैन्या होते . आणि त्यांच्या प्रतेय्क हालचालींवर त्याचे साळे नजर ठेवत होते आणि ती खबर औरंगझेबला सांगत असे .या मुलेच आता संभाजीला पकडायची तयारी करून औरंगझेब शस्त्र सोबत किमान ४ लाख सैन्या घेऊन तो दक्खन मध्ये उतरला .कमी सैन्या असल्यामुळे संभाजी राजे हरले आणि औरंगझेबचा एका सरदाराने छत्रपतींना ताब्यात घेतले .संभाजी महाराज्चे डोळे फार तेजस्वी होते .त्यांने एक नजरही फिरवली तरी साम्रोचा माणूस घाबरून दोन हाथ लांब सरकून जायचा असेच काही त्या सरदारा सोबत सुद्धा झाले.. एका एकी ते राज्यांना ताब्यात घ्यायला भीत होते . पण तरी अवाढव्य सैन्या असल्यामुळे ते पकडला गेले . आणि त्यांना आकाद्क बंदोबस्तात वाडू वूदृप या स्थळी नेण्यात आले.तेथे आणि एक कोठडीत ठेवण्यात आले . औरंगझेबला हे कळल्यावर त्याचा आनंद मावेनासा झाला . संभाजीला पहाण्यासाठी जसा तो व्याकुळ झाला होता कारण या आनंद साठी त्याने ९ वर्ष वाट पहिली होती .साखल्दोराने संभाजी ला बांधण्यात आले होते .औरंगझेब आपल्या सरदारान सोबत त्या कोठडीत भेटण्यास गेला . तेथे सुद्धा औरंगझेब १० फूट लांब उभा राहून साम्भाजीशी बोलत होता .तो म्हणाला ” संभा हमे तुम्हारी मराठा सल्तनत चाहिये ,कैसे राजा हो तुम संभा हम तुम्हारे सल्तनत का एक किल्ला जीत न सके “एक सरदार ” हुजूर , इन्हे इस्लाम पढने कहो “औरंगझेब ” हम संभा को जनते है वोह इस्लाम कभी नही पढेगा “संभाजी राजे म्हणाले ” अरे औरंग्या , आमच्या आबा साहेबांने हे राज्य उभे केले आहे.या राज्याची एक इंच जमीन सुद्धा मी तुला देणार नाही .तुला जे करायचे आहे ते तू करून घे”औरंगझेब “हम तुम्हे ऐसे मौत देंगे की तुम हमारे सामने दया की भिक मंगोगे “संभाजी ” मरायला घाबरत नाही मी औरंग्या , तू तो सुअर की औलाद है. हम तो शेर है. शेर की तऱ्ह जीते है और शेर की तऱ्ह मरते है .ज्या जमिनी साठी तू या वयात एवढ्या आपल्या जीवाचा आटापिटा करतोय न बघ तुला दिल्लीत तर काय दिल्लीच्या दूर दूर पर्यंत तुझी कबर खोदायला जागा मिळणार नाही . शेवटी येशील तर तू आमच्याच मातीत .”औरंगझेब ” बहुत जुबान चलती है इसकी. इसकी जुबान काट दो . लेकीन पहेले इसके साठी कवी कुलेश की कटना”औरंगझेब मनात “इसे देखकर संभा डरजाएगा और दया की भिक मांगेगा हमारे सामने “(कवी कुलेश यांना संभाजी राजसोबतच अटक करण्यात येते आणि त्यांना ही संभाजी राज्यान सोबतच कोठडीत बंद करण्यात येते )आदेश दिल्यावर दोन जल्लाद थोड्या वेळाने कोठडीत येतात आणि पहिले कवी कुलेश ची जीभ संध्शी ने ओढण्यात येते .औरंगझेब ला कळाल्यावर तो विचारतो सभा बाबत पण संभा जसे तसेच असतात . संभा की जबान काट दो असा आदेश तो देतो . पुन्हा ते दोन जल्लादना आदेश देण्यात येते तो संभाजी राज्यांची जब्बन कापण्याचा पण असे शूरवीर योद्ध्याला पाहून जल्लादही दोन पावले मागे सरकतात . संभाजी आपला जबडा उघडायला तयार नसतात . त्यांना ४ ५ जन पकडून त्यांचा जबडा उघडून त्यांची ही जाबन लढण्यात येते .असेच मग औरंगझेब त्यांचे डोळे काढण्याचा आदेश देतो . एक सरदार आणि दोन जल्लाद जातात ते गरम साळखी घेऊन कवी कुलशे चे डोळे काढतात मग संभाजी जवळ येतात . गरम सलाखी घेतात . आणि दोन पावलं माघे सरकततात .ते म्हणतात ” आजतक हमने कितने लोगोकी आंखे निकाली मगर इनके जैसी तेजस्वी आंखे हमने कभी नाही देखी “संभाजींचे डोळे काढण्यात येते. मग त्यांचे वाघ नखाने अंग सोलण्यात येते . त्यांचे हाथ कापण्यात येते . पाय कापण्यात येते . पण ते रेहेम ची भिक मागत नाही .नंतर एक सरदार येतो आणि संभाजींची आठवण म्हणून त्यंच्या गळ्यात असलेली भवानी माळ काढण्याचा प्रयत्न करतो पण संभाजी राजांचा इशारा पाहताच ती तशीच त्यांचा गळ्यात राहू देतो .एवढे अत्याचार सहन करून ही संभाजी राजे रहेमं ची भिक मागत नाही.आणि ते आपला देह सोडतात . ते शहीद होतात. आपल्या राष्ट्रसाठीआपल्या भूमीसाठी .हे सगळा कळल्यावर औरंगझेब म्हणतो ” या अल्लाह , आपने हमारे जनाने मे संभा जैसा बेटा पैदा क्यू नही किया ?”संभाजी राजांच्या शहीद झाल्या नंतर मराठ्यांचा छत्रपती राजाराम यांना बनवण्यात आले .ते संभाजी राजांचे सावत्र भाऊ होते . संभाजी राजनच्या शहीद झाल्या नंतर औरंगझेब १८ वर्ष जगला पण त्याला मराठा साम्राज्याचा एक इंच जमिनी चा तुकडाही जिंकता आला नाही .त्याने आपल्या मृत्यू पत्रात हे लिहून ठेवले आहे. की ” संभा शेर का छावा था”‎”हमने उसकी आंखे निकाल ली लेकीन उसने हमारे सामने आंखे नाही झुकायी ““हमने उसके हाथ काट दिये लेकीन उसने हमारे सामने हाथ नही फैलये “” हमने उसके पैर काट दिये लेकीन उसने हमारे सामने घुत्ने नही टेके . ““हमने उसका सर काट दिया लेकीन उसने हमारे सामने सर नही झुकाया .”——————————————-घेवून जगात आहे कशासाठी?????आपल्यासाठी?त्याने जे लेजेसोसले ते आपल्यासाठी…आणि आपण ????????दिला काय त्या ला मनाचा मुजरा ????नाही….आपण दिले त्या ला फक्त बदनामी आणि बदनामी …..तेवा सर्वे मराठी जन्तेंनोनिर्माण करा ते स्वराज्य पुन्हा आणि द्या त्या“वाघिणी” ला मनाचा मुजरा जिने “वाघ”पैदा केलाद्या मानाचा मुजरा त्या “वाघा” ला ज्या ने असा छावा पैदा केलाआणि द्या मना चा मुजरा त्या “छाव्या” ला ज्यानेते स्वराज्य टिकवून ठेवलेआणी हसत हसत तो शहीद झाला या स्वराज्य साठी तो कामी आला….note
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा